शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

चार दिवसांत मागदर्शक तत्त्वे कशी ठरणार?

By admin | Updated: September 3, 2016 01:29 IST

मुर्तींचे पावित्र्य कायम राखण्यासाठी विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यासाठी सरकारला आदेश देण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे शुक्रवारी करण्यात आली. मात्र अवघ्या कमी

मुंबई : मुर्तींचे पावित्र्य कायम राखण्यासाठी विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यासाठी सरकारला आदेश देण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे शुक्रवारी करण्यात आली. मात्र अवघ्या कमी अवधीत सरकार मार्गदर्शक तत्त्वे कशी ठरवणार, असे सांगत उच्च न्यायालयाने सरकारला आदेश देण्यास नकार दिला. विसर्जनानंतर गणपतीच्या मूर्ती पुन्हा समुद्र किनाऱ्यावरच वाहून येतात. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावतात, असे याचिकाकर्ते अ‍ॅड. साक्षत रेळेकर यांनी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे सांगितले. २००८ मध्ये केंद्र सरकारने गणेश विसर्जन व निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मागदर्शक तत्त्वे आखली आहेत. मात्र ही मागदर्शक तत्त्वे प्रदूषण रोखण्यासाठी पुरेशी नाहीत. त्यामुळे राज्य सरकारला गणेश विसर्जन व निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी मागदर्शक तत्त्वे आखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी रेळेकर यांनी केली. मात्र गणेशोत्सवाला चार दिवस राहिल्याने एवढ्या तत्काळ राज्य सरकारला आदेश देऊ शकत नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. पुढील वर्षासाठी सरकारला आदेश दिले जाऊ शकतात, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी अनंत चर्तुदशीनंतर ठेवली आहे. भाविकांनी पीओपीच्या मूर्ती न वापरता ‘इको-फ्रेंडली’ मूर्तींचे पूजन करावे. तसेच मूर्तींच्या रंगकामासाठी हानिकारक रंग वापरू नयेत, असे आवाहनही उच्च न्यायालयाने केले. (प्रतिनिधी)