शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

दुष्काळाचा सामना कसा करणार?

By admin | Updated: March 31, 2016 02:17 IST

दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न भीषण होत असल्याने, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला

मुंबई : दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न भीषण होत असल्याने, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत पुढील आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.‘पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर पावले उचलली पाहिजेत. वेळ निघून चाललाय, पुढील दोन-तीन महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही (राज्य सरकार) युद्धपातळीवर काही केले नाही, तर आपत्कालीन स्थिती निर्माण होईल. तुम्हाला यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले.राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती असतानाही सरकारने कुंभमेळाव्याच्या शाही स्नानासाठी गोदावरी नदीमध्ये वारंवार पाणी सोडले. मराठवाड्यातील लोकांना पाण्याची भीषण टंचाई जाणवत असतानाही सरकारने कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध पुण्याचा प्राध्यापक एच. एम. देसरडा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने सरकारला धरणातले पाणी शाही स्नानासाठी न सोडण्याचा आदेश दिला. पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठीच पाणी सोडण्यात यावे, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी) ठोस पावले उचला अन्यथा नुकसान...राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीवर तत्काळ उपाय करणे आवश्यक आहे, असे म्हटले. ‘राज्यातील अनेक गावांत आणि शहरांत पाणीटंचाईचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. दुष्काळामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये हजारो लोकांनी (शेतकरी) आत्महत्या केल्या. जर राज्य सरकारने काही ठोस पावले उचलली नाहीत तर आणखी नुकसान होईल,’ असे खंडपीठाने म्हटले.