शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कसा होणार जिल्हा हगणदरीमुक्त?

By admin | Updated: June 28, 2016 00:54 IST

शासन हगणदरीमुक्त राज्य करण्यासाठी आग्रही असून, अतिक्रमित कुटुंबीयांनाही शौचालयासाठी अनुदान देण्यास तयार होत आहे.

पुणे : शासन हगणदरीमुक्त राज्य करण्यासाठी आग्रही असून, अतिक्रमित कुटुंबीयांनाही शौचालयासाठी अनुदान देण्यास तयार होत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य आपला तालुका निर्मल करण्यास उत्सुक नसल्याचे मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ७५ गटांपैकी २१ गटांत अद्याप ७0 टक्केही काम झाले नसून, इंदापूर तालुका सर्वांत मागे आहे. येथील एकाही सदस्यला आपला गट ६0 टक्केच्यावर हगणदरीमुक्त करता आला नाही. विशेष म्हणजे हा तालुका माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा असून तेथे आतापर्यंत सर्वाधिक योजनांचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, १२ मे २0१६ रोजी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपला जिल्हा यंदा हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र जिल्ह्यात १४0६ ग्रामपंचायती असून, त्यापैैकी ३६१ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. यात मुळशी तालुका हगणदारीमुक्त झाला असून, अद्याप १ हजार ५४ ग्रामपंचायती बाकी असून, १ लाख ३0 हजार कुटुंबीयांकडे शौैचालये नाहीत. ३१ मार्च २0१७ पर्यंत जिल्हा हगणदरीमक्त करण्याचे मोठे काम जिल्हा परिषद प्रशासनाला करावे लागणार आहे. मात्र लोकप्रतिनिधीच याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील मुळशी तालुका गेल्या वर्षी हगणदरीमुक्त झाला तो फक्त लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या पुढाकारामुळेच. लोकप्रतिनिधींनी जर मनावर घेतले तरच ते आपला तालुका, गट, गण निर्मल करू शकतील हे ताजे उदाहरण मुळशीचे आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या गटानुसार माहिती मिळवली असता धक्कादायक माहिती समोर आली. ७0 टक्केपर्यंतचे टार्गेट ७५ पैकी फक्त ५४ सदस्यांच्या गटात पूर्ण झाले असून, २१ गटातील सदस्य हे ७0 पेक्षा खाली आहेत. (प्रतिनिधी)>इंदापूरच्या एकाही गटात ५0 टक्के काम नाहीयात सर्वांत कमी इंदापूर तालुक्यातील बावडा लाखेवाडी गटातील श्रीमंत ढाले यांचा गट फक्त ३९.८४ टक्के हगणदरीमुक्त झाला आहे. त्यानंतर देवराज जाधव यांचा निमगाव केतकी निमसाखर ४१.६४६, कतुजा पाटील यांचा वडापूर काटी गट ४४.९६५ तर प्रताप पाटील यांचा वालचंदनगर कळस गट ४५.९ टक्केच निर्मल झाला आहे. या सदस्यांना आपला गट ५0 टक्केही निर्मल करता आला नाही. आंबेगाव ८५.८0, बारामती ७५.८१, भोर ९४.२६, दौंड ६८.३0, हवेली ९0.६९, इंदापूर ४७.६७, जुन्नर ८६.८१, खेड ८१.३२, मावळ ७२,६५, पुरंदर ७७.८९, शिरूर ७६.४३ व वेल्हे ९५.९१ टक्के हगणदरीमुक्त झाला आहे. भोर आणि वेल्हे लवकरच हगणदरीमुक्त होऊ शकतात.