शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? याचा भाजपाने विचार करावा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 24, 2016 18:52 IST

कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच या गोष्टीवर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला

ऑनलाइन लोकमत

नाशिक. दि. २४ - कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच या गोष्टीवर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक येथील कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधला. 

भविष्यात युती करायची की नाही, हे शिवसेनाच ठरवेल, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपवर जोरदार टीका केली. तसेच, सत्तेसाठी नव्हे, हिंदुत्वासाठी युती केल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, ह्लभाजपला उत्तर देण्यासाठी मेळावा घेतला आहे का?ह्व तर यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ह्लछोट्या गोष्टींसाठी वाघांना बोलवण्याची गरज नाही.ह्व अशाप्रकारे उद्धव यांनी भाजपवर निशाणा साधला. ह्लमी सरकारच्या विरोधात नाही, जनतेच्या मनातलं बोलतोह्व असे सांगायलाही उद्धव विसरले नाहीत.तमाम महाराष्ट्र तेव्हाच शिवसेनेच्या मागे उभा राहिला असता, तर आज चित्र वेगळं दिसलं असतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय,  भविष्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल अशी खात्री उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्तवाद आम्हाला मान्य असून, त्यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणीही उद्धव यांनी यावेळी केलीठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे: > शिवसेनेला रस्त्यावर उतरायला लागते, कारण केंद्र सरकारवर टीका होते. उत्तराखंड प्रकरणातही अशीच टीका झाली. मित्र म्हणून मित्राला सावध करणे आमचे काम आहे. > युती आहे काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही. युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर होती. परंतु तोही मुद्दा मागे पडला आहे. हिंदुत्त्वाचा मुद्दा मागे पडला तर भाजपसोबत युती करणार नाही, भविष्यात युती करायची की नाही, हे कार्यकर्ते ठरवतील. > तहानलेल्या लोकांना जर पाणी दिले नाही तर सत्ता काय कामाची? म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मित्राला सावध केले. > दुष्काळावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे > कन्हैयाचा जन्म कसा झाला? याचा विचार कारावा. युवकांना देशद्रोह ठरवल्यावर युवकांनी काम कसे करावे? > लहान राज्ये कशासाठी? राष्ट्रपती राजवट लागू करायला? > नाशिक मेळाव्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे होणार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार.⁠⁠