शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

झोन बदलासाठी प्रचंड शुल्क

By admin | Updated: May 8, 2015 04:18 IST

महापालिका क्षेत्रांव्यतिरिक्त त्यांना लागून असलेल्या तसेच नगरपालिका आणि ग्राम पंचायतींच्या हद्दीतील जमिनींचा वापर बदलण्यासाठी (झोन चेंज) प्रचंड शुल्क

अमर मोहिते, मुंबईहिट अ‍ॅण्ड रनच्या खटल्याचा निकाल जाहीर केल्यानंतर बहुधा न्यायदेवतेनेही अभिनेता सलमान खानचे आभार मानले असतील़ कारण एक अपघातातील संशयित आरोपी, साक्षीदार व इतर पुरावे उपलब्ध असतानाही या खटल्याचे कामकाज संपण्यासाठी तब्बल १३ वर्षांचा कालावधी लागला़ आपली न्यायदान प्रक्रिया बघितली तर १३ वर्षांच्या कालावधीत अशा अपघाताचा खटला संपून त्यातील आरोपी शिक्षा भोगून कारागृहबाहेर पडला असता़ आता सलमान वयाची पन्नाशीही पूर्ण करणार आहे़ १३ वर्षांत अभिनेता म्हणून यशस्वीरीत्या कामगिरी बजावल्यानंतर खटल्याचा निकाल लागणे याला भाग्यच म्हणावे लागेल. हा खटला प्रलंबित राहण्यासाठी नेमके कोणाला दोषी धरायचे, असा प्रश्न पडला तरी तज्ज्ञ व जाणकार आपली व्यवस्थाच अशी आहे असे बोलून मोकळे होतील़ त्यामुळे डोळ्यावर पटी असलेल्या न्यायदेवतेने सलमानचे आभार मानल्यास ते वावगे ठरणार नाही़ महत्त्वाचे म्हणजे सलमानला शिक्षा झाल्याने पुढील निवडणुकीला याचे के्रडिट घ्यायला राजकीय पक्ष विसरणार नाहीत़मुळात हा खटला अगदी सरळ होता़ म्हणजे यामध्ये काही तांत्रिक पुरावे अथवा अडथळा असणारी एकही गोष्ट नव्हती़ ४ आॅक्टोबर २००२ रोजी अपघात झाला़ रस्त्यावर झोपलेल्या चौघांना एका भरधाव जाणाऱ्या गाडीने चिरडले़ त्यात एकाचा बळी गेला़ आता ही गाडी नेमकी कोण चालवत होता हे सिद्ध करणे एवढीच पोलिसांची जबाबदारी होती़ आणि ती असतेच़ पण या खटल्यात पोलिसांनी व सरकारनेही कमालच केली़ या अपघाताप्रकरणी सुरुवातीला सलमानविरोधात केवळ भरधाव गाडी चालवण्याचाच खटला वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुरू होता़ यात सलमान दोषी आढळला असता तर त्याला किमान दोन वर्षांची शिक्षा झाली असती़ अशा या बहुचर्चित खटल्याचे कामकाज १० ते १२ वर्षे चालल्यानंतर पोलीस व सरकार अचानक झोपेतून जागे झाले आणि सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यासाठी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली़ न्यायालयाने ही मागणी मान्य केली व याचा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला़ सत्र न्यायालयात सलमानचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने ३५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली़ आणि १२, १५ महिन्यांच्या कालावधीत सत्र न्यायालयात या खटल्याचे साक्षी पुरावे व सरकारी तसेच बचाव पक्षाचा युक्तिवादही पूर्ण झाला़ विशेष म्हणजे या १५ वर्षांच्या कालावधीत या खटल्यातील सर्वाधिक महत्त्वाचा साक्षीदार सलमानचा सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार रवींद्र पाटील याचे निधन झाले़ तो एकमेव साक्षीदार होता ज्याने या घटनेची तक्रार नोंदवली व घटना घडली तेव्हा सलमानच गाडी चालवत होता, असेही त्याने जबाबात म्हटले होते़ पाटील सरकारी नोकर असल्याने तो विश्वासार्ह साक्षीदार होता़ त्याच्या व्यतिरिक्त त्या गाडीत सर्व सलमानचे सहकारी होते़ त्यामुळे त्यांची साक्ष किती विश्वासार्ह मानावी हाही प्रश्नच आहे़ असे असूनही पोलिसांनी अथक परिश्रम करून या खटल्याचे कामकाज संपवले, याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे़ आणि न्यायदान जलद करायची घोषणा करणाऱ्या सरकारचा तर यासाठी सत्कारच झाला पाहिजे़ कारण आतापर्यंत खटला प्रलंबित राहण्याची विविध कारणे जगासमोर आहेत़ आरोपी फरार झाला, साक्षीदार सापडत नाहीत किंवा तांत्रिक पुरावे तपासणीसाठी राज्याबाहेर पाठवण्यात आले आहेत, अशा सबबी सरकारी पक्ष पुढे करतो़ तसेच बाजू मांडण्याची संधी दिली नाही़ अमूक अन्याय झाला यांसह अनेक कारणे देऊन बचाव पक्ष खटला प्रलंबित ठेवतात; पण सलमानच्या खटल्यात असे काहीच नव्हते़ तरीही १५ वर्षे खटल्याचे कामकाज संपण्यास लागली आहेत़ सलमानच्या जागी इतर दुसरा कोणी आरोपी असता तर त्याला शिक्षा ठोठावून सरकार व पोलीस आपली पाठ थोपटवत न्यायदानाचा दर कसा वाढत चालला आहे, असा दावा करायला विसरले नसते़ एवढेच काय तर अशा आरोपीला जामीन कसा मिळणार नाही याचीही खबरदारी घेतली असती़ कारण सलमानने मद्यपान केले होते, असाही पोलिसांचा आरोप आहे़ आणि मद्यपान करून गाडी चालवणारा समाजासाठी कसा घातक आहे हे सांगायला पोलीस विसरले नसते़