शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वीज अनुशेष दूर होणार कसा?

By admin | Updated: January 6, 2015 00:58 IST

विकासाच्या सर्वच बाबतीत अन्याय होत असताना प्रस्तावित संरचना विकास योजनेतदेखील विदर्भाकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. या योजनेसाठी विदर्भातील ११ जिल्हे मिळून अवघ्या ८७९ कोटी

संरचना विकास योजनेसाठी अवघे ८७९ कोटी नागपूर : विकासाच्या सर्वच बाबतीत अन्याय होत असताना प्रस्तावित संरचना विकास योजनेतदेखील विदर्भाकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. या योजनेसाठी विदर्भातील ११ जिल्हे मिळून अवघ्या ८७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्राला मिळणारा वाटा १,८९८ कोटी रुपये इतका आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एकट्या बारामती विभागाला ९५५ कोटी रुपये मिळणार आहेत. विदर्भाच्या विकासाला खीळ घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आला आहे.विशेष म्हणजे विदर्भात वीजनिर्मितीचे मोठे प्रकल्प आहेत. ‘महाजेनको’ची ४० टक्के वीज या भागातच तयार होते. पण फक्त १४ टक्केच अनुदानाचा लाभ या भागाला मिळतो. राज्यातील सुमारे ५५ टक्के वीज विदर्भात निर्माण होते. परंतु येथील ग्रामीण भागातील लोकांनाच चक्क १८-१८ तासांच्या लोडशेडिंगचा सामना करावा लागतो. महावितरणतर्फे संरचना विकास योजनेंतर्गत २०१२-१३ ते २०१५-१६ या कालावधीसाठी ५,५५६ कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च आराखडा तयार करण्यात आला आहे. यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी १,८९८.९७ कोटी, उत्तर महाराष्ट्राच्या तीन जिल्ह्यांसाठी १०७२.१४ कोटी, मुंबई-ठाण्यातील तीन जिल्ह्यांसाठी ७५२.८१ कोटी इतका वाटा निर्धारित करण्यात आला. एकूण रकमेनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला १५७ कोटी रुपयांचा वाटा मिळायला हवा. परंतु विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या हाती प्रत्यक्षात ७९.९२ कोटी रुपये इतकाच वाटा येत आहे.याशिवाय वीजनिर्मिती प्रकल्पांमुळे विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रदूषणाची पातळीदेखील वाढली आहे. येथे १३२ खासगी वीज प्रकल्प प्रस्तावित आहेत. याचाच अर्थ उत्पादनासोबत निर्यात आणि प्रदूषणाचे प्रमाणदेखील वाढीस लागेल. जमीन इथली, पाणी इथले अन् फायदा दुसऱ्या प्रदेशांना हा विदर्भावर अन्याय आहे, असे मत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)वेगळा विदर्भ हाच उपायराज्यावर आज प्रचंड कर्जाचा बोजा आहे. अशास्थितीत वीज अनुशेष दूर करणे ही अशक्यप्राय बाब आहे. यावर वेगळा विदर्भ करणे हाच उपाय आहे. परंतु वेगळा विदर्भ केल्यास महाराष्ट्र अंधारात बुडेल आणि पुणे-मुंबईचे कारखाने बंद पडतील, अशी भीती राज्यकर्त्यांना आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला वीज पुरवणाऱ्या विदर्भाला अंधारातच ठेवण्याचा हा डाव आहे का, असा प्रश्न विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.