शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

युती तुटताच त्यांनी आघाडी कशी तोडली?

By admin | Updated: September 26, 2014 08:36 IST

मुख्यमंत्री म्हणून आपण कुठलीही तडजोड न स्वीकारता पारदर्शक निर्णय घेतल्याने कोणाचे हितसंबंध दुखावले असण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुख्यमंत्री म्हणून आपण कुठलीही तडजोड न स्वीकारता पारदर्शक निर्णय घेतल्याने कोणाचे हितसंबंध दुखावले असण्याची शक्यता आहे. महायुतीची ताटातूट झाल्यानंतर एक तासाच्या आत राष्ट्रवादीने आघाडी तोडली हा निव्वळ योगायोग नसून या पक्षाची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत हे ओळखण्याइतपत राज्याची जनता खुळी नाही, असे सूचक भाष्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.गेली १५ वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत चकार शब्दही न काढणाऱ्या राष्ट्रवादीने राज्यापेक्षा महत्त्वाकांक्षा मोठी मानत मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला. जागावाटपाबाबत अवास्तव मागण्या करून आघाडी संपुष्टात आणली, असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी केला. तर राष्ट्रवादीच्या ताठरपणामुळेच आघाडी तुटल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्र परिषदेत केला. भाजपा-सेनेच्या युतीचे काय होते याची वाट पाहत बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने जागावाटपाच्या चर्चेेत पुढाकार न घेता वेळकाढूपणा केला, असे सांगताना त्यांनी भाजपा-राष्ट्रवादीचे काही सेटिंग तर नव्हते ना, अशी शंकाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. जागावाटपाची बोलणी सुरू असताना दोन दिवसांपूर्वी अचानक मुख्यमंत्रीपदाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आणि या बोलणीला खिळ बसविण्याचाच प्रयत्न केला, असा आरोप ठाकरे यांनी केला. आज राष्ट्रवादीने आघाडी तोडली. आता उद्या आणखी काही नवीन युती अस्तित्वात येते का ते बघा असे सांगून मुख्यमंत्र्यांनी उद्या मोठ्या राजकीय घडामोडी होऊ शकतात, असे संकेत दिले. गेल्या पावणेचार वर्षांत सरकार चालविताना अनेक बरेवाईट प्रसंग आले पण तरीही राष्ट्रवादीला सोबत नेण्याचा प्रयत्न आपण केला. राज्यातील जनतेच्या हिताआड येणारे कुठलेही निर्णय आपण घेतले नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्रीपदाची आणि १४४ जागांची राष्ट्रवादीची मागणी अव्यवहार्य आणि कोणत्याही निकषात बसणारी नव्हती हे सांगताना त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तर १२४ पेक्षा अधिक जागा देण्याची तयारी होती, असे ठाकरे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)