शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

पोटाची खळगी भरण्यासाठी सोडले घरदार

By admin | Updated: April 29, 2016 01:46 IST

राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाने जनजीवन विस्कळीत झाले असून, पाण्याअभावी शेकडो एकर शेती पडीक पडली आहे

राजेगाव : राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाने जनजीवन विस्कळीत झाले असून, पाण्याअभावी शेकडो एकर शेती पडीक पडली आहे. काही भागात हातची पिके जळून गेल्यामुळे शेतकऱ्यापुढे कुटुंबाच्या रोजीरोटीचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभारला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे लहानाची मोठी केलेली चारा व पाणी न मिळाल्याने जनावरे मरणासन्न झाली आहेत. काही भागात जनावरे डोळ्यांदेखत मरण्यापेक्षा रामभरोसे वाऱ्यावर सोडून दिलेली आहेत. शेतीच पडीक पडल्याने मजुरांना शेतात कामधंदा मिळत नाही तसेच गावच्या आसपास रोजगारही उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे लोंढे दोन वेळच्या भाकरीसाठी शहराकडे निघाले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी घरंदारं, नातीगोती सोडून काळजावर दगड ठेवून जड अंतकरणाने त्याने आपले चंबूगबाळ आवरून शहराची वाट धरू लागला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीच नसल्याने स्वत:चे राहते घर, बागायती अथवा जिरायती जमीन सोडून शहराचा आसऱ्यास जाऊन मिळेल ते काम करण्याची वाईट वेळ या दुष्काळग्रस्तांवर आली आहे. काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. आई-बापाबरोबर मुलेही दुष्काळी भागातील शाळा सोडून शहरात जाऊन छोटे-मोठे काम करत संसाराला आधार देऊ लागली आहेत. मुले जोपर्यंत लहान आहेत आणि हाताखाली येत नाहीत तोपर्यंत दुष्काळाने घाला घालून थकलेल्या वयातही मिळेल ते काम करून पोट भरण्याची वाईट वेळ आली आहे. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक असल्याने या भागातील नागरिकांनी पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई या शहरांचा रस्ता धरला आहे. अशीच परिस्थिती दौंड तालक्यातील काही गावांची आहे. स्वत:चे हक्काचे घर जमीन सोडून आलो याचे दु:ख वाटते. पण पाणी नसेल तर त्या जमिनीकडे पाहून तरी काय करणार. गावातदेखील दुष्काळामुळे कामधंदे बंद पडल्यामुळे हाताला काम मिळत नाही. मोलमजुरी करून पोट भरावे तर तेही नाही. यामुळे नाईलाजास्तव गाव सोडावे लागले आहे. पण येथे काहीतरी कामधंदा मिळतो. कसेतरी दिवस काढू शकतो. >एका कुटुंबाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की , दुष्काळामुळे गावाकडे शेतीत पीकपाणी नाही. रोजच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मुलाला पुढचे शिक्षण घेता येईना. गावात पाण्याचा थेंब नाही. मैलोन्मैल चालत जाऊन पाणी आणावे लागते. अर्धा दिवस पाणी आणण्यातच जातो. पाणी आहे तर माणूस, नाही तर काही नाही. एक वेळ दिवसातून एकदा जेवण दिले तरी चालेल पण प्यायला पाणी हे पाहिजेच. पाण्याअभावीचे जीवन आम्ही अनुभवले आहे. दुष्काळामुळे पोट भरण्यासाठी नाईलाजाने आम्ही या भागाच्या आश्रयास आलो.दुष्काळामुळे गावची गावे ओस पडली आहेत. गावातले सगळेच पोटापाण्यासाठी शहराचा रस्ता धरायला लागले आहेत. घरातील पुरुष मंडळी मोलमजुरी तर महिला घरकाम करून रोजची भाकरीची सोय करीत आहेत. शहरात हाताला काम मिळते म्हणून घरादाराच्या पोटापाण्याची सोय होत आहे. गावाला धरून बसलो तर दुष्काळाने पाण्यावाचून तडफडून मरायची वेळ आली असती. त्यामुळे गाव सोेडण्याचा निर्णय घेतला.