शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निवडणुकीमुळे हॉटेल, ढाबे हाऊसफुल्ल!

By admin | Updated: February 10, 2017 02:57 IST

नोटाबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यवसायाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे चलती आली आहे. ढाबे, हॉटेल

मंचर : नोटाबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यवसायाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे चलती आली आहे. ढाबे, हॉटेल आता गर्दीने फुल होऊ लागले असून, राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच उमेदवारांनी जेवणावळीचा सपाटा लावला आहे. सामिष आहाराला पसंती असून, मतदान होईपर्यंत जेवणावळीचे सत्र सुरूच राहणार आहे. हॉटेल व्यवसायावरील मंदीचे सावट काहीसे दूर झाले आहे.नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला, तसाच तो हॉटेल व्यवसायालासुद्धा बसला. मंदीचे सावट आले. हातात चलन नसल्याने ग्राहकांनी हॉटेलमध्ये जाऊन खाणे बंद केले होते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना रोजचा खर्च भागविणे देखील मुश्कील झाले होते. तीन महिने हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला होता. मंचर शहरात तर काही ठिकाणी वडापाव स्वस्त करून चक्क पाच रुपयांना मिळत आहे. काही हॉटेल चालकांवर कामगार कपात करण्याची वेळ आली होती. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले. आता रणधुमाळी सुरू झाली असून नोटाबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यवसायाला अचानक मागणी वाढली आहे. पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यामुळे हॉटेलं गजबजू लागली आहेत. शाकाहारी व मासांहारी जेवणाला प्राधान्य दिले जाते. जेवणावळी झडू लागल्या असून हे सत्र मतदान होईपर्यंत सुरूच राहणार आहे. पूर्वी प्रचार करणारे कार्यकर्ते झाडाखाली बसून डब्बे, पिठलं-भाकर, भेळ खायचे, दुपारी, रात्रीच्या वेळी एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा बेत आखला जाई. आता मात्र बहुतेकांना हॉटेलची अपेक्षा असते. प्रचार करणाऱ्यांना दुपारी व रात्रीचे जेवण हे ढाबा अथवा हॉटेलमध्ये दिले जाते. काही उमेदवारांनी ठराविक हॉटेल बुक केली असून कुपन पद्धत सुरू केली आहे. काही उमेदवारांनी घरीच भटारखाना (स्वयंपाकघर) सुरू करण्याची तयारी केली आहे. घरी जेवण बनवून ते कार्यकर्त्यांना दिले तर खर्चातसुद्धा बऱ्यापैकी बचत होते. साध्या बैठकीतही पोहे-चहाचा नाष्टा दिला जात आहे. (वार्ताहर)