शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
3
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
4
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
5
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
6
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
7
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
8
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
9
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
10
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
11
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
12
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
13
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
14
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
15
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
16
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
17
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
18
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
19
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
20
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...

भटक्यांनी जगायचे कसे? पोट भरणे दूरच; अफवांमुळे बाहेर पडणेही मुश्कील

By गजानन दिवाण | Updated: July 3, 2018 02:57 IST

मुले पळविणारे समजून मारहाणीच्या घटनांमध्ये राज्यभरातील भटका समाज सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. भिक्षुकी करणाऱ्या या समाजाला बाहेर पडणेही मुश्कील झाल्याने महिनाभरापासून त्यांना पोट भरणेही अवघड झाले आहे.

- गजानन दिवाणऔरंगाबाद : मुले पळविणारे समजून मारहाणीच्या घटनांमध्ये राज्यभरातील भटका समाज सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. भिक्षुकी करणाऱ्या या समाजाला बाहेर पडणेही मुश्कील झाल्याने महिनाभरापासून त्यांना पोट भरणेही अवघड झाले आहे. धुळे जिल्ह्यात रविवारी पाच भिक्षुकांना ठेचून मारल्याच्या घटनेनंतर हा प्रश्न आणखी ज्वलंत झाला आहे.नाथांच्या गोसावी वेशात टिंगरी, खंजेरी आदी वाद्ये वाजवीत भिक्षा मागणे हा या समाजाचा परंपरागत व्यवसाय. मात्र, यातून भिक्षा मिळत नसल्याने काही जण दत्तगुरूंच्या किंवा साईबाबांच्या मंदिराचा छोटासा गाडा तयार करतात व सोयीप्रमाणे तो बैलगाडी, चारचाकी टेम्पो किंवा दुचाकीवर बसवून कुटुंबासह गावोगाव भटकतात. श्रद्धाळू लोक देवदर्शन घेऊन दक्षिणा देत असतात. हेच त्यांचे उत्पन्न. काही जण जन्मत: पाच किंवा सहा पायांची गाय किंवा बैल घेऊन फिरतात. गावाजवळच्या मैदानात पाल ठोकून त्यांचा मुक्काम असतो. कुटुंबासह भटकंती असल्यामुळे बहुतांश मुले-मुली शाळाबाह्य आहेत.हिंगोली जिल्ह्यातील कोथळज येथे भटके विमुक्त विकास परिषदेने या समाजातील काही कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे. काहींना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे प्रवासी रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करीत असल्याचे परिषदेचे सचिव नरसिंग झरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत समाजातील ४० हजार लोकांना जात प्रमाणपत्र दिले आहे. फक्त ८० कुटुंबांचा प्रश्न मार्गी लागला आहे. प्रत्येक भटक्याला राहण्याचे हक्काचे ठिकाण आणि रोजगाराचे साधन मिळायला हवे, यासाठी परिषदेची लढाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यभरात पालावरच्या चार शाळानाथपंथी डवरी समाजातील मुलांसाठी मुंबई, उस्मानाबाद, हिंगोली आणि पुणे येथे भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे पालावरच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काहीअंशी त्यांची शिक्षणाची सोय झाली असल्याची माहिती परिषदेचे सचिव नरसिंग झरे यांनी दिली.कोथळज, हक्काचे एकमेव ठिकाणभटके विमुक्त विकास परिषदेने हिंगोली जिल्ह्यातील कोथळज येथे पाच वर्षांपूर्वी या समाजातील ८० कुटुंबांचे पुनर्वसन केले. प्रत्येकी एक प्लॉट देऊन इंदिरा आवास योजनेतून काहींना घरेही बांधून दिली. नाथपंथी डवरी समाजाचे राज्यातील स्वत:चे हक्काचे हे एकमेव ठिकाण.राहायचे कुठे आणि खायचे काय?नारायण बाबर म्हणाले, चोरी-मारहाणीचे गुन्हे आमच्या नावावर कुठेच नाहीत. केवळ भिक्षुकी करून आम्ही पोट भरतो. शहरात गेलो, तर पोलीस ठाण्यात नोंद करतो आणि गावात पोलीस पाटलाकडे नोंद केली जाते. एवढे करूनही हल्ले होत असतील, तर राहायचे कुठे आणि खायचे काय?- 52 घटक राज्यभरात भटक्यांमध्ये आढळतात. त्यातील रार्इंदर, घिसाडी, बहुरूपी, पोपटवाले, अस्वलवाले आदी २८ घटक अजूनही फिरस्तेच आहेत. नाथपंथी डवरी समाज हा त्यापैकी एक. या लोकांकडे ना जन्माचा दाखला आहे ना जातीचे प्रमाणपत्र. त्यामुळे अनेक कल्याणकारी योजनांचा त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. एकूण लोकसंख्येत भटक्यांची संख्या जवळपास ११ टक्के इतकी आहे.नाथपंथी डवरी समाज २ लाखांच्या घरातनाथपंथी डवरी समाज दोन लाखांच्या घरात आहे. महाराष्टÑात जवळपास सर्वच जिल्ह्यांत हा समाज आढळतो, पण स्वत:च्या नावे त्यांचे कुठेही घर वा शेत नाही.हिंगोली जिल्ह्यातील कोथळज येथील गंगाराम राणोजी शिंदे, काशीराम शिंदे, नारायण बाबर हे उमाजी नाईकांचा पोवाडा म्हणून आपली उपजीविका करतात. महिनाभरापासून अफवांचे पीक वाढल्याने या समाजाला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. भिक्षेसाठी समाजातील अनेक जण वेगवेगळ्या वेशभूषा, केशभूषा करतात. अफवांचा सर्वाधिक फटका त्यांना बसतो. घरातील कर्ती माणसे मारली जाऊ लागली, तर जगायचे कसे, हा त्यांच्या कुटुंबाचा सवाल?

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र