शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

ब्राह्मणांचे कर्तृत्व किती दिवस झाकणार?

By admin | Updated: March 21, 2015 00:22 IST

‘आम्ही सारे ब्राह्मण’ या पाक्षिकाच्या चवथ्या वर्धापनानिमित्त निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचा ब्राह्मण भूषण पुरस्काराने पुरंदरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

पुणे : ब्राह्मणांनी ़इतिहासात गाजविलेले कर्तृत्व किती दिवस झाकून ठेवले जाणार आहे, असा प्रश्न उपस्थित करतानाच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुद्धी आणि प्रतिभा असलेल्या ब्राह्मणांनी प्रचंड महत्त्वाकांक्षी असले पाहिजे, अशी अपेक्षा आज येथे व्यक्त केली. ‘आम्ही सारे ब्राह्मण’ या पाक्षिकाच्या चवथ्या वर्धापनानिमित्त निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचा ब्राह्मण भूषण पुरस्काराने पुरंदरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ‘आम्ही सारे ब्राह्मण’चे संपादक गोविंद हर्डिकर, कार्यकारी संपादक भालचंद्र कुलकर्णी, उद्योजक श्रद्धा वर्दै व्यासपीठावर होते. समाजासाठी योगदान देणाऱ्या दिलीप अलोणी, अशोक बेंबळीकर, प्रथमेश दाते, अनिल गोरे, विनय दाते तसेच उदय बापट व विश्राम कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.कारकुनीपेक्षा उद्योग, कला, साहित्य अशा क्षेत्रात क र्तृत्व गाजवा, असे आवाहन करून पुरंदरे म्हणाले की आपल्या महत्त्वाकांक्षा थिट्या आहेत. आपण आपल्याविषयी गैरसमज बाळगले आहेत. अंधार दूर करण्याची फक्त प्रार्थना करून उपयोगाचे नाही. इतिहासात गाजविलेल्या कर्तृत्वाचा आविष्कार नव्या पिढीला दाखवा. (प्रतिनिधी)भारतीय असणे ही खूप मोठी भावना !४कारगील युध्दाच्या वेळी साऱ्या देशातून रोख, वस्तूंच्या रूपात मदत येत होती. गोरखपूर येथे असताना एका रेल्वे स्टेशनवर एका भिकाऱ्याने माझ्याकडे अडीच हजार रुपये दिले. तिथल्या साऱ्या भिकाऱ्यांनी पैसे एकत्र जमवून सैन्यासाठी, देशासाठी मदत केली ... हा किस्सा सांगताना भूषण गोखले यांच्या भावना अनावर झाल्या. इतिहास आणि भुगोलाची सांगड असते. भुगोलामुळे युध्दे होतात. जम्मू काश्मिरचा मोठा भाग आज पाकिस्तानने बळकाविलेला आहे ही अतिशय वाईट घटना आहे. पासष्टच्या युध्दात मात्र आपण काश्मिरमध्ये घुसलेल्यांना यशस्वी होऊ दिले नाही. आपल्या देशात चांगले काय आहे हे आपण पाहत नाही.- भूषण गोखले