शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

उन्हाळ्याचे तीन महिने कसे सरणार?

By admin | Updated: March 2, 2017 01:33 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. धरण, तलाव बंधाऱ्यातील पाणी संपले आहे. उन्हाळ्याचे तीन महिने कसे जाणार, या भीतीने या परिसरातील नागरिक हतबल झाला आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील गुळणी, जरेवाडी वाफगाव, चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, वरुडे, कनेरसर येथे दर वर्षी बेभरवशाचा पाऊस पडतो. यंदा परतीचा पाऊस या परिसरात पडलाच नाही. वाफगाव येथील मातीचे धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले होते; मात्र धरणातून पाणी चारीच्या वाटे सोडण्याचे नियोजन केले नसल्यामुळे; तसेच सतत या धरणातील पाणीउपसा असल्याने धरण कोरडेठाक पडले आहे. पाणी नसल्यामुळे शेतातील पिके जळून गेली आहेत. जनावरांचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. गुळाणी येथील तलावातही १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येथे पाणीप्रश्न भेडवसणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वेळ नदी वरील वरुडे येथील कोल्हापूर पद्धतीचे दोन्ही बंधारे कोरडे पडले आहेत. मागील वर्षी एप्रिल, मे महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत निवडणुका जवळ आल्याने, अनेक पुढाऱ्यांनी या परिसरात पाण्याचे टँकर सुरू केले होते. मोफत गावोगावी-वाडी वस्त्यांवर पाणीवाटप करण्यात येत होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा; तसेच जनावरांचा पाणीप्रश्न मिटला होता. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत. जे निवडून आले, त्यांना या भागाचे काही देणे-घेणे नाही. त्यांना आमची पाच वर्षे गरजच नाही, मोफत टँकरचे यंदा पाणी मिळणार नाही. ‘गरज सरो, वैद्य मरो’ अशी आमची अवस्था झाली असल्याचे वाफगाव परिसरातील शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रशासनाने या परिसरात टँकर लवकरच सुरू करावे, अशी मागणीही या वेळी शेतकऱ्यांनी केली.>नाझरे धरणातून दिवसाआड पाणीपुरवठामोरगाव : पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणावर चार प्रादेशिक नळ पाणी योजना व एमआयडीसी अवलंबून आहे. धरणातील घटता पाणीसाठा लक्षात घेता, जूनपर्यंत पिण्याचे पाणी पुरण्यासाठी पाण्याचे दिवसाआड आठ तास असे नियोजन केले आहे. यामुळे बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांत पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.नाझरे जलाशयावर बारामती तालुक्यातील मोरगाव प्रादेशिक, पारगाव -माळशिरस, नाझरे व इतर गावे, जेजुरी अशा विविध योजना आहेत. पैकी मोरगाव प्रादेशिक योजनेवर मोरगाव, आंबी खुर्द, आंबी बुद्रुक, तरडोली, लोणी भापकर, माळवाडी (लोणी), जळगाव, काऱ्हाटी, कऱ्हावागज आदी १५ गावे अवलंबून आहेत.या योजनांद्वारे पाणीपुरवठा दिवसाआड १२ तास चालविला जात होता; मात्र घटता पाणीसाठी लक्षात घेता जूनपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी दिवसाआड या योजना ८ तास चालविण्यास सुरुवात केली आहे. तरडोलीसह परिसरातील १५ गावांसाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे या गावांत तब्बल चार दिवसांनी पाणी मिळणार असून, ग्रामपंचायतींना पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.>पाण्यासाठी भटकंती सुरूशिक्रापूर : पाबळ व परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली असून, अनेक वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाबळ येथील गावठाणात ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव मित्रमंडळाने एकत्रित येऊन पाण्याचा टॅँकर सुरू केला.