शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वाराणशीच्या रस्त्यांवर ‘हाऊसफुल्ल शो’

By admin | Updated: May 10, 2014 01:03 IST

गुरुवारी जमलेली भव्य गर्दी बघितल्यानंतर शुक्रवारी वाराणशीकरांनी ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेचादेखील अनुभव घेतला.

वाराणशी : देशातील सर्वात मोठे निवडणूक ‘बॅटलफिल्ड’ झालेल्या वाराणशीच्या मैदानात ‘रोड शो’च्या माध्यमातून जनतेला राजकीय रंग अनुभवायला मिळत आहेत. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ गुरुवारी जमलेली भव्य गर्दी बघितल्यानंतर शुक्रवारी वाराणशीकरांनी ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेचादेखील अनुभव घेतला. केजरीवाल यांच्या ‘रोड शो’ला अपेक्षेहून जास्त प्रतिसाद लाभला. यावेळी केजरीवाल यांनी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ज्या नेत्याला मतदारांशी संवाद साधण्यासाठी २ तासदेखील काढता येत नाही असा ‘हेलिकॉप्टर’ उमेदवार काय कामाचा असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. अरविंद केजरीवाल यांनी मोदींप्रमाणेच बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासूनच ‘रोड शो’ला प्रारंभ केला अन् वेगवेगळ््या टप्प्यांत त्यांच्यासोबत गर्दी जुळत गेली. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी १३ ठिकाणी निरनिराळे ‘पॉईन्ट्स’ बनविले होते. या ठिकाणी स्थानिक तसेच ‘आप’चे कार्यकर्ते ‘रोड शो’मध्ये सहभागी होत गेले. शेवटच्या काही ‘पॉईन्ट्स’मध्ये तर प्रचंड प्रमाणात गर्दी जमा झाली होती. यात स्थानिक नागरिकांसोबत तरुण, विद्यार्थी तसेच देशविदेशातून आलेल्या पत्रकारांचादेखील समावेश होता. केजरीवाल यांच्या ‘रोड शो’मध्ये ‘आप’च्या नेत्यांसोबतच भगवंंत मान, विशाल डदलानी, गुल पनाग या ‘सेलिब्रिटीज्’देखील उपस्थित होते. केजरीवाल यांनी दणदणीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. वाराणशीत मोदी विजयाचे दावे करीत आहेत. परंतु प्रचारासाठी ‘हेलिकॉप्टर’ने केवळ दोन तास येणारा उमेदवार खरोखरच जनतेच्या समस्या सोडविणार नाही. असा उमेदवार काय कामाचा हे वाराणशीतील जनतेला चांगल्या तºहेने समजले आहे या शब्दांत केजरीवाल यांनी आपले मत व्यक्त केले. या निवडणुकीत माझाच मोठ्या फरकाने विजय होणार आहे. मोदींबद्दल वाराणशीतील नागरिकांना सत्य कळले आहे. भाजपाकडून जातीधर्माचे राजकारण करण्यासोबतच प्रसारमाध्यमांना लाच देणे व हिंसा यासारखे प्रकारदेखील करण्यात येत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी लावला.