शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

साखरेला २,३५० आणि उसाला २,५०० रुपये कसे देणार ?

By admin | Updated: September 26, 2015 03:01 IST

सध्या बाजारात साखरेचा दर क्ंिवटलला २,३५० रुपये असताना उसाला प्रतिटन २,५०० रुपये रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) द्यायची कशी

कोल्हापूर : सध्या बाजारात साखरेचा दर क्ंिवटलला २,३५० रुपये असताना उसाला प्रतिटन २,५०० रुपये रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) द्यायची कशी, अशी विचारणा कारखानदारांकडून होत आहे; म्हणूनच साखर संघाने एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. त्याचा फैसला आता कारखान्यांच्या वार्षिक सभेत होणार असून, ऊस बिलाचे काय करायचे हे आता शेतकऱ्यांनीच ठरवायचे आहे.मुंबईत गुरुवारी मंत्री समितीची बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एफआरपी देण्यावर ठाम राहिले. ती न दिल्यास कारखान्यांवर कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी तीन टप्प्यांत एफआरपीबाबत स्पष्टपणे कोणतीच भूमिका न घेता शेतकरी संघटना व संबंधित घटक यांच्याशी बोलून निर्णय व्हावा, असे सूतोवाच केले आहे. कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत व त्यांनीच वार्षिक सभेत ठराव करून तीन टप्प्यांतील एफआरपीला मान्यता दिल्यास सरकारला काय अडचण आहे, असे साखर संघाचे म्हणणे आहे.बाजारातील साखरेचा दर अजूनही प्रती क्विंटल २,३०० ते २,३५० रुपयांमध्येच घुटमळत आहे. राज्याचा सरासरी उतारा ११.३० टक्के आहे. त्यानुसार प्रति क्विंटलला २,१६४ रुपये द्यावे लागतात. कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्ह्यांतील उतारा १२.५० टक्क्यांपर्यंत जातो. त्यामुळे त्यानुसार हिशेब केल्यास २,४५० ते २,६०० रुपयांपर्यंत एकरकमी एफआरपी द्यावी लागेल. बाजारात साखरेला प्रतिक्विंटल २,३५० रुपये मिळणार असतील तर शेतकऱ्यांना एकरकमी २,४५० रुपये आम्ही कसे देणार, अशी विचारणा त्यामुळेच कारखानदार करू लागले आहेत. राज्यातील १७९ पैकी फक्त १७ कारखान्यांनी एकरकमी पूर्ण हंगामाची एफआरपी दिली आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले सॉफ्ट लोन मिळाले तरी सरासरी टनामागे १५० ते २५० रुपये शेतकऱ्यांना देता येत नाहीत. (प्रतिनिधी)