शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना झापणार तरी किती वेळा?

By admin | Updated: December 19, 2015 03:56 IST

पारदर्शी आणि गतिमान प्रशासनाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची वर्षपूर्ती झाली असली तरी प्रशासन मात्र अजून ढिम्मच आहे.

- अतुल कुलकर्णी,  नागपूर

पारदर्शी आणि गतिमान प्रशासनाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची वर्षपूर्ती झाली असली तरी प्रशासन मात्र अजून ढिम्मच आहे. मंत्रालयच नव्हे, तर जिल्हास्तरावरीलही फायली हलत नसल्याने मुख्यमंत्र्यांचा संताप अनावर झाला आहे. विदर्भातील विकासकामाच्या आढावा बैठकीत प्रशासनाची ढिलाई समोर आल्याने फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. विदर्भातील विकासकामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी घेतला. वर्षभरात एकाही जिल्हाधिकाऱ्याने आढावा बैठक घेतली नसल्याचे निदर्शनास येताच मुख्यमंत्र्यांचा पारा चढला. विदर्भात अधिवेशन असते म्हणून तुम्ही लोक पिकनिकला येता काय, गेल्या वर्षीच्या अधिवेशनात झालेल्या निर्णयांवर पुढे काहीच का झाले नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे समजते. यापुढे राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आढावा बैठकीचे अहवाल पाठवणे सक्तीचे करा,असा आदेश त्यांनी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांना दिला. अधिवेशनानंतर प्रशासनात मोठे ‘आॅपरेशन’ करण्याचे सुतोवाचही फडणवीस यांनी या बैठकीत केल्याचे समजते.सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या यवतमाळ जिल्ह्णाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जिल्ह्णातील सगळ्या धरणांमध्ये पाणी असतानाही कॅनॉल करणे, चाऱ्या करुन त्यात पाणी सोडण्याचे निर्णय अधिकाऱ्यांनी घेतले नाहीत. विशेष म्हणजे, या कामांसाठी निधी असूनही तो अखर्चिक राहिल्याचे सांगण्यात आल्यानंतर वर्षभर तुम्ही केले तरी काय? असा संतप्त सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. एकाही अधिकाऱ्याला त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही.हीच अवस्था अमरावती, वर्धा जिल्ह्णाच्या बैठकांमध्ये दिसून आली. शेतकऱ्यांच्या सोसायट्या होत नाहीत, पाणी वापर संस्था होत नाहीत, निधी असूनही या कारणांमुळे तो वापरता येत नाही. विदर्भ विकास मंडळाकडे सगळे प्रस्ताव पाठवावे लागतात, तेथे काही अडचणी काढून ते परत पाठवले जातात, त्यांच्याही बैठका नियमित होत नाहीत, प्रस्ताव परिपूर्ण पाठवले जात नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे जवळपास सगळे अधिकारी देत होते, असे बैठकीला उपस्थित असल्याचे सुत्रांकडून समजते.पिकनिकला येता काय?एका कॅनॉलची फाईल तर वर्षभर फिरत राहिली. ज्या कॅनॉलची अलाईनमेंट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मागच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते ते काम हे अधिवेशन संपत आले तरीही झालेले नाही असे सांगण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पारा चढला. आढावा घेण्याचे काम फक्त माझेच आहे का? जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कशासाठी आहेत? नागपूरला येता म्हणजे काय पिकनिकला येता काय, अशा प्रश्नांची सरबत्ती फडणवीस यांनी केली. या बैठकांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी हजर होते.शेतकऱ्यांच्या सोसायट्या होत नाहीत, पाणी वापर संस्था होत नाहीत, निधी असूनही या कारणांमुळे तो वापरता येत नाही. विदर्भ विकास मंडळाकडे सगळे प्रस्ताव पाठवावे लागतात, तेथे काही अडचणी काढून ते परत पाठवले जातात, प्रस्ताव परिपूर्ण पाठवले जात नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे सगळे अधिकारी देत होते.