शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

वाड्यात श्रमजीवीने वाचला समस्यांचा पाढा

By admin | Updated: August 2, 2016 03:30 IST

आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण झाली.

वाडा : आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण झाली. मात्र या कालावधीत शासनाच्या निष्क्रिय धोरणामुळे जिल्ह्यातील कुपोषण, बेरोजगारी, आरोग्याच्या समस्यात अधिकच भर पडल्याने व त्या सोडविण्यात शासन अपूरे पडल्याने त्या विरोधात शासनाला जाग यावी म्हणून श्रमजीवी संघटनेने आदिवासींच्या पारंपारिक रवाळ पध्दतीने देवाला साकडे घालून सोमवारी तहसील कार्यालया समोर अनोखे आंदोलन केले. १ आॅगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्यÞाची निर्मिती झाली. ज्या कुपोषण आणि बालमृत्यू व आरोग्याचा समस्यांवर पालघर जिल्ह्यÞाची निर्मिती झाली. ते प्रश्न अधिक गंभीर बनून सरकार उदासिन असल्याचे दिसते. जिल्ह्यÞात महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांची फक्त तीन पदे भरली असून आठ पदे रिक्त आहेत. आदिवासी विकास विभागाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या अब्दुल कलाम सकस आहार योजनेचा पुरता बोजवारा उडाला. या योजनेत गर्भवती महिलेस सातव्या महिन्या पासून सकस आहार दिला जातो. पंरतु तीही योजना गंभीर पणे राबविली जात नसल्याने कुपोषणाच्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यÞात आरोग्य सेवेची दुर्दशा झाली असून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ग्रामीण रूग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ, भुलतज्ञ नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांची परवड अधिक वाढली आहे, असे आरोप यावेळी करण्यात आले. खरंतर या जिल्हा निर्मिती नंतर आदिवासी भागातील प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहायला हवे होते. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे आदिवासी भागातील जनतेला मरणयातना भोगाव्या लागत आहेत. अशा उदासीन सरकारला जाग यावी म्हणून श्रमजीवी संघटनेने आदिवासींच्या देवाला साकडे घालण्याच्या पारंपरिक रवाळ पध्दतीने पूजा घालून गाणी गात तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले.पूर्वीच्या काळी ग्रामीण आदिवासी भागात वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नसल्याने आदिवासी समाज आपली पारंपरिक उपचार पद्धती अवलंबित असे. आजही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अभावी जिल्ह्यÞातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याने आदिवासींवर पुन्हा अंधश्रद्धा जोपासत भगतिगरी व बुवाबाजीवर अवलंबून राहावे लागणार असल्याचा प्रसंग ओढवणार आहे. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून रवाळ पध्दतीने आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद थुले, संघटक सरिता जाधव, जयराम बरफ, बाळाराम पाडोसा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)जव्हारमध्येही आंदोलनजव्हार : श्रमजीवी संघटनेकडून सरकारला शुद्ध येण्याकरीता जिल्ह्यातील प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी आदिवासी रवाळ भरवून नवस बोलण्यात आले. संघटनेकडून हे आंदोलन सोमवार तहसील कार्यालयाच्या आवारात आदिवासीसमाजाचे तारपा व इतर वाद्य वाजवून रवाळ पध्दतीने देवालासाकडे घालण्यात आले. ठाणे जिल्ह्रयाचे विभाजन होऊन आदिवासी बहूलक्षेत्र असलेल्या पालघर जिल्हयाची निर्मिती होऊन १ आॅगस्ट २०१६ रोजी २ वर्ष पुर्णझाली. दोन वर्षापुर्वी निवडणूका डोळयासमोर ठेवून कुठलीही पूर्व तयारी नसताना जिल्हयाची निर्मिती झाली. परंतु जिल्हयासाठी आवश्यक असलेले प्रशासन व त्यसाठी लागणारे मनुष्याळ आपल्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने पालघर जिल्हयाला अद्याप दिलेले नाही हे संघटनेद्वारे निदर्शनास आणले आहे.