शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी

By admin | Updated: May 30, 2017 11:51 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा यंदाचा बारावीचा निकाल ८९.५० टक्के लागला आहे

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 30 -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१७मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला 

यंदा राज्याच्या नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८९.५० इतकी असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात २.९० टक्क्यांनी वाढ झाली. मुलींनी निकालात सरशी कायम राखली आहे. कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबई विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे. पुणे विभागाचा निकाल ९१.१६ टक्के लागला आहे. 
 
राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची घोषणा राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. बारावीचा आॅनलाईन निकाल मंगळवारी (दि.30) जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना  येत्या ९ जून रोजी दुपारी 3 वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात मुळ गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. 
 
 गेल्या वर्षी राज्याचा बारावीचा निकाल ८६.६० टक्के लागला होता. यावर्षी ८९.५० टक्के निकाल लागल्याने राज्याच्या निकालात २.९० टक्के वाढ झाली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.२० टक्के तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.२१ टक्के लागला आहे.  गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत. यंदा मुलींची निकाल ९३.०५ टक्के तर मुलांची निकाल ८६.६५ टक्के लागला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०१ टक्के लागला आहे
 
पुर्नपरीक्षार्थीचा निकाल ४०.८३ टक्के
राज्याच्या ९ विभागीय मंडळातून ७३ हजार ५९७  पुर्नपरीक्षार्थी बसले होते त्यापैकी २९ हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी ४०. ८३ इतकी आहे.
 
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०१ टक्के लागला आहे. एकूण १६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली त्यापैकी ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण निकालात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ६.४० टक्क्यांनी अधिक आहे.
 

 

निकाल पुढील संकेतस्थळांवर पाहता येतील 

 

मोबाइलवर निकाल 

बीएसएनएल-धारकांनी  MHHSC  असे टाइप करून 57766 या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल प्राप्त होईल.

तसेच आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा मोबाइलधारकांनी MAH12 असे टाइप करून 58888111 या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल मिळू शकेल.

 
विभागीय मंडळ निहाय बारावीचा निकाल 
 
पुणे        -  ९१.१६ टक्के
 
नागपूर   -  ८९.०५ टक्के
 
औरंगाबाद - ८९.८३ टक्के
 
मुंबई         - ८८.२१ टक्के
 
कोल्हापूर   - ९१.४० टक्के
 
अमरावती  - ८९.१२ टक्के
 
नाशिक      -  ८८.२२ टक्के
 
लातूर       -   ८८.२२ टक्के
 
कोकण     -  ९५.२० टक्के

बारावी परीक्षेचा शाखानिहाय निकाल

१. विज्ञान  शाखा              - ९५.८५ टक्के
२. कला  शाखा                 - ८१.९१ टाक्के
३. वाणिज्य शाखा             - ९०.५७ टक्के
४. व्यवसाय अभ्यासक्रम   - ८६.२७ टक्के