शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

दुष्काळाचा सामना कसा करणार?

By admin | Updated: March 31, 2016 02:17 IST

दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न भीषण होत असल्याने, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला

मुंबई : दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न भीषण होत असल्याने, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत पुढील आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.‘पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर पावले उचलली पाहिजेत. वेळ निघून चाललाय, पुढील दोन-तीन महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही (राज्य सरकार) युद्धपातळीवर काही केले नाही, तर आपत्कालीन स्थिती निर्माण होईल. तुम्हाला यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले.राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती असतानाही सरकारने कुंभमेळाव्याच्या शाही स्नानासाठी गोदावरी नदीमध्ये वारंवार पाणी सोडले. मराठवाड्यातील लोकांना पाण्याची भीषण टंचाई जाणवत असतानाही सरकारने कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध पुण्याचा प्राध्यापक एच. एम. देसरडा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने सरकारला धरणातले पाणी शाही स्नानासाठी न सोडण्याचा आदेश दिला. पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठीच पाणी सोडण्यात यावे, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी) ठोस पावले उचला अन्यथा नुकसान...राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीवर तत्काळ उपाय करणे आवश्यक आहे, असे म्हटले. ‘राज्यातील अनेक गावांत आणि शहरांत पाणीटंचाईचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. दुष्काळामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये हजारो लोकांनी (शेतकरी) आत्महत्या केल्या. जर राज्य सरकारने काही ठोस पावले उचलली नाहीत तर आणखी नुकसान होईल,’ असे खंडपीठाने म्हटले.