शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

आणखी किती जीव जाण्याची वाट बघणार? ,उच्च न्यायालय संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 04:09 IST

रस्त्यांची खराब अवस्था व खड्ड्यांमुळे पावसाळ्यात मुंबईत २० जणांचा मृत्यू झाला. यावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले.

मुंबई : रस्त्यांची खराब अवस्था व खड्ड्यांमुळे पावसाळ्यात मुंबईत २० जणांचा मृत्यू झाला. यावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले. ‘पुढील पावसाळ्यापर्यंत किती जणांना मृत्यूच्या खाईत ढकलणार?’, असा उपरोधिक सवाल न्यायालयाने मुंबई मनपाला केला.ही स्थिती केवळ मुंबई महापालिकेची नाही, तर राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपरिषदांची आहे. त्यामुळे आम्ही त्या सर्वांना प्रतिवादी करत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मुंबईतील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत विद्यमान न्यायाधीश गौतम पटेल यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहून कळवले. न्यायालयाने याचे जनहित याचिकेत रूपांतर केले. ‘मुंबईतील रस्त्यांवरून प्रवास करणे, नकोसे वाटते. मुंबईच्या रस्त्यांच्या दुर्दशेवरून राज्यातील रस्त्यांचा अंदाज आला आहे,’ अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.‘उद्यापासून मीच माझ्या नेहमीच्या रस्त्यावर किती खड्डे लागतात, याची मोजदाद करेन, असे प्रत्येक मुंबईकराने केले तर मुंबईत किती खड्डे आहेत ते कळेल आणि महापालिकेलाही ते समजेल,’ असेही न्यायालयाने म्हटले. त्यावर महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी आतापर्यंत ५०० तक्रारी आल्याचे सांगताच; न्यायालयाने, ‘तक्रारी किती आल्या? यापेक्षा किती तक्रारींचे निवारण केलेत? ते सांगा,’ असा सवाल केला.खड्ड्यांची तक्रार करण्याचे आवाहनखड्ड्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी समिती असल्याचे साखरे यांनी सांगताच, न्यायालयाने समिती अस्तित्वात आल्यानंतर किती जणांचा मृत्यू झाला? याची माहिती मागितली. तुमच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आम्हालाच देखरेख समिती नियुक्त करावी लागेल. तुमच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असे न्यायालयाने म्हटले.परिसरातील खराब रस्त्यांची तक्रार महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाकडे करण्याचे आवाहन न्यायालयाने नागरिकांना केले. यासंबंधी अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने प्राधिकरणाला दिले.