शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

पदवीधर डॉक्टरांशिवाय रुग्णालये

By admin | Updated: February 9, 2015 05:46 IST

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागांत बरीच रुग्णालये मान्यताप्राप्त पदवीधर डॉक्टरांशिवाय चालत असल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला

पंढरीनाथ कुंभार, भिवंडीभिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागांत बरीच रुग्णालये मान्यताप्राप्त पदवीधर डॉक्टरांशिवाय चालत असल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत आरोग्य सेवा मुंबई व शासनाच्या आरोग्य विभागाकडून शहर व ग्रामीण रुग्णालयांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. भिवंडी शहर व ग्रामीण भागांत मोठ्या संख्येने कामगारवर्गाचे वास्तव्य आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या उदासीनतेचे दुष्परिणाम रहिवाशांना सोसावे लागतात. एक खासदार, दोन आमदार व ९० नगरसेवक असताना महापालिकेचे स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय शासनाकडे सोपवून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात सर्व राजकीय पुढाऱ्यांनी धन्यता मानली आहे. मात्र, मनपास ग्रामीण आरोग्य सेवेप्रमाणे नागरी आरोग्य केंद्र शहरात सुरू करता आले नाही. या स्थितीचा गैरफायदा घेत शहरात मोठमोठी रुग्णालये उभी राहिली आहेत. मात्र, बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये एमबीबीएस, एमडी, सर्जन असे डॉक्टर नसून होमिओपथी, आयुर्वेदिक व इलेक्ट्रोपथी डॉक्टर बिनधास्तपणे अ‍ॅलिओपथीचे उपचार करत आहेत. उपचार करताना रुग्णाची प्रकृती हाताबाहेर गेली की, असे डॉक्टर रुग्णास मुंबईस नेण्याचा सल्ला देतात. योग्य वेळी आवश्यक उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावतो,अशा घटना बऱ्याचवेळा घडतात. मात्र, बहुसंख्य कामगार व रहिवासी परप्रांतीय असल्याने अशा घटनांना वाचा फुटत नाही. काही वेळा रुग्णाच्या नातेवाइकांवर दबाव आणून अशी प्रकरणे परस्पर निकाली काढली जातात.महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपासून शहरातील रुग्णालये, खाजगी दवाखाने व रक्त, लघवी तपासणी प्रयोगशाळेची नोंदणी पूर्ण झालेली नाही. आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षामुळे रहिवाशांच्या जीवास धोका आहे. महापालिकेकडून सध्या बीजीपी दवाखाना या एकमेव ठिकाणी उपचार केले जातात. पालिकेच्या इतर १४ केंद्रांत बा'रुग्ण विभाग सुरू नसल्याने खासगी दवाखान्यांत जावे लागते.