शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

मतांसाठी ‘हार्दिक’ लाचारी मराठी मनाला कशी पटेल?

By admin | Updated: February 10, 2017 05:33 IST

भारतीय जनता पार्टीला ‘कोमा’त पाठविण्याचा चंग बांधल्यानंतर शिवसेनेने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोचकारण्यासाठी आणि गुजराती मतांसाठी उचललेला ‘हार्दिक’विडा रंगण्याऐवजी

दिनकर रायकर

मुंबई, दि. 10 - भारतीय जनता पार्टीला ‘कोमा’त पाठविण्याचा चंग बांधल्यानंतर शिवसेनेने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोचकारण्यासाठी आणि गुजराती मतांसाठी उचललेला ‘हार्दिक’विडा रंगण्याऐवजी मराठी जनमनाच्या रंगाचा बेरंग करू पाहत आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना ही ‘हार्दिक’खेळी पटली असती का, असा सवाल खंद्या शिवसैनिकांनाही पडला आहे. ठाकरी भाषेत सांगायचे तर ‘हे मराठी मनाला कसे पटेल’, हा सवाल त्यांना पडू लागला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांचा वारसाच पुढे चालवत असल्याचे शिवसैनिक अभिमानाने सांगतात. पण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाशी असलेले संबंध कडवट झाल्यावर उद्धव यांनी हार्दिक पटेलचे ज्या पद्धतीने स्वागत केले त्याने इतिहास जागविला आहे. तितकीच विसंगतीची जाणीवही. याच मुंबईत भूमिपुत्रांच्या हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना पाळेमुळे घट्ट करू पाहत होती, त्या काळात मराठी अस्मितेसाठी बाळासाहेबांनी मराठीद्वेष्ट्या दाक्षिणात्यांचा आणि गुजराती नेत्यांचा यथेच्छ समाचार घेतला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडू पाहणारे मोरारजी देसाई हे बाळासाहेबांचे सुरुवातीचे लक्ष्य होते. कालांतराने इतर राजकीय पक्षांनी मुंबईची धुरा गुजराती नेत्यांवर सोपविल्यानंतर बाळासाहेबांनी केलेली मार्मिक टीका कमालीची गाजली होती. ‘काँग्रेस’चे रजनी पटेल, ‘जनता’चे शांती पटेल, हे मराठी मनाला कसे पटेल? या त्यांच्या घोषणेने शिवसैनिकांना नवी ऊर्जा दिली होती.

आता याच शिवसेनेने सात गुजराती उमेदवार रिंगणात उतरविले आहेत! बाळासाहेबांना कोणाचाच अनुनय मान्य नव्हता. त्यांनी तो केलाही नाही. पण त्यांचा वारसा चालविणाऱ्या नेतृत्वाने गुजरातेत आरक्षणासाठी लढा पुकारलेल्या हार्दिक पटेलचे केलेले स्वागत ही मूळ भूमिकेशी केलेली प्रतारणा नाही का? बाळासाहेबांना जाती-पातीचे आरक्षण कधीच मान्य नव्हते. त्यांनी कायम आरक्षणविरोधी भूमिका घेतली. आता मात्र पटेलांच्या आरक्षणासाठी गुजरातेत वडवानल पेटवू पाहणारा हार्दिक हा मोदींचा कडवा विरोधक आहे, म्हणून शिवसेनेने जवळ केला. तो गुजरात विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचा चेहराही असणार आहे. बाळासाहेबांच्या हयातीत आसेतु हिमाचल शिवसेनेचा चेहरा एक व एकच राहिला. पन्नाशीतील शिवसेनेने पंचविशीतील हार्दिकला आपला चेहरा बनवावे, ही वैचारिक प्रतारणा नाही का?

बाळासाहेब असताना मुंबईत हार्दिकचे असे स्वागत झाले असते तर त्यांनी कुंचल्याचे बोचरे फटकारेच मारले असते. हार्दिकच्या आरक्षणाच्या राजकारणाला विरोध असणाऱ्या मोठ्या गुजराती वर्गाचा शिवसेनेने विचार केला नाही. गुजराती मतांसाठी मराठी जनमन दुखावेल, याची पर्वा शिवसेनेने केलेली दिसत नाही. रिझर्व्ह बँकेपासून रेल्वेच्या मुख्यालयापर्यंत बऱ्याच गोष्टी गुजरातेत हलविण्याचा घाट असल्याचा आरोप मोदींवर करणाऱ्या उद्धव व शिवसेनेला बुलेट ट्रेन गुजरातेतच का जाणार, असाही प्रश्न पडला आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिकला आपला चेहरा बनवून गुजरातकडे कूच करण्याची कृती मराठी मनाला कशी पटेल, हा प्रश्न शिवसेनेच्या गावीही नसेल?