शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

....यांना ‘जाणता राजा’ कसं म्हणायचं - विनोद तावडे

By admin | Updated: June 26, 2016 21:24 IST

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलेल्या टीकेला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी एका जाहीर समारंभात तडाखेबंद उत्तर दिले.

ऑनलाइन लोकमत 

कोल्हापूर, दि. २६ - राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलेल्या टीकेला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी एका जाहीर समारंभात तडाखेबंद उत्तर दिले. इतिहासातील दाखला देतानाच, ‘यांना जाणता राजा तरी कसं म्हणायचं?’ असा सवालही त्यांनी उपस्थित करताच सभागृहातील उपस्थितांनी हसून दाद दिली. 
 
शाहू पुरस्कार स्वीकारण्यासाठी कोल्हापुरात आलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासाची आठवण सांगताना, छत्रपतींच्या काळात छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत. त्यानंतर पेशवे फडणीसांची नेमणूक करत असत; पण इतिहासात प्रथमच मी फडणवीसांनी छत्रपतींची नेमणूक केल्याचे पाहिले, अशा शब्दांत शरद पवार यांनी  टीकेचे आसूड ओढले होते.
 
पवार यांच्या या टीकेला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी शाहू गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात जोरदार उत्तर दिले. या सोहळ्यात श्रीमंत शाहू महाराज यांनी त्यांच्या भाषणात फडणवीस सरकार शाहूंचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आवजरून सांगितले. शाहू महाराजांनी बहुजन विकासासाठी काम केले, त्याच पद्धतीने राज्यातील व केंद्रातील सरकार काम करताना दिसत आहे. शाहूंच्या विचारांचे कार्य आणि वारसा लक्षात घेऊन पंतप्रधानांच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी संभाजीराजेंना खासदार म्हणून नियुक्त केले, असा कृतज्ञापूर्वक उल्लेख शाहू महाराजांनी केला. 
 
याच भाषणाचा संदर्भ देत शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, हाच मुद्दा काल (शनिवारी) दुपारी तुमच्या वाडय़ावर जेवायला आलेल्या पाहुण्यांना (शरद पवार) सांगितला असता तर संध्याकाळी त्यांच्याकडून नको ती टीका झाली नसती. पूर्वी छत्रपतींच्या काळात जावळीच्या मो-यांना, डफळ्यांना आणि सुप्याच्या मोहित्यांना छत्रपतींचं कधी चांगलं दिसलंच नाही. त्याचीच पुनरावृत्ती काल येथे झाली. कोल्हापूरच्या छत्रपतींचं त्यांना चांगलं काही दिसलंच नाही. 
 
मोदी सरकारनं दिल्लीच्या तख्तावर सन्मानानं संभाजीराजेंची राष्ट्रपतींकडून नियुक्ती केली. या गोष्टीकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला पाहिजे होते. परंतु त्यांना चांगलं काही दिसलंच नसल्याची टीका केली. मग यांना जाणता राजा कसं म्हणायचं? असा सवाल उपस्थित केला.