शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? याचा भाजपाने विचार करावा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 24, 2016 18:52 IST

कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच या गोष्टीवर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला

ऑनलाइन लोकमत

नाशिक. दि. २४ - कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच या गोष्टीवर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक येथील कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधला. 

भविष्यात युती करायची की नाही, हे शिवसेनाच ठरवेल, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपवर जोरदार टीका केली. तसेच, सत्तेसाठी नव्हे, हिंदुत्वासाठी युती केल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, ह्लभाजपला उत्तर देण्यासाठी मेळावा घेतला आहे का?ह्व तर यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ह्लछोट्या गोष्टींसाठी वाघांना बोलवण्याची गरज नाही.ह्व अशाप्रकारे उद्धव यांनी भाजपवर निशाणा साधला. ह्लमी सरकारच्या विरोधात नाही, जनतेच्या मनातलं बोलतोह्व असे सांगायलाही उद्धव विसरले नाहीत.तमाम महाराष्ट्र तेव्हाच शिवसेनेच्या मागे उभा राहिला असता, तर आज चित्र वेगळं दिसलं असतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय,  भविष्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल अशी खात्री उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्तवाद आम्हाला मान्य असून, त्यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणीही उद्धव यांनी यावेळी केलीठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे: > शिवसेनेला रस्त्यावर उतरायला लागते, कारण केंद्र सरकारवर टीका होते. उत्तराखंड प्रकरणातही अशीच टीका झाली. मित्र म्हणून मित्राला सावध करणे आमचे काम आहे. > युती आहे काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही. युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर होती. परंतु तोही मुद्दा मागे पडला आहे. हिंदुत्त्वाचा मुद्दा मागे पडला तर भाजपसोबत युती करणार नाही, भविष्यात युती करायची की नाही, हे कार्यकर्ते ठरवतील. > तहानलेल्या लोकांना जर पाणी दिले नाही तर सत्ता काय कामाची? म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मित्राला सावध केले. > दुष्काळावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे > कन्हैयाचा जन्म कसा झाला? याचा विचार कारावा. युवकांना देशद्रोह ठरवल्यावर युवकांनी काम कसे करावे? > लहान राज्ये कशासाठी? राष्ट्रपती राजवट लागू करायला? > नाशिक मेळाव्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे होणार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार.⁠⁠