शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

पाण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

By admin | Updated: June 29, 2016 01:10 IST

येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेबी कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वरवंड व कडेठाण येथील शेतकऱ्यांनी उपोषण केले.

वरवंड : येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेबी कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वरवंड व कडेठाण येथील शेतकऱ्यांनी उपोषण केले. पावसाने अद्याप हजेरी लावलेली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना त्यांची पिके जगवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. शेतीसाठी पाण्याची मोठी कमतरता झाली असल्यामुळे वरवंड येथील बेबी कालव्याला २८ जूनपर्यंत २५ व २६ फाट्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, बेबी कालव्याला पाणी सोडले नाही तर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार येथे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी व ग्रामस्थांनी एक दिवसाचे उपोषण केले. या वेळी लक्ष्मण दिवेकर म्हणाले, की पुणे दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे खडकवासला कालव्याचे पाणी कमी होत चालले आहे. याचा फटका बसला आहे. बेबी कालव्याचे पाणी तीन महिने झाले. दौंड तालुक्यामध्ये आले असूनही वरवंड व कडेठाणपर्यंत पोहोचले नाही. यांकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अशोक फरगडे म्हणाले, की एक महिना होऊनही बेबी कालव्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे या पाटबंधारे विभागाची उदासीनता दिसत आहे. पाटबंधारे विभाग फक्त शहराचा विचार करीत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ते म्हणाले.या वेळी रामदास दिवेकर, अंकुश दिवेकर, नाना श्रीरंग दिवेकर, बाळासोा जगताप, वाल्मीक सातपुते, सतीश राऊत, गुणाजी रणधीर, सतीश दिवेकर, नाना शेळके, मनोहर सातपुते उपस्थित होते. सरपंच संजय खडके, उपसरपंच सुनील सातपुते यांनी उपोषणस्थळी भेट दिली. या उपोषणाला दौंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा योगिनी दिवेकर यांनी पाठिंंबा दिला. या वेळी पाटंबधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी आर. डी. गायकवाड व वरवंड शाखेचे वाघारे यांनी आठ दिवसांमध्ये २५ फाट्याला पाणी सोडण्याचे व २६ फाट्याची दुरुस्ती लवकरात लवकर करून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे.