शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांना मदत जाहीर

By admin | Updated: February 12, 2016 01:05 IST

एप्रिल, मे आणि जून २०१५मध्ये राज्यात झालेला अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेती, फळपिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून मदतीची घोषणा आज राज्य

मुंबई : एप्रिल, मे आणि जून २०१५मध्ये राज्यात झालेला अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेती, फळपिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून मदतीची घोषणा आज राज्य सरकारने केली. शासनाने कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर, ओलिताखालील पिकांसाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर अशी मदत जाहीर केली आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)शासनाकडून मिळालेल्या मदतीतून बँका आपल्या कर्जाची वा त्यावरील व्याजाची वसुली करतात, अशा तक्रारी येतात. या पार्श्वभूमीवर, आज जाहीर झालेल्या मदतीतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे स्पष्ट आदेश महसूल विभागाने दिले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या वित्तीय अधिकारात वाढदुष्काळग्रस्त उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या वित्तीय अधिकाराची मर्यादा १० लाख रुपयांवरून २० लाख रुपयांपर्यंत तर २० लाख रुपयांहून अधिकचे वित्तीय अधिकार विभागीय आयुक्त यांना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. ३७३ कोटींपैकी ४६ कोटी मंजूर - सावंतमुंबई : २०१४च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ५ लाख शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या ३७३ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र, सव्वा वर्षानंतर सावकारी कर्जमाफीसाठी फक्त ४६ कोटी रुपये मंजूर झाले असून, लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या केवळ ३१ हजार ३५७वर आल्याचे सांगून सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत सशिवाय, ५ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याची घोषणा झाली, पण प्रस्ताव तयार करताना ही योजना केवळ मराठवाडा व विदर्भापुरती मर्यादित केली, असे ते म्हणाले.दुष्काळग्रस्तांचा विसर - धनंजय मुंडेमुंबई - ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन महाराष्ट्र’ मध्ये व्यस्त असलेल्या सरकारला राज्यातील दुष्काळाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. मेक इन इंडियासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांनी दुसरी बाजू असलेला ‘फार्मर्स डेथ इन महाराष्ट्र’ दाखवावा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.