शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

लाचखोर मोकाट कसे

By admin | Updated: August 19, 2014 01:01 IST

नागपूर आणि अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीची सरासरी ७८ टक्के प्रकरणे निर्दोष ठरून केवळ २२ टक्के प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. संपूर्ण राज्यातील शिक्षेचे प्रमाण २३ टक्के आहे.

रंगलेले हात होताहेत बेरंग : २२ टक्के प्रकरणात शिक्षानागपूर आणि अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीची सरासरी ७८ टक्के प्रकरणे निर्दोष ठरून केवळ २२ टक्के प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. संपूर्ण राज्यातील शिक्षेचे प्रमाण २३ टक्के आहे. राज्यातील विशेष न्यायालयात २००९ मध्ये एकूण ४६६ प्रकरणे निकाली लागून १०६ प्रकरणात शिक्षा आणि ३६० प्रकरणे निर्दोष सुटली. २०१० मध्ये ३५३ प्रकरणे निकाली लागून ६८ मध्ये शिक्षा होऊन २८५ प्रकरणे निर्दोष ठरली. २०११ मध्ये ३८३ प्रकरणांपैकी ९० प्रकरणांमध्ये शिक्षा होऊन २९३ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१२ मध्ये ४९४ प्रकरणांपैकी ११८ मध्ये शिक्षा होऊन ३७६ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१३ मध्ये ३८७ प्रकरणांपैकी ८० मध्ये शिक्षा होऊन ३०७ प्रकरणे निर्दोष ठरली. चालूवर्षी आतापर्यंत १५९ प्रकरणांपैकी ४६ मध्ये शिक्षा होऊन ११३ प्रकरणे निर्दोष ठरली. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि गोंदियाचा समावेश होणाऱ्या नागपूर परिक्षेत्रात २००९ मध्ये ८९ प्रकरणांपैकी २५ मध्ये शिक्षा होऊन ६४ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१० मध्ये ३८ प्रकरणांपैकी ६ मध्ये शिक्षा होऊन ३२ प्रकरणे निर्दोष ठरली. २०११ मध्ये ४८ प्रकरणांपैकी १३ मध्ये शिक्षा होऊन ३५ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१२ मध्ये ३९ प्रकरणांपैकी ७ मध्ये शिक्षा होऊन ३२ प्रकरणे निर्दोष सुटली. २०१३ मध्ये ३५ प्रकरणांपैकी ७ मध्ये शिक्षा होऊन २८ प्रकरणे निर्दोष ठरली. तर चालू वर्षी २०१४ मध्ये आतापर्यंत ३१ पैकी ७ मध्ये शिक्षा आणि २४ प्रकरणे निर्दोष ठरली. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिमचा समावेश होणाऱ्या अमरावती परिक्षेत्रात २००९ मध्ये ३३ प्रकरणांपैकी ७ मध्ये शिक्षा होऊन २६ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१० मध्ये ३४ प्रकरणांपैकी ६ मध्ये शिक्षा होऊन २८ निर्दोष ठरले. २०११ मध्ये ३७ प्रकरणांपैकी ६ मध्ये शिक्षा होऊन ३१ प्रकरणे निर्दोष ठरली. २०१२ मध्ये ६२ प्रकरणांपैकी १७ मध्ये शिक्षा होऊन ४५ निर्दोष ठरली. २०१३ मध्ये ४६ पैकी १५ मध्ये शिक्षा होऊन ३१ निर्दोष ठरली. चालू वर्षी आतापर्यंत १८ प्रकरणांपैकी ३ प्रकरणात शिक्षा होऊन १५ प्रकरणे निर्दोष ठरली. ३०२ प्रकरणे मंजुरीविना अडलीसंबंधित आरोपीविरुद्ध न्यायालयात लाचखोरीचा खटला दाखल करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला शासनाची मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी मोठा विलंब होतो. काही प्रकरणात मंजुरीच मिळत नसल्याने त्याचा फायदा आरोपीला मिळतो. मंजुरीस लागणाऱ्या विलंबाचा फायदाही आरोपीला होतो. शासनाकडे मंजुरीसाठी राज्यातीलच एकूण ३०२ प्रकरणे असून त्यापैकी १११ प्रकरणे ९० दिवसांच्या वरची तर १९१ प्रकरणे ९० दिवसांच्या खालची आहेत. या विलंबामुळे ही प्रकरणे न्यायालयांमध्ये दाखल होऊ शकली नाहीत. यात महसूल विभागाची ८३, गृह विभागाची ६९, नगर रचना, महानगरपालिकांची ३४, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींची ३० प्रकरणे आहेत.