शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

....यांना ‘जाणता राजा’ कसं म्हणायचं - विनोद तावडे

By admin | Updated: June 26, 2016 21:24 IST

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलेल्या टीकेला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी एका जाहीर समारंभात तडाखेबंद उत्तर दिले.

ऑनलाइन लोकमत 

कोल्हापूर, दि. २६ - राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलेल्या टीकेला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी एका जाहीर समारंभात तडाखेबंद उत्तर दिले. इतिहासातील दाखला देतानाच, ‘यांना जाणता राजा तरी कसं म्हणायचं?’ असा सवालही त्यांनी उपस्थित करताच सभागृहातील उपस्थितांनी हसून दाद दिली. 
 
शाहू पुरस्कार स्वीकारण्यासाठी कोल्हापुरात आलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासाची आठवण सांगताना, छत्रपतींच्या काळात छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत. त्यानंतर पेशवे फडणीसांची नेमणूक करत असत; पण इतिहासात प्रथमच मी फडणवीसांनी छत्रपतींची नेमणूक केल्याचे पाहिले, अशा शब्दांत शरद पवार यांनी  टीकेचे आसूड ओढले होते.
 
पवार यांच्या या टीकेला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी शाहू गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात जोरदार उत्तर दिले. या सोहळ्यात श्रीमंत शाहू महाराज यांनी त्यांच्या भाषणात फडणवीस सरकार शाहूंचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आवजरून सांगितले. शाहू महाराजांनी बहुजन विकासासाठी काम केले, त्याच पद्धतीने राज्यातील व केंद्रातील सरकार काम करताना दिसत आहे. शाहूंच्या विचारांचे कार्य आणि वारसा लक्षात घेऊन पंतप्रधानांच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी संभाजीराजेंना खासदार म्हणून नियुक्त केले, असा कृतज्ञापूर्वक उल्लेख शाहू महाराजांनी केला. 
 
याच भाषणाचा संदर्भ देत शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, हाच मुद्दा काल (शनिवारी) दुपारी तुमच्या वाडय़ावर जेवायला आलेल्या पाहुण्यांना (शरद पवार) सांगितला असता तर संध्याकाळी त्यांच्याकडून नको ती टीका झाली नसती. पूर्वी छत्रपतींच्या काळात जावळीच्या मो-यांना, डफळ्यांना आणि सुप्याच्या मोहित्यांना छत्रपतींचं कधी चांगलं दिसलंच नाही. त्याचीच पुनरावृत्ती काल येथे झाली. कोल्हापूरच्या छत्रपतींचं त्यांना चांगलं काही दिसलंच नाही. 
 
मोदी सरकारनं दिल्लीच्या तख्तावर सन्मानानं संभाजीराजेंची राष्ट्रपतींकडून नियुक्ती केली. या गोष्टीकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला पाहिजे होते. परंतु त्यांना चांगलं काही दिसलंच नसल्याची टीका केली. मग यांना जाणता राजा कसं म्हणायचं? असा सवाल उपस्थित केला.