शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

मराठी माणसात फूट पाडणारे विकास कसा करणार?

By admin | Updated: October 10, 2014 03:01 IST

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या निर्मितीतून तमाम मराठी मने एकत्र जोडली. शिवसेनेच्या मुळात मराठी माणसाचे साम्राज्य उभे केले.

कल्याण : स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या निर्मितीतून तमाम मराठी मने एकत्र जोडली. शिवसेनेच्या मुळात मराठी माणसाचे साम्राज्य उभे केले. पण, त्यांच्या हयातीतच दोन भावंडांच्या सत्तेच्या भांडणात मराठी माणूस दुभंगला. ते राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास कसा साधणार, असा सवाल केंद्रीय परराष्ट्रमंत्री, भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी येथे केला.गेली २५ वर्षे महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती होती. या निवडणुकीत ही युती होऊ शकली नाही. भाजपा, भाजपा नेते आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहाचे संबंध लक्षात घेता शिवसेनेवर टीका करणार नाही, असे धोरण भाजपाने जाहीर केले़ पण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली मर्यादा सोडून बोलत आहेत, वागत आहेत, असेही त्या ठाकरे यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख न करता म्हणाल्या.यशवंतराव चव्हाण मैदानात १२ वाजता सभेची वेळ जाहीर केली होती. परंतु, त्यांच्या हेलिकॉप्टरला दोन तास उशीर झाला. महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर अत्यंत कडक शब्दांत टीका करून स्वराज पुढे म्हणाल्या, पूर्वी जो महाराष्ट्र विकसित होता, इतर राज्ये त्याच्याकडे कौतुकाने पाहत़ मात्र, त्याच महाराष्ट्रात आघाडीच्या काळात शेतकरी, पोलीस आत्महत्या करीत आहेत, ही चिंतेची बाब आहे. भ्रष्टाचाराने तर महाराष्ट्रात कळस गाठला आहे. औद्योगिक क्षेत्रात पीछेहाट झाली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे महाराष्ट्राचेच आहेत. तरीही महाराष्ट्रातील कृषीचा दर घटत आहे. परदेशांतून विकासासाठी साहाय्य आले, पण ते महाराष्ट्रात आलेच नाही, अशी अत्यंत कडवट टीका त्यांनी या वेळी तळपत्या उन्हातही केली. (वार्ताहर)