शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विचार करण्यासाठी सभागृहाचं कामकाज बंद केलं जातं - जयंत पाटील

By admin | Updated: August 3, 2016 19:47 IST

लोकशाही टिकवण्यासठी सभागृहाचं कामकाज सुरु असतं, तर विचार करण्यासाठी कामकाज बंद केलं जातं असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 -  लोकशाही टिकवण्यासाठी सभागृहाचं कामकाज सुरु असतं, तर विचार करण्यासाठी कामकाज बंद केलं जातं असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी जयंत पाटील यांनी प्रश्न विचारले असता जयंत पाटील यांनी उत्तर दिली. महाराष्ट्र अखंड रहावा असं आम्हाला वाटते असंही यावेळी जयंत पाटील बोलले आहेत.
 
विधिमंडळाचा पूर्वइतिहास
 
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला १३८ वर्षांचा प्रदीर्घ व वैभवशाली इतिहास आहे. ब्रिटिश कारकिर्दीत मुंबई इलाखा होता. त्या वेळच्या मुंबई प्रांतामध्ये मराठवाडा व विदर्भाचा भाग वगळून आताच्या महाराष्ट्रासह बेळगाव, कारवार, विजापूर हे भाग, तसेच भारताची फाळणी होण्यापूर्वीचा सिंध प्रांत व सध्याचे गुजरात राज्य यांचा समावेश होता. 
ब्रिटिशाच्या काळातच विधिमंडळे अस्तित्वात आली आणि हळूहळू त्यांचे अधिकार वाढविण्यात आले. या प्रक्रियेची सुरुवात १८६१ सालच्या इंडियन काउन्सिल अ‍ॅक्टने झाली आणि १८६२ साली आठ-दहा सभासदांचे COUNCIL OF THE GOVERNOR OF BOMBAY ASSEMBLED FOR THE PURPOSE OF MAKING LAW AND REGULATIONS  स्थापन झाले व २२ जानेवारी १८६२ रोजी त्यांची पहिली बैठक झाली. त्यानंतर, १८९२ च्या इंडियन काउन्सिल्स अ‍ॅक्ट अन्वये विधिमंडळाचे अधिकार काही प्रमाणात वाढविण्यात आले. प्रश्न विचारणे, पुरवणी प्रश्न विचारणे, अंदाजपत्रकाची चर्चा करणे, असे त्यांचे साधारणत: स्वरूप होते. सध्याच्या कामांच्या तुलनेत त्या कामांची व्याप्ती फारच मर्यादित होती. त्यानंतर, १९०८ साली मोर्ले-मिंटो सुधारणा आल्या आणि १९१९ साली माँटेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा येऊन खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाहीची बिजे रोवली गेली व प्रांताप्रांतात द्विदल राज्यपद्धती सुरू झाली. त्यानंतर, १९३५ चा गव्हर्नमेंट आॅफ इंडिया अ‍ॅक्ट अस्तित्वात आला, ज्यात संघराज्यात्मक शासनपद्धती स्वीकारण्यात आली आणि प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. १९३५ च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्टमध्ये कायदे मंडळात लोकप्रतिनिधींना निवडणुकीद्वारे प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून खरे म्हणजे निवडणुकांना सुरुवात झाली. त्यामध्ये स्थानिक लोकांना कायदेमंडळावर प्रतिनिधित्व मिळाले. या कायद्यान्वयेच तेव्हाच्या मुंबई कायदेमंडळाचे ‘विधानसभा व विधानपरिषद’ असे नामाभिधान होऊन दोन सभागृहे मुंबई प्रांतात जुलै १९३७ मध्ये अस्तित्वात आली. स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अमलात आली. 
घटनेतील तरतुदींच्या अनुषंगाने १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेनुसार द्वैभाषिक मुंबई राज्य विधानमंडळ व पुढे १ मे १९६० रोजी राज्य पुनर्रचना कायद्यानुसार ‘महाराष्ट्र राज्य’ स्थापन झाल्यानंतर ‘महाराष्ट्र विधानमंडळ’ अस्तित्वात आले.