शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

विवाहविषयक संकेतस्थळांवर नियंत्रण कसे मिळवणार?

By admin | Updated: March 25, 2016 01:12 IST

महाराष्ट्र रेग्युलेशन आॅफ मॅरेज ब्युरो अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन आॅफ मॅरेज अ‍ॅक्ट, १९९८ यांतर्गत विवाह मंडळांवर नियंत्रण मिळवण्याची कल्पना राज्य सरकारची होती. मात्र आता विवाहविषयक

मुंबई : महाराष्ट्र रेग्युलेशन आॅफ मॅरेज ब्युरो अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन आॅफ मॅरेज अ‍ॅक्ट, १९९८ यांतर्गत विवाह मंडळांवर नियंत्रण मिळवण्याची कल्पना राज्य सरकारची होती. मात्र आता विवाहविषयक संकेतस्थळांनी विवाह मंडळांना गिळंकृत केले आहे आणि सरकार या संकेतस्थळांवर नियंत्रण मिळवू शकत नाही, अशा शब्दांत सरकारला फटकारत उच्च न्यायालयाने विवाहविषयक संकेतस्थळांवर नियंत्रण कसे आणणार? अशी विचारणा करत एका महिन्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.विवाहविषयक संकेतस्थळे अनेक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. विवाह मंडळे तसेच अशा संकेतस्थळांची तपशीलवार माहिती सादर करा, असे निर्देश न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने सरकारला दिले. हुंडा प्रतिबंधक कायद्याचे प्रभावीपणे पालन केले जात नाही. तसेच हुंडा प्रतिबंध अधिकाऱ्याची नियुक्तीदेखील अद्याप न करण्यात आल्याबद्दल अ‍ॅड. प्रसिला सॅम्युअल यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.या याचिकेच्या सुनावणीवेळी राज्य सरकारने हुंडा प्रतिबंध अधिकारी म्हणून पोलीस ठाण्याच्या इनचार्जची नियुक्ती केल्याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच खडसावले. हुंडा प्रतिबंध अधिकारी म्हणून सरकार पोलिसांची नियुक्ती करू शकते. मात्र त्यासाठी निकष लावणे आवश्यक आहे. त्यांचे शिक्षण, त्यांची पात्रता, समाजात त्यांचा असलेला दर्जा इत्यादीविषयी सरकारने विचार केला पाहिजे. परंतु, याचा सारासार विचार न करताच सरकारने पोलीस ठाण्यातील इनचार्जना हुंडा प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. या अधिकाऱ्यांना त्यांची अन्य कामे आहेत. त्यांच्यावर भार टाकू नका, असे खंडपीठाने सांगितले.तसेच हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत राज्य सरकारने सल्लागार मंडळ नेमणेही बंधनकारक आहे. मात्र सरकारने तेही अद्याप नेमलेले नाही. त्यावर खंडपीठाने हुंडा प्रतिबंध अधिकारी आणि सल्लागार मंडळ नेमण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश सरकारला दिले.विवाह नोंदणी व विवाह मंडळांच्या नोंदणीच्या कामांकरिता स्वतंत्र विभाग सुरू करणे शक्य आहे का ते पाहावे. त्याची आवश्यकता आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अशा विभागाची आवश्यकता आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. (प्रतिनिधी)या याचिकेच्या सुनावणीवेळी राज्य सरकारने हुंडा प्रतिबंध अधिकारी म्हणून पोलीस ठाण्याच्या इनचार्जची नियुक्ती केल्याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच खडसावले. हुंडा प्रतिबंध अधिकारी म्हणून सरकार पोलिसांची नियुक्ती करू शकते. मात्र त्यासाठी निकष लावणे आवश्यक आहे. त्यांचे शिक्षण, त्यांची पात्रता, समाजात त्यांचा असलेला दर्जा इत्यादीविषयी सरकारने विचार केला पाहिजे. परंतु, याचा सारासार विचार न करताच सरकारने पोलीस ठाण्यातील इनचार्जना हुंडा प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.