शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

झोन बदलासाठी प्रचंड शुल्क

By admin | Updated: May 8, 2015 04:18 IST

महापालिका क्षेत्रांव्यतिरिक्त त्यांना लागून असलेल्या तसेच नगरपालिका आणि ग्राम पंचायतींच्या हद्दीतील जमिनींचा वापर बदलण्यासाठी (झोन चेंज) प्रचंड शुल्क

अमर मोहिते, मुंबईहिट अ‍ॅण्ड रनच्या खटल्याचा निकाल जाहीर केल्यानंतर बहुधा न्यायदेवतेनेही अभिनेता सलमान खानचे आभार मानले असतील़ कारण एक अपघातातील संशयित आरोपी, साक्षीदार व इतर पुरावे उपलब्ध असतानाही या खटल्याचे कामकाज संपण्यासाठी तब्बल १३ वर्षांचा कालावधी लागला़ आपली न्यायदान प्रक्रिया बघितली तर १३ वर्षांच्या कालावधीत अशा अपघाताचा खटला संपून त्यातील आरोपी शिक्षा भोगून कारागृहबाहेर पडला असता़ आता सलमान वयाची पन्नाशीही पूर्ण करणार आहे़ १३ वर्षांत अभिनेता म्हणून यशस्वीरीत्या कामगिरी बजावल्यानंतर खटल्याचा निकाल लागणे याला भाग्यच म्हणावे लागेल. हा खटला प्रलंबित राहण्यासाठी नेमके कोणाला दोषी धरायचे, असा प्रश्न पडला तरी तज्ज्ञ व जाणकार आपली व्यवस्थाच अशी आहे असे बोलून मोकळे होतील़ त्यामुळे डोळ्यावर पटी असलेल्या न्यायदेवतेने सलमानचे आभार मानल्यास ते वावगे ठरणार नाही़ महत्त्वाचे म्हणजे सलमानला शिक्षा झाल्याने पुढील निवडणुकीला याचे के्रडिट घ्यायला राजकीय पक्ष विसरणार नाहीत़मुळात हा खटला अगदी सरळ होता़ म्हणजे यामध्ये काही तांत्रिक पुरावे अथवा अडथळा असणारी एकही गोष्ट नव्हती़ ४ आॅक्टोबर २००२ रोजी अपघात झाला़ रस्त्यावर झोपलेल्या चौघांना एका भरधाव जाणाऱ्या गाडीने चिरडले़ त्यात एकाचा बळी गेला़ आता ही गाडी नेमकी कोण चालवत होता हे सिद्ध करणे एवढीच पोलिसांची जबाबदारी होती़ आणि ती असतेच़ पण या खटल्यात पोलिसांनी व सरकारनेही कमालच केली़ या अपघाताप्रकरणी सुरुवातीला सलमानविरोधात केवळ भरधाव गाडी चालवण्याचाच खटला वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुरू होता़ यात सलमान दोषी आढळला असता तर त्याला किमान दोन वर्षांची शिक्षा झाली असती़ अशा या बहुचर्चित खटल्याचे कामकाज १० ते १२ वर्षे चालल्यानंतर पोलीस व सरकार अचानक झोपेतून जागे झाले आणि सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यासाठी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली़ न्यायालयाने ही मागणी मान्य केली व याचा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला़ सत्र न्यायालयात सलमानचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने ३५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली़ आणि १२, १५ महिन्यांच्या कालावधीत सत्र न्यायालयात या खटल्याचे साक्षी पुरावे व सरकारी तसेच बचाव पक्षाचा युक्तिवादही पूर्ण झाला़ विशेष म्हणजे या १५ वर्षांच्या कालावधीत या खटल्यातील सर्वाधिक महत्त्वाचा साक्षीदार सलमानचा सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार रवींद्र पाटील याचे निधन झाले़ तो एकमेव साक्षीदार होता ज्याने या घटनेची तक्रार नोंदवली व घटना घडली तेव्हा सलमानच गाडी चालवत होता, असेही त्याने जबाबात म्हटले होते़ पाटील सरकारी नोकर असल्याने तो विश्वासार्ह साक्षीदार होता़ त्याच्या व्यतिरिक्त त्या गाडीत सर्व सलमानचे सहकारी होते़ त्यामुळे त्यांची साक्ष किती विश्वासार्ह मानावी हाही प्रश्नच आहे़ असे असूनही पोलिसांनी अथक परिश्रम करून या खटल्याचे कामकाज संपवले, याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे़ आणि न्यायदान जलद करायची घोषणा करणाऱ्या सरकारचा तर यासाठी सत्कारच झाला पाहिजे़ कारण आतापर्यंत खटला प्रलंबित राहण्याची विविध कारणे जगासमोर आहेत़ आरोपी फरार झाला, साक्षीदार सापडत नाहीत किंवा तांत्रिक पुरावे तपासणीसाठी राज्याबाहेर पाठवण्यात आले आहेत, अशा सबबी सरकारी पक्ष पुढे करतो़ तसेच बाजू मांडण्याची संधी दिली नाही़ अमूक अन्याय झाला यांसह अनेक कारणे देऊन बचाव पक्ष खटला प्रलंबित ठेवतात; पण सलमानच्या खटल्यात असे काहीच नव्हते़ तरीही १५ वर्षे खटल्याचे कामकाज संपण्यास लागली आहेत़ सलमानच्या जागी इतर दुसरा कोणी आरोपी असता तर त्याला शिक्षा ठोठावून सरकार व पोलीस आपली पाठ थोपटवत न्यायदानाचा दर कसा वाढत चालला आहे, असा दावा करायला विसरले नसते़ एवढेच काय तर अशा आरोपीला जामीन कसा मिळणार नाही याचीही खबरदारी घेतली असती़ कारण सलमानने मद्यपान केले होते, असाही पोलिसांचा आरोप आहे़ आणि मद्यपान करून गाडी चालवणारा समाजासाठी कसा घातक आहे हे सांगायला पोलीस विसरले नसते़