शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत एका कुटुंबाकडे किती गाड्या असाव्यात?

By admin | Updated: September 28, 2016 01:45 IST

मुंबईत वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यातच भर म्हणून दरदिवशी १३०० ते १४०० नवीन वाहनांची खरेदी केली जाते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी

मुंबई : मुंबईत वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यातच भर म्हणून दरदिवशी १३०० ते १४०० नवीन वाहनांची खरेदी केली जाते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मुंबईतील एका कुटुंबाने जास्तीत जास्त किती वाहने खरेदी करावीत, याबाबत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार करावा, अशी सूचना मंगळवारी उच्च न्यायालयाने केली. त्याशिवाय सरकार जलवाहतुकीचाही पर्याय निवडणार का, अशी विचारणाही न्यायालयाने केली.दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने सरकारने २००८ मध्ये उड्डाणपुलाखाली वाहने पार्किंग बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. परिणामी, मुंबईत वाहतूककोंडीची समस्या अधिक बिकट झाली. मुंबई, ठाणे, नवी मुंबईला सरकारच्या या निर्णयाचा फटका बसत आहे. त्यामुळे सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रशांत पोळेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे झाली.गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा उड्डाणपुलाखाली पार्किंगची सुविधा सुरू करणार का, अशी विचारणा सरकारकडे केली होती. मात्र, मंगळवारच्या सुनावणीत राज्य सरकार याबाबत काही उत्तर न देऊ शकल्याने, खंडपीठाने पुन्हा तोच प्रश्न सरकारला केला. ‘उड्डाणपुलाखाली पार्किंग न करण्याच्या धोरणावर सरकारने पुनर्विचार करावा. सरकारने दिलेले सुरक्षेचे कारण कायम आहे का,’ अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने सरकारवर केली.‘मुंबईत वाहतूककोंडीची समस्या मोठी आहे. पूर्वी विमानतळावर पोहोचण्यासाठी अर्धा तास लागायचा. मात्र, आता तीन तास लागतात. शहराचे पूर्व व पश्चिम भाग नीट जोडले गेलेले नाहीत.अंधेरी, जुहू आणि वांद्रे ते बोरीवलीला जाण्यास खूप वेळ लागतो,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. (प्रतिनिधी) वाहतूक समस्येला तोंड कसे देणार?मुंबईत दररोज १३०० ते १४०० नवीन वाहनांची नोंदणी केली जाते आणि नजीकच्या काळात ही संख्या आणखी वाढेल. या समस्येला सरकार तोंड कसे देणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली.जलवाहतूकही शक्य आहे का? अशी विचारणाही न्यायालयान केली. गृहविभाग, शहर विकास विभाग, परिवहन विभाग, आरटीओ व अन्य संबंधित विभागांच्या सचिवांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी कोंडीवर तोडगा काढण्यास काय पावले उचलली आहेत? याची माहिती १९ आॅक्टोबरपर्यंत देण्याचे आदेश दिले.