शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे गावांचा संपर्क तुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 04:39 IST

दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती आहे. भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदी व एटापल्ली तालुक्यात आलदंडी

अमरावती/गडचिरोली : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती आहे. भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदी व एटापल्ली तालुक्यात आलदंडी नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने १५० गावांचा संपर्क तुटला आहे.भामरागडजवळ असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची कमी आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली. शनिवारी दुपारच्या सुमारास या पुलावर दोन ते अडीच फूट पाणी होते. त्यामुळे भामरागडसह जवळपास १०० गावांचा संपर्क तुटला आहे. अहेरीजवळच्या गडअहेरी नाल्यावरही अत्यंत कमी उंचीचा पूल आहे. या पुलावरून पाणी वाहत असल्याने तालुक्यातील देवलमरी, कोत्तागुडम, पुसूकपल्ली, संड्रा, चेरपल्ली, आवलमरी, व्यंकटरावपेठा, इंदाराम, आकनपल्ली, काटेपल्ली, कोलपल्ली, कर्नेली, लंकाचेन, वट्रा, चिन्नावट्रा, पेदावट्रा आदी २० गावांचा संपर्क तुटला आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी नदी पुलावरून ७ ते ८ फूट पाणी वाहत असल्याने सुरजागड परिसरातील ७० गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूरच्या कोरपना-परसोडा, नागभीड-जनकापूर, मोहाडी-वासेरा, तळोधी-गांगलवाडी या मार्गांवरील पुलांवर पाणी असल्याने बंद आहेत. सावली तालुक्यात पाच मार्ग बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात तुमसर, साकोली व लाखनी या तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)१२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीयवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा मध्यम प्रकल्प व रूई लघू प्रकल्प अतिवष्टीमुळे ओव्हर फ्लो झाला आहे. यवतमाळला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयाच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ९ तर अमरावती जिल्ह्यात ३ तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. मागील २४ तासांत सर्वाधिक ७२.८ मि.मी. पाऊस यवतमाळ जिल्ह्यात पडला. याशिवाय अमरावती ५८.६, अकोला १७.५, बुलडाणा ५.८, वाशीम जिल्ह्यात २३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शेती पाण्यात, वाहतूक खोळंबलीअमरावती विभागातील बुलडाणा वगळता अन्य चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यातील धामनगाव आणि चांदूर रेल्वे तालुक्यात अतिवृष्टीमुळे किमान २ हजार हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. शुक्रवारी रात्री वर्धा नदीला पूर आल्याने मध्य प्रदेशात जाणारी वाहतूक ४ तास खोळंबली होती.