शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे गावांचा संपर्क तुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 04:39 IST

दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती आहे. भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदी व एटापल्ली तालुक्यात आलदंडी

अमरावती/गडचिरोली : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती आहे. भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदी व एटापल्ली तालुक्यात आलदंडी नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने १५० गावांचा संपर्क तुटला आहे.भामरागडजवळ असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची कमी आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली. शनिवारी दुपारच्या सुमारास या पुलावर दोन ते अडीच फूट पाणी होते. त्यामुळे भामरागडसह जवळपास १०० गावांचा संपर्क तुटला आहे. अहेरीजवळच्या गडअहेरी नाल्यावरही अत्यंत कमी उंचीचा पूल आहे. या पुलावरून पाणी वाहत असल्याने तालुक्यातील देवलमरी, कोत्तागुडम, पुसूकपल्ली, संड्रा, चेरपल्ली, आवलमरी, व्यंकटरावपेठा, इंदाराम, आकनपल्ली, काटेपल्ली, कोलपल्ली, कर्नेली, लंकाचेन, वट्रा, चिन्नावट्रा, पेदावट्रा आदी २० गावांचा संपर्क तुटला आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी नदी पुलावरून ७ ते ८ फूट पाणी वाहत असल्याने सुरजागड परिसरातील ७० गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूरच्या कोरपना-परसोडा, नागभीड-जनकापूर, मोहाडी-वासेरा, तळोधी-गांगलवाडी या मार्गांवरील पुलांवर पाणी असल्याने बंद आहेत. सावली तालुक्यात पाच मार्ग बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात तुमसर, साकोली व लाखनी या तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)१२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीयवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा मध्यम प्रकल्प व रूई लघू प्रकल्प अतिवष्टीमुळे ओव्हर फ्लो झाला आहे. यवतमाळला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयाच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ९ तर अमरावती जिल्ह्यात ३ तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. मागील २४ तासांत सर्वाधिक ७२.८ मि.मी. पाऊस यवतमाळ जिल्ह्यात पडला. याशिवाय अमरावती ५८.६, अकोला १७.५, बुलडाणा ५.८, वाशीम जिल्ह्यात २३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शेती पाण्यात, वाहतूक खोळंबलीअमरावती विभागातील बुलडाणा वगळता अन्य चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यातील धामनगाव आणि चांदूर रेल्वे तालुक्यात अतिवृष्टीमुळे किमान २ हजार हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. शुक्रवारी रात्री वर्धा नदीला पूर आल्याने मध्य प्रदेशात जाणारी वाहतूक ४ तास खोळंबली होती.