शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
5
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
6
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
9
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
10
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
11
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
13
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
14
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
15
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
16
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
18
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
19
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
20
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

आणखी किती जीव जाण्याची वाट बघणार? ,उच्च न्यायालय संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 04:09 IST

रस्त्यांची खराब अवस्था व खड्ड्यांमुळे पावसाळ्यात मुंबईत २० जणांचा मृत्यू झाला. यावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले.

मुंबई : रस्त्यांची खराब अवस्था व खड्ड्यांमुळे पावसाळ्यात मुंबईत २० जणांचा मृत्यू झाला. यावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले. ‘पुढील पावसाळ्यापर्यंत किती जणांना मृत्यूच्या खाईत ढकलणार?’, असा उपरोधिक सवाल न्यायालयाने मुंबई मनपाला केला.ही स्थिती केवळ मुंबई महापालिकेची नाही, तर राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपरिषदांची आहे. त्यामुळे आम्ही त्या सर्वांना प्रतिवादी करत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मुंबईतील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत विद्यमान न्यायाधीश गौतम पटेल यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहून कळवले. न्यायालयाने याचे जनहित याचिकेत रूपांतर केले. ‘मुंबईतील रस्त्यांवरून प्रवास करणे, नकोसे वाटते. मुंबईच्या रस्त्यांच्या दुर्दशेवरून राज्यातील रस्त्यांचा अंदाज आला आहे,’ अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.‘उद्यापासून मीच माझ्या नेहमीच्या रस्त्यावर किती खड्डे लागतात, याची मोजदाद करेन, असे प्रत्येक मुंबईकराने केले तर मुंबईत किती खड्डे आहेत ते कळेल आणि महापालिकेलाही ते समजेल,’ असेही न्यायालयाने म्हटले. त्यावर महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी आतापर्यंत ५०० तक्रारी आल्याचे सांगताच; न्यायालयाने, ‘तक्रारी किती आल्या? यापेक्षा किती तक्रारींचे निवारण केलेत? ते सांगा,’ असा सवाल केला.खड्ड्यांची तक्रार करण्याचे आवाहनखड्ड्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी समिती असल्याचे साखरे यांनी सांगताच, न्यायालयाने समिती अस्तित्वात आल्यानंतर किती जणांचा मृत्यू झाला? याची माहिती मागितली. तुमच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आम्हालाच देखरेख समिती नियुक्त करावी लागेल. तुमच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असे न्यायालयाने म्हटले.परिसरातील खराब रस्त्यांची तक्रार महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाकडे करण्याचे आवाहन न्यायालयाने नागरिकांना केले. यासंबंधी अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने प्राधिकरणाला दिले.