शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

मतांसाठी ‘हार्दिक’ लाचारी मराठी मनाला कशी पटेल?

By admin | Updated: February 10, 2017 05:33 IST

भारतीय जनता पार्टीला ‘कोमा’त पाठविण्याचा चंग बांधल्यानंतर शिवसेनेने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोचकारण्यासाठी आणि गुजराती मतांसाठी उचललेला ‘हार्दिक’विडा रंगण्याऐवजी

दिनकर रायकर

मुंबई, दि. 10 - भारतीय जनता पार्टीला ‘कोमा’त पाठविण्याचा चंग बांधल्यानंतर शिवसेनेने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोचकारण्यासाठी आणि गुजराती मतांसाठी उचललेला ‘हार्दिक’विडा रंगण्याऐवजी मराठी जनमनाच्या रंगाचा बेरंग करू पाहत आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना ही ‘हार्दिक’खेळी पटली असती का, असा सवाल खंद्या शिवसैनिकांनाही पडला आहे. ठाकरी भाषेत सांगायचे तर ‘हे मराठी मनाला कसे पटेल’, हा सवाल त्यांना पडू लागला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांचा वारसाच पुढे चालवत असल्याचे शिवसैनिक अभिमानाने सांगतात. पण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाशी असलेले संबंध कडवट झाल्यावर उद्धव यांनी हार्दिक पटेलचे ज्या पद्धतीने स्वागत केले त्याने इतिहास जागविला आहे. तितकीच विसंगतीची जाणीवही. याच मुंबईत भूमिपुत्रांच्या हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना पाळेमुळे घट्ट करू पाहत होती, त्या काळात मराठी अस्मितेसाठी बाळासाहेबांनी मराठीद्वेष्ट्या दाक्षिणात्यांचा आणि गुजराती नेत्यांचा यथेच्छ समाचार घेतला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडू पाहणारे मोरारजी देसाई हे बाळासाहेबांचे सुरुवातीचे लक्ष्य होते. कालांतराने इतर राजकीय पक्षांनी मुंबईची धुरा गुजराती नेत्यांवर सोपविल्यानंतर बाळासाहेबांनी केलेली मार्मिक टीका कमालीची गाजली होती. ‘काँग्रेस’चे रजनी पटेल, ‘जनता’चे शांती पटेल, हे मराठी मनाला कसे पटेल? या त्यांच्या घोषणेने शिवसैनिकांना नवी ऊर्जा दिली होती.

आता याच शिवसेनेने सात गुजराती उमेदवार रिंगणात उतरविले आहेत! बाळासाहेबांना कोणाचाच अनुनय मान्य नव्हता. त्यांनी तो केलाही नाही. पण त्यांचा वारसा चालविणाऱ्या नेतृत्वाने गुजरातेत आरक्षणासाठी लढा पुकारलेल्या हार्दिक पटेलचे केलेले स्वागत ही मूळ भूमिकेशी केलेली प्रतारणा नाही का? बाळासाहेबांना जाती-पातीचे आरक्षण कधीच मान्य नव्हते. त्यांनी कायम आरक्षणविरोधी भूमिका घेतली. आता मात्र पटेलांच्या आरक्षणासाठी गुजरातेत वडवानल पेटवू पाहणारा हार्दिक हा मोदींचा कडवा विरोधक आहे, म्हणून शिवसेनेने जवळ केला. तो गुजरात विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचा चेहराही असणार आहे. बाळासाहेबांच्या हयातीत आसेतु हिमाचल शिवसेनेचा चेहरा एक व एकच राहिला. पन्नाशीतील शिवसेनेने पंचविशीतील हार्दिकला आपला चेहरा बनवावे, ही वैचारिक प्रतारणा नाही का?

बाळासाहेब असताना मुंबईत हार्दिकचे असे स्वागत झाले असते तर त्यांनी कुंचल्याचे बोचरे फटकारेच मारले असते. हार्दिकच्या आरक्षणाच्या राजकारणाला विरोध असणाऱ्या मोठ्या गुजराती वर्गाचा शिवसेनेने विचार केला नाही. गुजराती मतांसाठी मराठी जनमन दुखावेल, याची पर्वा शिवसेनेने केलेली दिसत नाही. रिझर्व्ह बँकेपासून रेल्वेच्या मुख्यालयापर्यंत बऱ्याच गोष्टी गुजरातेत हलविण्याचा घाट असल्याचा आरोप मोदींवर करणाऱ्या उद्धव व शिवसेनेला बुलेट ट्रेन गुजरातेतच का जाणार, असाही प्रश्न पडला आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिकला आपला चेहरा बनवून गुजरातकडे कूच करण्याची कृती मराठी मनाला कशी पटेल, हा प्रश्न शिवसेनेच्या गावीही नसेल?