ऑनलाइन टीम
पुणे, दि. २ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९० टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीची बाजी मारली असून ९३ टक्के मुली तर ८७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. राज्याचा हा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम निकाल आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यांत घेण्यात आलेल्या या परीक्षेस एकूण ११ लाख विद्यार्थी बसले होते.
कोकण विभागाचा सर्वात जास्त म्हणजेच ९४ टक्के निकाल लागला असून पुण्याचा ९०.७३ टक्के तर मुंबई विभागाचा ८८ टक्के निकाल लागला आहे. www.mahresult.nic,www.maharashtraeducation.com, www.hscresult.mkcl.org, www.rediff. com/exams या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल.
विभागनिहाय निकाल -
कोकण - ९४. ८१ टक्के
अमरावती - ९१.८५ टक्के
कोल्हापूर - ९१. ५४ टक्के
औरंगाबाद - ९०.९८ टक्के
पुणे - ९०.७३ टक्के
लातूर- ९०.६० टक्के
नागपूर - ८९.६०
मुंबई - ८८.३०
नाशिक - ८८.७१ टक्के