शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

विचार करण्यासाठी सभागृहाचं कामकाज बंद केलं जातं - जयंत पाटील

By admin | Updated: August 3, 2016 19:47 IST

लोकशाही टिकवण्यासठी सभागृहाचं कामकाज सुरु असतं, तर विचार करण्यासाठी कामकाज बंद केलं जातं असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 -  लोकशाही टिकवण्यासाठी सभागृहाचं कामकाज सुरु असतं, तर विचार करण्यासाठी कामकाज बंद केलं जातं असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी जयंत पाटील यांनी प्रश्न विचारले असता जयंत पाटील यांनी उत्तर दिली. महाराष्ट्र अखंड रहावा असं आम्हाला वाटते असंही यावेळी जयंत पाटील बोलले आहेत.
 
विधिमंडळाचा पूर्वइतिहास
 
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला १३८ वर्षांचा प्रदीर्घ व वैभवशाली इतिहास आहे. ब्रिटिश कारकिर्दीत मुंबई इलाखा होता. त्या वेळच्या मुंबई प्रांतामध्ये मराठवाडा व विदर्भाचा भाग वगळून आताच्या महाराष्ट्रासह बेळगाव, कारवार, विजापूर हे भाग, तसेच भारताची फाळणी होण्यापूर्वीचा सिंध प्रांत व सध्याचे गुजरात राज्य यांचा समावेश होता. 
ब्रिटिशाच्या काळातच विधिमंडळे अस्तित्वात आली आणि हळूहळू त्यांचे अधिकार वाढविण्यात आले. या प्रक्रियेची सुरुवात १८६१ सालच्या इंडियन काउन्सिल अ‍ॅक्टने झाली आणि १८६२ साली आठ-दहा सभासदांचे COUNCIL OF THE GOVERNOR OF BOMBAY ASSEMBLED FOR THE PURPOSE OF MAKING LAW AND REGULATIONS  स्थापन झाले व २२ जानेवारी १८६२ रोजी त्यांची पहिली बैठक झाली. त्यानंतर, १८९२ च्या इंडियन काउन्सिल्स अ‍ॅक्ट अन्वये विधिमंडळाचे अधिकार काही प्रमाणात वाढविण्यात आले. प्रश्न विचारणे, पुरवणी प्रश्न विचारणे, अंदाजपत्रकाची चर्चा करणे, असे त्यांचे साधारणत: स्वरूप होते. सध्याच्या कामांच्या तुलनेत त्या कामांची व्याप्ती फारच मर्यादित होती. त्यानंतर, १९०८ साली मोर्ले-मिंटो सुधारणा आल्या आणि १९१९ साली माँटेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा येऊन खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाहीची बिजे रोवली गेली व प्रांताप्रांतात द्विदल राज्यपद्धती सुरू झाली. त्यानंतर, १९३५ चा गव्हर्नमेंट आॅफ इंडिया अ‍ॅक्ट अस्तित्वात आला, ज्यात संघराज्यात्मक शासनपद्धती स्वीकारण्यात आली आणि प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. १९३५ च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्टमध्ये कायदे मंडळात लोकप्रतिनिधींना निवडणुकीद्वारे प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून खरे म्हणजे निवडणुकांना सुरुवात झाली. त्यामध्ये स्थानिक लोकांना कायदेमंडळावर प्रतिनिधित्व मिळाले. या कायद्यान्वयेच तेव्हाच्या मुंबई कायदेमंडळाचे ‘विधानसभा व विधानपरिषद’ असे नामाभिधान होऊन दोन सभागृहे मुंबई प्रांतात जुलै १९३७ मध्ये अस्तित्वात आली. स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अमलात आली. 
घटनेतील तरतुदींच्या अनुषंगाने १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेनुसार द्वैभाषिक मुंबई राज्य विधानमंडळ व पुढे १ मे १९६० रोजी राज्य पुनर्रचना कायद्यानुसार ‘महाराष्ट्र राज्य’ स्थापन झाल्यानंतर ‘महाराष्ट्र विधानमंडळ’ अस्तित्वात आले.