शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मराठी माणसात फूट पाडणारे विकास कसा करणार?

By admin | Updated: October 10, 2014 03:01 IST

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या निर्मितीतून तमाम मराठी मने एकत्र जोडली. शिवसेनेच्या मुळात मराठी माणसाचे साम्राज्य उभे केले.

कल्याण : स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या निर्मितीतून तमाम मराठी मने एकत्र जोडली. शिवसेनेच्या मुळात मराठी माणसाचे साम्राज्य उभे केले. पण, त्यांच्या हयातीतच दोन भावंडांच्या सत्तेच्या भांडणात मराठी माणूस दुभंगला. ते राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास कसा साधणार, असा सवाल केंद्रीय परराष्ट्रमंत्री, भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी येथे केला.गेली २५ वर्षे महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती होती. या निवडणुकीत ही युती होऊ शकली नाही. भाजपा, भाजपा नेते आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहाचे संबंध लक्षात घेता शिवसेनेवर टीका करणार नाही, असे धोरण भाजपाने जाहीर केले़ पण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली मर्यादा सोडून बोलत आहेत, वागत आहेत, असेही त्या ठाकरे यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख न करता म्हणाल्या.यशवंतराव चव्हाण मैदानात १२ वाजता सभेची वेळ जाहीर केली होती. परंतु, त्यांच्या हेलिकॉप्टरला दोन तास उशीर झाला. महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर अत्यंत कडक शब्दांत टीका करून स्वराज पुढे म्हणाल्या, पूर्वी जो महाराष्ट्र विकसित होता, इतर राज्ये त्याच्याकडे कौतुकाने पाहत़ मात्र, त्याच महाराष्ट्रात आघाडीच्या काळात शेतकरी, पोलीस आत्महत्या करीत आहेत, ही चिंतेची बाब आहे. भ्रष्टाचाराने तर महाराष्ट्रात कळस गाठला आहे. औद्योगिक क्षेत्रात पीछेहाट झाली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे महाराष्ट्राचेच आहेत. तरीही महाराष्ट्रातील कृषीचा दर घटत आहे. परदेशांतून विकासासाठी साहाय्य आले, पण ते महाराष्ट्रात आलेच नाही, अशी अत्यंत कडवट टीका त्यांनी या वेळी तळपत्या उन्हातही केली. (वार्ताहर)