शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

पाण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

By admin | Updated: June 29, 2016 01:10 IST

येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेबी कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वरवंड व कडेठाण येथील शेतकऱ्यांनी उपोषण केले.

वरवंड : येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेबी कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वरवंड व कडेठाण येथील शेतकऱ्यांनी उपोषण केले. पावसाने अद्याप हजेरी लावलेली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना त्यांची पिके जगवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. शेतीसाठी पाण्याची मोठी कमतरता झाली असल्यामुळे वरवंड येथील बेबी कालव्याला २८ जूनपर्यंत २५ व २६ फाट्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, बेबी कालव्याला पाणी सोडले नाही तर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी व ग्रामस्थांनी एक दिवसाचे उपोषण केले. या वेळी लक्ष्मण दिवेकर म्हणाले, की पुणे दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे खडकवासला कालव्याचे पाणी कमी होत चालले आहे. याचा फटका बसला आहे. बेबी कालव्याचे पाणी तीन महिने झाले. दौंड तालुक्यामध्ये आले असूनही वरवंड व कडेठाणपर्यंत पोहोचले नाही. यांकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अशोक फरगडे म्हणाले, की एक महिना होऊनही बेबी कालव्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे या पाटबंधारे विभागाची उदासीनता दिसत आहे. पाटबंधारे विभाग फक्त शहराचा विचार करीत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ते म्हणाले.या वेळी रामदास दिवेकर, अंकुश दिवेकर, नाना श्रीरंग दिवेकर, बाळासोा जगताप, वाल्मीक सातपुते, सतीश राऊत, गुणाजी रणधीर, सतीश दिवेकर, नाना शेळके, मनोहर सातपुते उपस्थित होते. सरपंच संजय खडके, उपसरपंच सुनील सातपुते यांनी उपोषणस्थळी भेट दिली. या उपोषणाला दौंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा योगिनी दिवेकर यांनी पाठिंंबा दिला. या वेळी पाटंबधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी आर. डी. गायकवाड व वरवंड शाखेचे वाघारे यांनी आठ दिवसांमध्ये २५ फाट्याला पाणी सोडण्याचे व २६ फाट्याची दुरुस्ती लवकरात लवकर करून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे.