शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

पोटाची खळगी भरण्यासाठी सोडले घरदार

By admin | Updated: April 29, 2016 01:46 IST

राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाने जनजीवन विस्कळीत झाले असून, पाण्याअभावी शेकडो एकर शेती पडीक पडली आहे

राजेगाव : राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाने जनजीवन विस्कळीत झाले असून, पाण्याअभावी शेकडो एकर शेती पडीक पडली आहे. काही भागात हातची पिके जळून गेल्यामुळे शेतकऱ्यापुढे कुटुंबाच्या रोजीरोटीचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभारला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे लहानाची मोठी केलेली चारा व पाणी न मिळाल्याने जनावरे मरणासन्न झाली आहेत. काही भागात जनावरे डोळ्यांदेखत मरण्यापेक्षा रामभरोसे वाऱ्यावर सोडून दिलेली आहेत. शेतीच पडीक पडल्याने मजुरांना शेतात कामधंदा मिळत नाही तसेच गावच्या आसपास रोजगारही उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे लोंढे दोन वेळच्या भाकरीसाठी शहराकडे निघाले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी घरंदारं, नातीगोती सोडून काळजावर दगड ठेवून जड अंतकरणाने त्याने आपले चंबूगबाळ आवरून शहराची वाट धरू लागला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीच नसल्याने स्वत:चे राहते घर, बागायती अथवा जिरायती जमीन सोडून शहराचा आसऱ्यास जाऊन मिळेल ते काम करण्याची वाईट वेळ या दुष्काळग्रस्तांवर आली आहे. काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. आई-बापाबरोबर मुलेही दुष्काळी भागातील शाळा सोडून शहरात जाऊन छोटे-मोठे काम करत संसाराला आधार देऊ लागली आहेत. मुले जोपर्यंत लहान आहेत आणि हाताखाली येत नाहीत तोपर्यंत दुष्काळाने घाला घालून थकलेल्या वयातही मिळेल ते काम करून पोट भरण्याची वाईट वेळ आली आहे. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक असल्याने या भागातील नागरिकांनी पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई या शहरांचा रस्ता धरला आहे. अशीच परिस्थिती दौंड तालक्यातील काही गावांची आहे. स्वत:चे हक्काचे घर जमीन सोडून आलो याचे दु:ख वाटते. पण पाणी नसेल तर त्या जमिनीकडे पाहून तरी काय करणार. गावातदेखील दुष्काळामुळे कामधंदे बंद पडल्यामुळे हाताला काम मिळत नाही. मोलमजुरी करून पोट भरावे तर तेही नाही. यामुळे नाईलाजास्तव गाव सोडावे लागले आहे. पण येथे काहीतरी कामधंदा मिळतो. कसेतरी दिवस काढू शकतो. >एका कुटुंबाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की , दुष्काळामुळे गावाकडे शेतीत पीकपाणी नाही. रोजच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मुलाला पुढचे शिक्षण घेता येईना. गावात पाण्याचा थेंब नाही. मैलोन्मैल चालत जाऊन पाणी आणावे लागते. अर्धा दिवस पाणी आणण्यातच जातो. पाणी आहे तर माणूस, नाही तर काही नाही. एक वेळ दिवसातून एकदा जेवण दिले तरी चालेल पण प्यायला पाणी हे पाहिजेच. पाण्याअभावीचे जीवन आम्ही अनुभवले आहे. दुष्काळामुळे पोट भरण्यासाठी नाईलाजाने आम्ही या भागाच्या आश्रयास आलो.दुष्काळामुळे गावची गावे ओस पडली आहेत. गावातले सगळेच पोटापाण्यासाठी शहराचा रस्ता धरायला लागले आहेत. घरातील पुरुष मंडळी मोलमजुरी तर महिला घरकाम करून रोजची भाकरीची सोय करीत आहेत. शहरात हाताला काम मिळते म्हणून घरादाराच्या पोटापाण्याची सोय होत आहे. गावाला धरून बसलो तर दुष्काळाने पाण्यावाचून तडफडून मरायची वेळ आली असती. त्यामुळे गाव सोेडण्याचा निर्णय घेतला.