शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

आयटीआयमधील शेकडो विद्यार्थी एकाच विषयात कसे काय नापास ?

By admin | Updated: November 18, 2016 16:22 IST

ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील शासकीय तंत्रनिकेतन अर्थात आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे साडेचारशे विद्यार्थांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 18 -  ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील शासकीय तंत्रनिकेतन अर्थात  आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे साडेचारशे विद्यार्थांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना एकाच विषयात नापास करण्यात आले आहे. दरम्यान या  विद्यार्थांवरील अन्यायाची माहिती मिळताच आ. जितेंद्र आव्हाड यांनी आयटीआयमध्ये जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यावेळी व्यवस्थापनाने सदर विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा तपासण्याचे आश्वासन दिले. 
वागळे इस्टेट येथील आयटीआयमध्ये सुमारे पाचशे ते साडे पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी या पूर्वीच्या सर्व परिक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. मात्र नुकत्याच घेतलेल्या  सहामाही परिक्षेत या मुलांना थिअरी या एकाच विषयात नापास करण्यात आले आहे.  विशेष म्हणजे केवळ 20 ते 25 विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे.  विद्यार्थ्यांनी या संदर्भात प्राचार्यांशी संपर्क साधला असता प्राचार्यांनी सदर विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शैक्षणिक वर्ष धोक्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आपली कैफियत मांडली. 
आ. जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ आयटीआयवर धडक दिली. मात्र त्याठिकाणी प्राचार्य उपस्थित नसल्याने आ. आव्हाड  यांनी संताप व्यक्त करून प्राचार्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. या विद्यार्थ्यांना त्यांचे पेपर पुन्हा  तपासून द्यावे,  अशी मागणी केली. तसेच सोमवारपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय न दिल्यास तीव्र  आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.  
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित पवार , नगरसेवक अमित सरय्या आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.