शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कसा होणार जिल्हा हगणदरीमुक्त?

By admin | Updated: June 28, 2016 00:54 IST

शासन हगणदरीमुक्त राज्य करण्यासाठी आग्रही असून, अतिक्रमित कुटुंबीयांनाही शौचालयासाठी अनुदान देण्यास तयार होत आहे.

पुणे : शासन हगणदरीमुक्त राज्य करण्यासाठी आग्रही असून, अतिक्रमित कुटुंबीयांनाही शौचालयासाठी अनुदान देण्यास तयार होत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य आपला तालुका निर्मल करण्यास उत्सुक नसल्याचे मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ७५ गटांपैकी २१ गटांत अद्याप ७0 टक्केही काम झाले नसून, इंदापूर तालुका सर्वांत मागे आहे. येथील एकाही सदस्यला आपला गट ६0 टक्केच्यावर हगणदरीमुक्त करता आला नाही. विशेष म्हणजे हा तालुका माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा असून तेथे आतापर्यंत सर्वाधिक योजनांचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, १२ मे २0१६ रोजी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपला जिल्हा यंदा हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र जिल्ह्यात १४0६ ग्रामपंचायती असून, त्यापैैकी ३६१ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. यात मुळशी तालुका हगणदारीमुक्त झाला असून, अद्याप १ हजार ५४ ग्रामपंचायती बाकी असून, १ लाख ३0 हजार कुटुंबीयांकडे शौैचालये नाहीत. ३१ मार्च २0१७ पर्यंत जिल्हा हगणदरीमक्त करण्याचे मोठे काम जिल्हा परिषद प्रशासनाला करावे लागणार आहे. मात्र लोकप्रतिनिधीच याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील मुळशी तालुका गेल्या वर्षी हगणदरीमुक्त झाला तो फक्त लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या पुढाकारामुळेच. लोकप्रतिनिधींनी जर मनावर घेतले तरच ते आपला तालुका, गट, गण निर्मल करू शकतील हे ताजे उदाहरण मुळशीचे आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या गटानुसार माहिती मिळवली असता धक्कादायक माहिती समोर आली. ७0 टक्केपर्यंतचे टार्गेट ७५ पैकी फक्त ५४ सदस्यांच्या गटात पूर्ण झाले असून, २१ गटातील सदस्य हे ७0 पेक्षा खाली आहेत. (प्रतिनिधी)>इंदापूरच्या एकाही गटात ५0 टक्के काम नाहीयात सर्वांत कमी इंदापूर तालुक्यातील बावडा लाखेवाडी गटातील श्रीमंत ढाले यांचा गट फक्त ३९.८४ टक्के हगणदरीमुक्त झाला आहे. त्यानंतर देवराज जाधव यांचा निमगाव केतकी निमसाखर ४१.६४६, कतुजा पाटील यांचा वडापूर काटी गट ४४.९६५ तर प्रताप पाटील यांचा वालचंदनगर कळस गट ४५.९ टक्केच निर्मल झाला आहे. या सदस्यांना आपला गट ५0 टक्केही निर्मल करता आला नाही. आंबेगाव ८५.८0, बारामती ७५.८१, भोर ९४.२६, दौंड ६८.३0, हवेली ९0.६९, इंदापूर ४७.६७, जुन्नर ८६.८१, खेड ८१.३२, मावळ ७२,६५, पुरंदर ७७.८९, शिरूर ७६.४३ व वेल्हे ९५.९१ टक्के हगणदरीमुक्त झाला आहे. भोर आणि वेल्हे लवकरच हगणदरीमुक्त होऊ शकतात.