शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

छोट्या व्यावसायिकांवर उपासमारी

By admin | Updated: August 3, 2016 02:40 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदपथावरील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदपथावरील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत वर्षानुवर्षे व्यवसाय करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर राहत्या घरातच बाहेरच्या बाजूला छोटेखानी व्यवसाय करणाऱ्यांवरही गंडांतर आले आहे. त्यामुळे दैनंदिन विक्रीवर पोट असलेल्या शहरातील हजारो छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पदपथ आणि ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करून महापालिकेने पदपथ आणि रस्ते नागरिकांसाठी खुले केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे. फेरीवाल्यांबरोबरच बैठ्या घरांच्या तळमजल्यावर चालणाऱ्या पानाच्या टपऱ्या, वडापाव सेंटर, किराणा मालाचे दुकान, स्टेशनरी, भाजी विक्रेते आदी छोट्या व्यवसायांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी उत्पन्नाचे स्रोत म्हणून आपल्या बैठ्या घरांचे वाढीव बांधकाम करून तळमजल्यावर व्यवसाय सुरू केले आहेत. त्यावरच अनेकांचे घर चालते. मुलांचे शिक्षण होत आहे. अशा परिस्थितीत महापालिका आयुक्तांनी निवासी गाळ्यात सुरू असलेले हे सर्व व्यवसाय बंद करण्याचे फर्मान सोडल्याने शेकडो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, घणसोली, ऐरोली या भागात अल्प उत्पन्न घटकांसाठी सिडकोने मोठ्याप्रमाणात बैठी घरे बांधली आहेत. गेल्या काही वर्षांत या बैठ्या घरांचे अनियोजितरीत्या वाढीव बांधकाम करण्यात आले आहे. तळमजल्याचा वापर छोटेखानी व्यवसायासाठी केला जात आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणत्याही बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र नाही. तसेच निवासी जागेत विनापरवाना व्यवसाय करता येत नाही. ही वस्तुस्थिती असतानाही महापालिका प्रशासनाने मागील वीस वर्षे या प्रकाराकडे कानाडोळा केला. त्याचा परिणाम म्हणून शहरात उपर मकान, निचे दुकान ही प्रवृत्ती बळावली. निवासी जागेत व्यवसाय करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, ही बाबच शहरवासीयांच्या विस्मृतीतून गेली. परंतु उशिरा का होईना, महापालिकेला नियमांची जाणीव झाली आहे. आयुक्तपदाची धुरा स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी सर्वप्रथम वर्षानुवर्षे चालणाऱ्या या नियमबाह्य गोष्टींना लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पदपथावरील फेरीवाल्यांसह निवासी जागेत व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा बजावून व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यवसाय करायचा असेल तर सर्वप्रथम जागेचा चेंज आॅफ युज करून घेण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत. >महापालिकेच्या या भूमिकेमुळे वर्षानुवर्षे निवासी जागेत छोटेखानी व्यवसाय करून आपला परिवार चालविणाऱ्या शेकडो मध्यमवर्गीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने यासंदर्भात निश्चित धोरण तयार करून दिलासा द्यावा, अशी मागणी या व्यावसायिकांकडून होत आहे.