शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

‘आणखी किती कारागृहे आवश्यक?’

By admin | Updated: January 6, 2017 04:22 IST

विकसित देशांमध्ये सुविधांनी परिपूर्ण अशी आदर्श कारागृहे उभारल्याने, राज्य सरकारने त्याच धर्तीवर राज्यातही आदर्श कारागृहे उभारण्याचा विचार करावा.

मुंबई : विकसित देशांमध्ये सुविधांनी परिपूर्ण अशी आदर्श कारागृहे उभारल्याने, राज्य सरकारने त्याच धर्तीवर राज्यातही आदर्श कारागृहे उभारण्याचा विचार करावा. अंडरट्रायल्स आणि अटक करण्याची संख्या पाहता, राज्यात आणखी किती कारागृहांची आवश्यकता आहे? असा प्रश्न करत, उच्च न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारला वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याची सूचना केली. सरकारने स्वत:हून पुढाकार घेतला नाही, तर आम्हीच आदेश देऊ, असेही उच्च न्यायालयाने गुरुवारच्या सुनावणीत स्पष्ट केले.एकीकडे अटकेचे आणि अंडट्रायल्सचे प्रमाण वाढत आहे, तर दुसरीकडे कारागृहांची क्षमता अपुरी पडत आहे. जुन्या पद्धतीने उभारण्यात आलेले कारागृह आणि सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत विचार करणे आवश्यक आहे. भविष्याचा विचार करून राज्यातील कारागृहांची संख्या वाढवणे आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे, असे मत अ‍ॅड. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीत व्यक्त केले. ‘सध्या राज्यातील कारागृहांत किती अंडरट्रायल्स आहेत? भविष्यातील गरजा काय आहेत? कोणत्या सुविधा पुरवणे आवश्यक आहे? राज्य सरकारने या बाबींवर कधी विचार केला आहे का?’ अशा प्रश्नांची सरबत्तीही या वेळी उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांवर केली.(प्रतिनिधी)