शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

घरांची विक्री कारपेटनुसारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 05:02 IST

देशातील बांधकाम व्यवसायाला शिस्त लावतानाच बिल्डरांच्या मनमानी कारभाराला चाप लावणारा ‘रिअल इस्टेट रेग्यूलेशन अ‍ॅक्ट’ अर्थात रेरा

अतुल कुलकर्णी / मुंबईदेशातील बांधकाम व्यवसायाला शिस्त लावतानाच बिल्डरांच्या मनमानी कारभाराला चाप लावणारा ‘रिअल इस्टेट रेग्यूलेशन अ‍ॅक्ट’ अर्थात रेरा कायदा महाराष्ट्रासह देशभरात उद्या १ मेपासून लागू होणार आहे. या कायद्यानुसार यापुढे घरांची विक्री कारपेट एरियानुसारच करावी लागेल. शिवाय, देण्यात येणाऱ्या पार्र्कींगची जागा व किंमतही करारपत्रात नमूद करावी लागणार आहे. आजपासून राज्यात ‘रेरा’ कायदा लागू होत असला तरी प्राधिकरणाचे सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण करणे, न्यायाधिकरणाचे प्रमुख नेमणे या गोष्टी अद्याप बाकी आहेत. त्याला किती वेळ लागतो यावरही या कायद्याची अंमलबजावणी अवलंबून राहणार आहे.केंद्र शासनाने केलेल्या नियमांपेक्षा वेगळ्या बाबी राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाने या ‘रेरा’ कायद्यात नमूद केल्या आहेत. त्यात त्यात कव्हर कार पार्किंग स्पेस, डिस्क्लोजर, एफएसआय, फेस आॅफ रियल इस्टेट प्रोजेक्ट, रिडेव्हल्पमेंट स्कीम यांच्या वेगळ्या व्याख्या करण्यात आल्या आहेत. मंजूर आराखड्यासोबत प्रस्तावित आराखडा आणि प्रस्तावित लेआऊट हे देखील बिल्डरांना यापुढे प्रकल्प सादर करताना द्यावे लागणार आहे. शिवाय प्रकल्पाची अंदाजे रक्कम, जमिनीची रक्कम, बांधकाम खर्च यांचा तपशिलही बिल्डरांना द्यावा लागणार असून सुरु असणाऱ्या प्रकल्पांमध्ये पूर्णत्वाचा दाखला आणि रहवास प्रमाणपत्र दिलेल्या इमारती वगळून इतर प्रकल्पाचा भाग नव्याने नोंदणी करण्याची मुभा राज्याने देऊ केली आहे. त्याशिवाय एखादा प्रकल्प रद्द करण्यापूर्वी बिल्डरला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी ठेवली असून प्राधिकरणास वाटले तर ग्राहकांना आणि त्या प्रकल्पांमध्ये ‘थर्ड पार्टी इंटरेस्ट’ निर्माण झालेल्या  संस्थांनाही म्हणणे मांडण्याची  संधी देण्याचा नियम राज्याने केला आहे. राज्य सरकारने यासाठी तात्पुरत्या स्वरुपात प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चटर्जी यांची नेमणूक केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश अथवा ते सुचवतील ते न्यायाधिश, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव आणि विधी व न्यायविभागाचे सचिव यांची समिती या प्राधिकरणासाठीचे तीन किंवा पाच सदस्यांची निवड करेल आणि त्यातून अध्यक्षाची निवड केली जाईल. यासाठी १० आजी-माजी अधिकाऱ्यांची अर्ज केले आहेत. ज्यात गौतम चटर्जी यांच्यासह निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी, निवृत्त सचिव तानाजी सत्रे, तसेच प्रधान सचिव उज्वल उके, सचिव केरुरे यांचाही त्यात समावेश आहे. ही निवड करताना अधिकाऱ्यांची पूर्वपिठीका देखील तपासली जाणार असल्याचे गृहनिर्माण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.यापुढे प्रकल्प पूर्ण करण्याचे वेळापत्रक सुरुवातीलाच द्यावे लागणार आहे. तर तयार झालेल्या घराचा ताबा घेण्यासाठी बिल्डरचे पत्र मिळाल्यानंतर १५ दिवसाच्या आत ताबा घ्यावा लागेल. अन्यथा मेन्टेनन्सचा खर्च ग्राहकांच्या नावावर सुरु होईल, देशभरात हा कायदा लागू करण्यात आला. 13राज्ये आणि संघ राज्यांनी नियम तयार केले आहेत.नव्याने प्रकल्प मंजूर करणाऱ्यांची सगळी माहिती आता ‘रेरा’च्या वेबसाईटवर टाकावी लागणार असून त्यात ज्या जागेवर प्रकल्प होणार आहे त्या जागेच्या मालकीपासून ते आराखडे, मंजुऱ्या अशा सगळ्या गोष्टींचे पुरावे बिल्डरला द्यावे लागतील आणि ते कोणालाही पाहाण्यास उपलब्ध असतील.