शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेस सर्टिफिकेट नसलेल्या वाहनांना परवानगी कशी?

By admin | Updated: October 19, 2016 06:10 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य परिवहन विभागाने फिटनेस सर्टिफिकेट तपासण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबवली.

मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य परिवहन विभागाने फिटनेस सर्टिफिकेट तपासण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबवली. तीन हजारांहून अधिक वाहनांकडे फिटनेस सर्टिफिकेट नसल्याचे निदर्शनास येऊनही अवघी ७०० वाहने ताब्यात घेण्यात आल्याने उर्वरित वाहनांना रस्त्यांवरून धावण्याची परवानगी दिलीत कशी, अशी विचारणा करून राज्य सरकारला याबाबतीत एका आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.मोटार व्हेइकल अ‍ॅक्टचे सर्रासपणे उल्लंघन करून पुण्यातील आरटीओंमध्ये फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येते. एका दिवसात ३०० ते ४०० वाहनांना प्रमाणपत्र देऊन सरकार नागरिकांचा जीव धोक्यात घालत असल्याने पुण्यातील आरटीओंना कायद्याचे पालन करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कर्वे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. हे केवळ पुण्याच्या आरटीओंमध्ये घडत नसून राज्यातील सर्व आरटीओंमध्येही सर्रासपणे घडत असल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने या याचिकेची व्याप्ती वाढवत या याचिकेवर देण्यात आलेले आदेश राज्यभरातील सर्व आरटीओंसाठी लागू केले.फेब्रुवारी २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांकडे फिटनेस सर्टिफिकेट आहे की नाही, हे तपासण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले होते. त्यानुसार परिवहन विभागाने एप्रिलमध्ये विशेष मोहीम राबविल्याची माहिती परिवहन विभागातर्फे महाअधिवक्ता रोहित देव यांनी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाला दिली.‘या मोहिमेत ३०६० वाहनांकडे फिटनेस सर्टिफिकेट नसल्याचे आढळले. त्यापैकी सातशेहून अधिक वाहने आरटीओेने ताब्यात घेतली,’ असे अ‍ॅड. देव यांनी खंडपीठाला सांगितले.‘तीन हजारांहून अधिक वाहनांकडे प्रमाणपत्र नसताना अवघी सातशे वाहनेच ताब्यात घेतली? याचा अर्थ उर्वरित वाहनांना रस्त्यावरून धावण्यास परवानगी दिलीत. आरटीओंनी असे का केले?’ अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने सरकारला एका आठवड्यात यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) >सरकारने मागितली मुदतवाढराज्यातील सर्व आरटीओंमध्ये २५० मीटरचे ब्रेट टेस्ट ट्रॅक तयार करण्यासाठी सरकारने खंडपीठाकडे १२ महिन्यांची मुदत मागितली. १२ महिन्यांत राज्यातील ५८ आरटीओंंमध्ये २५० मीटरचे ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्यात येतील. जमीन संपादित करणे, निधी उपलब्ध होणे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने मुदत घालून देऊ नये, अशी विनंतीही अ‍ॅड. देव यांनी खंडपीठाला केली.‘राज्य सरकारला थेट १२ महिन्यांची मुदत दिली तर ते पुढच्या वर्षीही मुदत वाढवून घेण्यासाठी अर्ज करतील, याची आम्हाला खात्री आहे. आतापर्यंत दिलेल्या आदेशावर क्वचितच अंमलबजावणी केल्याचे दिसून येत आहे. यावर तातडीने अंमलबजावणी व्हायला हवी,’ असे खंडपीठाने म्हटले.>ठाणे आरटीओत दिवसाला ३०० वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येत असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली. याची दखल घेत उच्च न्यायालयाने १ आॅक्टोबरपासून १५ आॅक्टोबरपर्यंत मुंबईतील तिन्ही आरटीओ, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या आरटीओंमधून किती व कोणत्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट दिली, याची तपशीलवार माहिती एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले.