शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

छोट्या व्यावसायिकांवर उपासमारी

By admin | Updated: August 3, 2016 02:40 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदपथावरील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदपथावरील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत वर्षानुवर्षे व्यवसाय करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर राहत्या घरातच बाहेरच्या बाजूला छोटेखानी व्यवसाय करणाऱ्यांवरही गंडांतर आले आहे. त्यामुळे दैनंदिन विक्रीवर पोट असलेल्या शहरातील हजारो छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पदपथ आणि ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करून महापालिकेने पदपथ आणि रस्ते नागरिकांसाठी खुले केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे. फेरीवाल्यांबरोबरच बैठ्या घरांच्या तळमजल्यावर चालणाऱ्या पानाच्या टपऱ्या, वडापाव सेंटर, किराणा मालाचे दुकान, स्टेशनरी, भाजी विक्रेते आदी छोट्या व्यवसायांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी उत्पन्नाचे स्रोत म्हणून आपल्या बैठ्या घरांचे वाढीव बांधकाम करून तळमजल्यावर व्यवसाय सुरू केले आहेत. त्यावरच अनेकांचे घर चालते. मुलांचे शिक्षण होत आहे. अशा परिस्थितीत महापालिका आयुक्तांनी निवासी गाळ्यात सुरू असलेले हे सर्व व्यवसाय बंद करण्याचे फर्मान सोडल्याने शेकडो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, घणसोली, ऐरोली या भागात अल्प उत्पन्न घटकांसाठी सिडकोने मोठ्याप्रमाणात बैठी घरे बांधली आहेत. गेल्या काही वर्षांत या बैठ्या घरांचे अनियोजितरीत्या वाढीव बांधकाम करण्यात आले आहे. तळमजल्याचा वापर छोटेखानी व्यवसायासाठी केला जात आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणत्याही बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र नाही. तसेच निवासी जागेत विनापरवाना व्यवसाय करता येत नाही. ही वस्तुस्थिती असतानाही महापालिका प्रशासनाने मागील वीस वर्षे या प्रकाराकडे कानाडोळा केला. त्याचा परिणाम म्हणून शहरात उपर मकान, निचे दुकान ही प्रवृत्ती बळावली. निवासी जागेत व्यवसाय करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, ही बाबच शहरवासीयांच्या विस्मृतीतून गेली. परंतु उशिरा का होईना, महापालिकेला नियमांची जाणीव झाली आहे. आयुक्तपदाची धुरा स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी सर्वप्रथम वर्षानुवर्षे चालणाऱ्या या नियमबाह्य गोष्टींना लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पदपथावरील फेरीवाल्यांसह निवासी जागेत व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा बजावून व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यवसाय करायचा असेल तर सर्वप्रथम जागेचा चेंज आॅफ युज करून घेण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत. >महापालिकेच्या या भूमिकेमुळे वर्षानुवर्षे निवासी जागेत छोटेखानी व्यवसाय करून आपला परिवार चालविणाऱ्या शेकडो मध्यमवर्गीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने यासंदर्भात निश्चित धोरण तयार करून दिलासा द्यावा, अशी मागणी या व्यावसायिकांकडून होत आहे.