शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

भटक्यांनी जगायचे कसे? पोट भरणे दूरच; अफवांमुळे बाहेर पडणेही मुश्कील

By गजानन दिवाण | Updated: July 3, 2018 02:57 IST

मुले पळविणारे समजून मारहाणीच्या घटनांमध्ये राज्यभरातील भटका समाज सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. भिक्षुकी करणाऱ्या या समाजाला बाहेर पडणेही मुश्कील झाल्याने महिनाभरापासून त्यांना पोट भरणेही अवघड झाले आहे.

- गजानन दिवाणऔरंगाबाद : मुले पळविणारे समजून मारहाणीच्या घटनांमध्ये राज्यभरातील भटका समाज सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. भिक्षुकी करणाऱ्या या समाजाला बाहेर पडणेही मुश्कील झाल्याने महिनाभरापासून त्यांना पोट भरणेही अवघड झाले आहे. धुळे जिल्ह्यात रविवारी पाच भिक्षुकांना ठेचून मारल्याच्या घटनेनंतर हा प्रश्न आणखी ज्वलंत झाला आहे.नाथांच्या गोसावी वेशात टिंगरी, खंजेरी आदी वाद्ये वाजवीत भिक्षा मागणे हा या समाजाचा परंपरागत व्यवसाय. मात्र, यातून भिक्षा मिळत नसल्याने काही जण दत्तगुरूंच्या किंवा साईबाबांच्या मंदिराचा छोटासा गाडा तयार करतात व सोयीप्रमाणे तो बैलगाडी, चारचाकी टेम्पो किंवा दुचाकीवर बसवून कुटुंबासह गावोगाव भटकतात. श्रद्धाळू लोक देवदर्शन घेऊन दक्षिणा देत असतात. हेच त्यांचे उत्पन्न. काही जण जन्मत: पाच किंवा सहा पायांची गाय किंवा बैल घेऊन फिरतात. गावाजवळच्या मैदानात पाल ठोकून त्यांचा मुक्काम असतो. कुटुंबासह भटकंती असल्यामुळे बहुतांश मुले-मुली शाळाबाह्य आहेत.हिंगोली जिल्ह्यातील कोथळज येथे भटके विमुक्त विकास परिषदेने या समाजातील काही कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे. काहींना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे प्रवासी रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करीत असल्याचे परिषदेचे सचिव नरसिंग झरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत समाजातील ४० हजार लोकांना जात प्रमाणपत्र दिले आहे. फक्त ८० कुटुंबांचा प्रश्न मार्गी लागला आहे. प्रत्येक भटक्याला राहण्याचे हक्काचे ठिकाण आणि रोजगाराचे साधन मिळायला हवे, यासाठी परिषदेची लढाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यभरात पालावरच्या चार शाळानाथपंथी डवरी समाजातील मुलांसाठी मुंबई, उस्मानाबाद, हिंगोली आणि पुणे येथे भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे पालावरच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काहीअंशी त्यांची शिक्षणाची सोय झाली असल्याची माहिती परिषदेचे सचिव नरसिंग झरे यांनी दिली.कोथळज, हक्काचे एकमेव ठिकाणभटके विमुक्त विकास परिषदेने हिंगोली जिल्ह्यातील कोथळज येथे पाच वर्षांपूर्वी या समाजातील ८० कुटुंबांचे पुनर्वसन केले. प्रत्येकी एक प्लॉट देऊन इंदिरा आवास योजनेतून काहींना घरेही बांधून दिली. नाथपंथी डवरी समाजाचे राज्यातील स्वत:चे हक्काचे हे एकमेव ठिकाण.राहायचे कुठे आणि खायचे काय?नारायण बाबर म्हणाले, चोरी-मारहाणीचे गुन्हे आमच्या नावावर कुठेच नाहीत. केवळ भिक्षुकी करून आम्ही पोट भरतो. शहरात गेलो, तर पोलीस ठाण्यात नोंद करतो आणि गावात पोलीस पाटलाकडे नोंद केली जाते. एवढे करूनही हल्ले होत असतील, तर राहायचे कुठे आणि खायचे काय?- 52 घटक राज्यभरात भटक्यांमध्ये आढळतात. त्यातील रार्इंदर, घिसाडी, बहुरूपी, पोपटवाले, अस्वलवाले आदी २८ घटक अजूनही फिरस्तेच आहेत. नाथपंथी डवरी समाज हा त्यापैकी एक. या लोकांकडे ना जन्माचा दाखला आहे ना जातीचे प्रमाणपत्र. त्यामुळे अनेक कल्याणकारी योजनांचा त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. एकूण लोकसंख्येत भटक्यांची संख्या जवळपास ११ टक्के इतकी आहे.नाथपंथी डवरी समाज २ लाखांच्या घरातनाथपंथी डवरी समाज दोन लाखांच्या घरात आहे. महाराष्टÑात जवळपास सर्वच जिल्ह्यांत हा समाज आढळतो, पण स्वत:च्या नावे त्यांचे कुठेही घर वा शेत नाही.हिंगोली जिल्ह्यातील कोथळज येथील गंगाराम राणोजी शिंदे, काशीराम शिंदे, नारायण बाबर हे उमाजी नाईकांचा पोवाडा म्हणून आपली उपजीविका करतात. महिनाभरापासून अफवांचे पीक वाढल्याने या समाजाला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. भिक्षेसाठी समाजातील अनेक जण वेगवेगळ्या वेशभूषा, केशभूषा करतात. अफवांचा सर्वाधिक फटका त्यांना बसतो. घरातील कर्ती माणसे मारली जाऊ लागली, तर जगायचे कसे, हा त्यांच्या कुटुंबाचा सवाल?

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र