शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

आणखी किती जीव जाण्याची वाट बघणार? ,उच्च न्यायालय संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 04:09 IST

रस्त्यांची खराब अवस्था व खड्ड्यांमुळे पावसाळ्यात मुंबईत २० जणांचा मृत्यू झाला. यावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले.

मुंबई : रस्त्यांची खराब अवस्था व खड्ड्यांमुळे पावसाळ्यात मुंबईत २० जणांचा मृत्यू झाला. यावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले. ‘पुढील पावसाळ्यापर्यंत किती जणांना मृत्यूच्या खाईत ढकलणार?’, असा उपरोधिक सवाल न्यायालयाने मुंबई मनपाला केला.ही स्थिती केवळ मुंबई महापालिकेची नाही, तर राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपरिषदांची आहे. त्यामुळे आम्ही त्या सर्वांना प्रतिवादी करत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मुंबईतील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत विद्यमान न्यायाधीश गौतम पटेल यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहून कळवले. न्यायालयाने याचे जनहित याचिकेत रूपांतर केले. ‘मुंबईतील रस्त्यांवरून प्रवास करणे, नकोसे वाटते. मुंबईच्या रस्त्यांच्या दुर्दशेवरून राज्यातील रस्त्यांचा अंदाज आला आहे,’ अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.‘उद्यापासून मीच माझ्या नेहमीच्या रस्त्यावर किती खड्डे लागतात, याची मोजदाद करेन, असे प्रत्येक मुंबईकराने केले तर मुंबईत किती खड्डे आहेत ते कळेल आणि महापालिकेलाही ते समजेल,’ असेही न्यायालयाने म्हटले. त्यावर महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी आतापर्यंत ५०० तक्रारी आल्याचे सांगताच; न्यायालयाने, ‘तक्रारी किती आल्या? यापेक्षा किती तक्रारींचे निवारण केलेत? ते सांगा,’ असा सवाल केला.खड्ड्यांची तक्रार करण्याचे आवाहनखड्ड्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी समिती असल्याचे साखरे यांनी सांगताच, न्यायालयाने समिती अस्तित्वात आल्यानंतर किती जणांचा मृत्यू झाला? याची माहिती मागितली. तुमच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आम्हालाच देखरेख समिती नियुक्त करावी लागेल. तुमच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असे न्यायालयाने म्हटले.परिसरातील खराब रस्त्यांची तक्रार महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाकडे करण्याचे आवाहन न्यायालयाने नागरिकांना केले. यासंबंधी अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने प्राधिकरणाला दिले.