शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

15 वर्षात वाढून ठेवलेले महिन्यात कसे नीट करणार?

By admin | Updated: December 10, 2014 01:33 IST

अधिवेशनाच्या दुस:या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज काँग्रेस-राष्ट्रवादीने गदारोळ करून बंद पाडले.

अधिवेशनाच्या दुस:या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज काँग्रेस-राष्ट्रवादीने गदारोळ करून बंद पाडले. संसदीय कामकाज मंत्री           गिरीश बापट यांनी या एकूण कामकाजाविषयी विरोधकांवर राजकारणाचा आरोप केला आहे. त्यांच्याशी झालेली ही बातचीत.
प्रश्न : विरोधकांना आज बहिष्काराची भूमिका का घ्यावी लागली? सरकार घाबरले का?
बापट : मंगळवारी सत्ताधारी पक्षाने ठराव मांडण्याचा दिवस असतो. त्यानुसार आम्ही 293 अन्वये प्रस्ताव दिला होता. तो मराठवाडा, विदर्भातील दुष्काळाच्या संदर्भात होता. सरकार चर्चेला तयार होते. आमच्या वतीने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दोन तासच नाही तर दोन दिवस आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत हे सभागृहात सांगितले होते. मात्र विरोधकांना यावर राजकारण करायचे होते. त्यांना चर्चा नको होती म्हणून त्यांनी सभागृहात गोंधळ घातला आणि दिवसभराचे काम बंद पाडले.
प्रश्न : पण तुम्ही जाणूनबुजून याच विषयावरचा प्रस्ताव आणला असे वाटत नाही का?
बापट : सत्ताधारी पक्षाला आठवडय़ातून एक दिवस प्रस्ताव मांडण्याची परवानगी असते. त्यासाठी मंगळवार ठरवलेला आहे. आम्ही त्यानुसारच प्रस्ताव मांडला. विरोधकांना यावर चर्चाच करायची होती तर आज पुरवणी मागण्या देखील होत्या. त्यात शेतक:यांना द्यावयाचे पैसे, मदत यावर ते बोलू शकले असते. मात्र त्यांनी ते देखील केले नाही. आधी पॅकेज जाहीर करा नंतर चर्चा करा, अशी त्यांची मागणी होती. चर्चा न करताच पॅकेज जाहीर केले तर मग चर्चा कशाची करायची? पण याचेही उत्तर त्यांच्याकडे नव्हते.
प्रश्न : तुम्हीदेखील प्रस्तावाचा मसुदा करताना मावळत्या सरकारला डिवचले नाही का? तुम्ही सुध्दा तर यात राजकारण आणलेच ना.
बापट : मुळात काल काढलेल्या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर दुस:या दिवशीदेखील आम्ही सभागृहाचे कामकाज शेतक:यांसाठी बंद पाडले असे चित्र त्यांना निर्माण करायचे होते. 15 वर्षात या सरकारने जे काही करुन ठेवले आहे त्याचाच तर परिपाक दुष्काळसारख्या प्रश्नात आहे. त्यांनी एवढी वर्षे जे करुन ठेवले ते एक महिन्यात कसे काय दुरुस्त करणार? राजकारणाच्या वेळी जरूर राजकारण करा, मात्र जेथे लोकांच्या भल्याचा विषय आहे तेथे तरी विरोधकांनी राजकारण आणून आजचा महत्त्वाचा दिवस वाया घालवला आहे. सरकारला मात्र यावर राजकारण करायचे नव्हते. न्याय द्यायचा होता. मात्र शेतक:यांच्या दु:खाचे राजकारण विरोधकांनी केले आहे जे अत्यंत चुकीचे आहे.
प्रश्न : उद्या काय होणार की असेच चित्र राहील?
बापट : याचे उत्तर विरोधकांनीच द्यायला हवे. जर त्यांना खरोखरीच शेतक:यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घ्यावा. उद्याही ते आजच्यासारखाच गोंधळ करणार असतील तर मी काय सांगू शकतो. जनता शहाणी आहे यावर आपला विश्वास आहे.