शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात श्रमजीवीने वाचला समस्यांचा पाढा

By admin | Updated: August 2, 2016 03:30 IST

आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण झाली.

वाडा : आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण झाली. मात्र या कालावधीत शासनाच्या निष्क्रिय धोरणामुळे जिल्ह्यातील कुपोषण, बेरोजगारी, आरोग्याच्या समस्यात अधिकच भर पडल्याने व त्या सोडविण्यात शासन अपूरे पडल्याने त्या विरोधात शासनाला जाग यावी म्हणून श्रमजीवी संघटनेने आदिवासींच्या पारंपारिक रवाळ पध्दतीने देवाला साकडे घालून सोमवारी तहसील कार्यालया समोर अनोखे आंदोलन केले. १ आॅगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्यÞाची निर्मिती झाली. ज्या कुपोषण आणि बालमृत्यू व आरोग्याचा समस्यांवर पालघर जिल्ह्यÞाची निर्मिती झाली. ते प्रश्न अधिक गंभीर बनून सरकार उदासिन असल्याचे दिसते. जिल्ह्यÞात महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांची फक्त तीन पदे भरली असून आठ पदे रिक्त आहेत. आदिवासी विकास विभागाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या अब्दुल कलाम सकस आहार योजनेचा पुरता बोजवारा उडाला. या योजनेत गर्भवती महिलेस सातव्या महिन्या पासून सकस आहार दिला जातो. पंरतु तीही योजना गंभीर पणे राबविली जात नसल्याने कुपोषणाच्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यÞात आरोग्य सेवेची दुर्दशा झाली असून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ग्रामीण रूग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ, भुलतज्ञ नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांची परवड अधिक वाढली आहे, असे आरोप यावेळी करण्यात आले. खरंतर या जिल्हा निर्मिती नंतर आदिवासी भागातील प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहायला हवे होते. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे आदिवासी भागातील जनतेला मरणयातना भोगाव्या लागत आहेत. अशा उदासीन सरकारला जाग यावी म्हणून श्रमजीवी संघटनेने आदिवासींच्या देवाला साकडे घालण्याच्या पारंपरिक रवाळ पध्दतीने पूजा घालून गाणी गात तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले.पूर्वीच्या काळी ग्रामीण आदिवासी भागात वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नसल्याने आदिवासी समाज आपली पारंपरिक उपचार पद्धती अवलंबित असे. आजही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अभावी जिल्ह्यÞातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याने आदिवासींवर पुन्हा अंधश्रद्धा जोपासत भगतिगरी व बुवाबाजीवर अवलंबून राहावे लागणार असल्याचा प्रसंग ओढवणार आहे. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून रवाळ पध्दतीने आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद थुले, संघटक सरिता जाधव, जयराम बरफ, बाळाराम पाडोसा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)जव्हारमध्येही आंदोलनजव्हार : श्रमजीवी संघटनेकडून सरकारला शुद्ध येण्याकरीता जिल्ह्यातील प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी आदिवासी रवाळ भरवून नवस बोलण्यात आले. संघटनेकडून हे आंदोलन सोमवार तहसील कार्यालयाच्या आवारात आदिवासीसमाजाचे तारपा व इतर वाद्य वाजवून रवाळ पध्दतीने देवालासाकडे घालण्यात आले. ठाणे जिल्ह्रयाचे विभाजन होऊन आदिवासी बहूलक्षेत्र असलेल्या पालघर जिल्हयाची निर्मिती होऊन १ आॅगस्ट २०१६ रोजी २ वर्ष पुर्णझाली. दोन वर्षापुर्वी निवडणूका डोळयासमोर ठेवून कुठलीही पूर्व तयारी नसताना जिल्हयाची निर्मिती झाली. परंतु जिल्हयासाठी आवश्यक असलेले प्रशासन व त्यसाठी लागणारे मनुष्याळ आपल्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने पालघर जिल्हयाला अद्याप दिलेले नाही हे संघटनेद्वारे निदर्शनास आणले आहे.