शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

गोरक्षक गेल्या दोनेक वर्षांतच कसे काय निर्माण झाले? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

By admin | Updated: August 8, 2016 12:44 IST

गोमांस आणि गोरक्षेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरक्षक इतक्या मोठ्या संख्येने गेल्या दोनेक वर्षांतच कसे काय निर्माण झाले? असा सवाल विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 8 - गोमांस आणि गोरक्षेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं वक्तव्य धाडसी म्हणत कौतुक केलं आहे. मात्र कौतुक करत असताना हे गोरक्षक इतक्या मोठ्या संख्येने गेल्या दोनेक वर्षांतच कसे काय निर्माण झाले? असा सवाल विचारत कोपरखळीही मारली आहे. उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून हे वक्तव्य केलं आहे. 
 
मोदी यांच्या धाडसी वक्तव्याचे आम्हाला कौतुक आहे. पण आमच्यासारख्यांच्या मनातील भाबडा प्रश्‍न इतकाच आहे की, हे गोरक्षक इतक्या मोठ्या संख्येने गेल्या दोनेक वर्षांतच कसे काय निर्माण झाले? भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा झेंडा घेऊन ज्या संस्था व संघटना पुढे आल्या त्यात गोरक्षा मंडळींच्या शेकडो संस्था होत्या व हेच लोक आज गोरक्षणाचा गोरखधंदा करतात असे सरकारला वाटते काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
गोरक्षेच्या नावाखाली ट्रक अडवून पैसे उकळायचे व मग याच गाईंचा सौदा करायचा हा धंदा भयंकर आहे. पंतप्रधानांनी या बोगस गोरक्षकांवर हल्ला करून दलित-मुसलमान समाजास ‘मेसेज’ देण्याचे काम केले असं कौतुकही उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
 
गोरक्षकांनी जसा गोरखधंदा उघडून लोकांचा छळ केला आहे तसा मुंबईसारख्या शहरात ‘शाकाहारा’च्या नावाखाली अनेक बिल्डरांनी स्वत:ची वेगळी बेटे निर्माण करून मांसाहार करणार्‍यांना घरे नाकारण्याचे उद्योग चालवले आहेत. हासुद्धा वेगळाच गोरखधंदा असून पंतप्रधानांनी या शाकाहारवाद्यांवरही कठोर प्रहार करून त्यांना वठणीवर आणायला हवे. कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. ती खासगी बाब आहे. श्रद्धेचा मान ठेवून या गोष्टी झाल्या की तणाव निर्माण होत नाही. राजकारण, उद्योग व सामाजिक क्षेत्रात आज ‘शेण’ खाऊनही लोक ताठ मानेने जगत आहेत हे पाहिले तर आता इतरांच्या खाण्यापिण्यावर बोलून वाद वाढवायचे कशाला? असा टोमणा उद्धव ठाकरेंनी मारला आहे.