शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

By admin | Updated: June 29, 2016 01:10 IST

येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेबी कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वरवंड व कडेठाण येथील शेतकऱ्यांनी उपोषण केले.

वरवंड : येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेबी कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वरवंड व कडेठाण येथील शेतकऱ्यांनी उपोषण केले. पावसाने अद्याप हजेरी लावलेली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना त्यांची पिके जगवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. शेतीसाठी पाण्याची मोठी कमतरता झाली असल्यामुळे वरवंड येथील बेबी कालव्याला २८ जूनपर्यंत २५ व २६ फाट्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, बेबी कालव्याला पाणी सोडले नाही तर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी व ग्रामस्थांनी एक दिवसाचे उपोषण केले. या वेळी लक्ष्मण दिवेकर म्हणाले, की पुणे दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे खडकवासला कालव्याचे पाणी कमी होत चालले आहे. याचा फटका बसला आहे. बेबी कालव्याचे पाणी तीन महिने झाले. दौंड तालुक्यामध्ये आले असूनही वरवंड व कडेठाणपर्यंत पोहोचले नाही. यांकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अशोक फरगडे म्हणाले, की एक महिना होऊनही बेबी कालव्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे या पाटबंधारे विभागाची उदासीनता दिसत आहे. पाटबंधारे विभाग फक्त शहराचा विचार करीत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ते म्हणाले.या वेळी रामदास दिवेकर, अंकुश दिवेकर, नाना श्रीरंग दिवेकर, बाळासोा जगताप, वाल्मीक सातपुते, सतीश राऊत, गुणाजी रणधीर, सतीश दिवेकर, नाना शेळके, मनोहर सातपुते उपस्थित होते. सरपंच संजय खडके, उपसरपंच सुनील सातपुते यांनी उपोषणस्थळी भेट दिली. या उपोषणाला दौंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा योगिनी दिवेकर यांनी पाठिंंबा दिला. या वेळी पाटंबधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी आर. डी. गायकवाड व वरवंड शाखेचे वाघारे यांनी आठ दिवसांमध्ये २५ फाट्याला पाणी सोडण्याचे व २६ फाट्याची दुरुस्ती लवकरात लवकर करून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे.