शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

चार दिवसांत मागदर्शक तत्त्वे कशी ठरणार?

By admin | Updated: September 3, 2016 01:29 IST

मुर्तींचे पावित्र्य कायम राखण्यासाठी विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यासाठी सरकारला आदेश देण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे शुक्रवारी करण्यात आली. मात्र अवघ्या कमी

मुंबई : मुर्तींचे पावित्र्य कायम राखण्यासाठी विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यासाठी सरकारला आदेश देण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे शुक्रवारी करण्यात आली. मात्र अवघ्या कमी अवधीत सरकार मार्गदर्शक तत्त्वे कशी ठरवणार, असे सांगत उच्च न्यायालयाने सरकारला आदेश देण्यास नकार दिला. विसर्जनानंतर गणपतीच्या मूर्ती पुन्हा समुद्र किनाऱ्यावरच वाहून येतात. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावतात, असे याचिकाकर्ते अ‍ॅड. साक्षत रेळेकर यांनी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे सांगितले. २००८ मध्ये केंद्र सरकारने गणेश विसर्जन व निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मागदर्शक तत्त्वे आखली आहेत. मात्र ही मागदर्शक तत्त्वे प्रदूषण रोखण्यासाठी पुरेशी नाहीत. त्यामुळे राज्य सरकारला गणेश विसर्जन व निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी मागदर्शक तत्त्वे आखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी रेळेकर यांनी केली. मात्र गणेशोत्सवाला चार दिवस राहिल्याने एवढ्या तत्काळ राज्य सरकारला आदेश देऊ शकत नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. पुढील वर्षासाठी सरकारला आदेश दिले जाऊ शकतात, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी अनंत चर्तुदशीनंतर ठेवली आहे. भाविकांनी पीओपीच्या मूर्ती न वापरता ‘इको-फ्रेंडली’ मूर्तींचे पूजन करावे. तसेच मूर्तींच्या रंगकामासाठी हानिकारक रंग वापरू नयेत, असे आवाहनही उच्च न्यायालयाने केले. (प्रतिनिधी)