शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

मुंबईत एका कुटुंबाकडे किती गाड्या असाव्यात?

By admin | Updated: September 28, 2016 01:45 IST

मुंबईत वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यातच भर म्हणून दरदिवशी १३०० ते १४०० नवीन वाहनांची खरेदी केली जाते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी

मुंबई : मुंबईत वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यातच भर म्हणून दरदिवशी १३०० ते १४०० नवीन वाहनांची खरेदी केली जाते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मुंबईतील एका कुटुंबाने जास्तीत जास्त किती वाहने खरेदी करावीत, याबाबत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार करावा, अशी सूचना मंगळवारी उच्च न्यायालयाने केली. त्याशिवाय सरकार जलवाहतुकीचाही पर्याय निवडणार का, अशी विचारणाही न्यायालयाने केली.दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने सरकारने २००८ मध्ये उड्डाणपुलाखाली वाहने पार्किंग बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. परिणामी, मुंबईत वाहतूककोंडीची समस्या अधिक बिकट झाली. मुंबई, ठाणे, नवी मुंबईला सरकारच्या या निर्णयाचा फटका बसत आहे. त्यामुळे सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रशांत पोळेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे झाली.गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा उड्डाणपुलाखाली पार्किंगची सुविधा सुरू करणार का, अशी विचारणा सरकारकडे केली होती. मात्र, मंगळवारच्या सुनावणीत राज्य सरकार याबाबत काही उत्तर न देऊ शकल्याने, खंडपीठाने पुन्हा तोच प्रश्न सरकारला केला. ‘उड्डाणपुलाखाली पार्किंग न करण्याच्या धोरणावर सरकारने पुनर्विचार करावा. सरकारने दिलेले सुरक्षेचे कारण कायम आहे का,’ अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने सरकारवर केली.‘मुंबईत वाहतूककोंडीची समस्या मोठी आहे. पूर्वी विमानतळावर पोहोचण्यासाठी अर्धा तास लागायचा. मात्र, आता तीन तास लागतात. शहराचे पूर्व व पश्चिम भाग नीट जोडले गेलेले नाहीत.अंधेरी, जुहू आणि वांद्रे ते बोरीवलीला जाण्यास खूप वेळ लागतो,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. (प्रतिनिधी) वाहतूक समस्येला तोंड कसे देणार?मुंबईत दररोज १३०० ते १४०० नवीन वाहनांची नोंदणी केली जाते आणि नजीकच्या काळात ही संख्या आणखी वाढेल. या समस्येला सरकार तोंड कसे देणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली.जलवाहतूकही शक्य आहे का? अशी विचारणाही न्यायालयान केली. गृहविभाग, शहर विकास विभाग, परिवहन विभाग, आरटीओ व अन्य संबंधित विभागांच्या सचिवांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी कोंडीवर तोडगा काढण्यास काय पावले उचलली आहेत? याची माहिती १९ आॅक्टोबरपर्यंत देण्याचे आदेश दिले.