शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विचार करण्यासाठी सभागृहाचं कामकाज बंद केलं जातं - जयंत पाटील

By admin | Updated: August 3, 2016 19:47 IST

लोकशाही टिकवण्यासठी सभागृहाचं कामकाज सुरु असतं, तर विचार करण्यासाठी कामकाज बंद केलं जातं असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 -  लोकशाही टिकवण्यासाठी सभागृहाचं कामकाज सुरु असतं, तर विचार करण्यासाठी कामकाज बंद केलं जातं असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी जयंत पाटील यांनी प्रश्न विचारले असता जयंत पाटील यांनी उत्तर दिली. महाराष्ट्र अखंड रहावा असं आम्हाला वाटते असंही यावेळी जयंत पाटील बोलले आहेत.
 
विधिमंडळाचा पूर्वइतिहास
 
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला १३८ वर्षांचा प्रदीर्घ व वैभवशाली इतिहास आहे. ब्रिटिश कारकिर्दीत मुंबई इलाखा होता. त्या वेळच्या मुंबई प्रांतामध्ये मराठवाडा व विदर्भाचा भाग वगळून आताच्या महाराष्ट्रासह बेळगाव, कारवार, विजापूर हे भाग, तसेच भारताची फाळणी होण्यापूर्वीचा सिंध प्रांत व सध्याचे गुजरात राज्य यांचा समावेश होता. 
ब्रिटिशाच्या काळातच विधिमंडळे अस्तित्वात आली आणि हळूहळू त्यांचे अधिकार वाढविण्यात आले. या प्रक्रियेची सुरुवात १८६१ सालच्या इंडियन काउन्सिल अ‍ॅक्टने झाली आणि १८६२ साली आठ-दहा सभासदांचे COUNCIL OF THE GOVERNOR OF BOMBAY ASSEMBLED FOR THE PURPOSE OF MAKING LAW AND REGULATIONS  स्थापन झाले व २२ जानेवारी १८६२ रोजी त्यांची पहिली बैठक झाली. त्यानंतर, १८९२ च्या इंडियन काउन्सिल्स अ‍ॅक्ट अन्वये विधिमंडळाचे अधिकार काही प्रमाणात वाढविण्यात आले. प्रश्न विचारणे, पुरवणी प्रश्न विचारणे, अंदाजपत्रकाची चर्चा करणे, असे त्यांचे साधारणत: स्वरूप होते. सध्याच्या कामांच्या तुलनेत त्या कामांची व्याप्ती फारच मर्यादित होती. त्यानंतर, १९०८ साली मोर्ले-मिंटो सुधारणा आल्या आणि १९१९ साली माँटेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा येऊन खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाहीची बिजे रोवली गेली व प्रांताप्रांतात द्विदल राज्यपद्धती सुरू झाली. त्यानंतर, १९३५ चा गव्हर्नमेंट आॅफ इंडिया अ‍ॅक्ट अस्तित्वात आला, ज्यात संघराज्यात्मक शासनपद्धती स्वीकारण्यात आली आणि प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. १९३५ च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्टमध्ये कायदे मंडळात लोकप्रतिनिधींना निवडणुकीद्वारे प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून खरे म्हणजे निवडणुकांना सुरुवात झाली. त्यामध्ये स्थानिक लोकांना कायदेमंडळावर प्रतिनिधित्व मिळाले. या कायद्यान्वयेच तेव्हाच्या मुंबई कायदेमंडळाचे ‘विधानसभा व विधानपरिषद’ असे नामाभिधान होऊन दोन सभागृहे मुंबई प्रांतात जुलै १९३७ मध्ये अस्तित्वात आली. स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अमलात आली. 
घटनेतील तरतुदींच्या अनुषंगाने १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेनुसार द्वैभाषिक मुंबई राज्य विधानमंडळ व पुढे १ मे १९६० रोजी राज्य पुनर्रचना कायद्यानुसार ‘महाराष्ट्र राज्य’ स्थापन झाल्यानंतर ‘महाराष्ट्र विधानमंडळ’ अस्तित्वात आले.