शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग आगीत खाक

By admin | Updated: December 29, 2016 23:11 IST

निगडी खुर्दमधील घटना : दहा लाखांचे नुकसान

जत : तालुक्यातील निगडी खुर्द येथील विजय लक्ष्मण जाधव व राजकुमार लक्ष्मण जाधव यांच्या शेतजमिनीतील फळबागेला विद्युतवाहिनीतून ठिणग्या पडून आग लागली. यामध्ये दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २० डिसेंबररोजी दुपारी एकच्यादरम्यान घडली. याप्रकरणी जाधव बंधूूंनी गुरुवारी (दि. २९) जत पोलिसांत तक्रार दाखल केली.निगडी खुर्द गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतजमिनीत आंबा, चिकू व द्राक्षबाग असून, सभोवताली पेरू, अंजीर, नारळ आदी फळझाडे लावली आहेत. फळबाग आणि झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या फळबागेवरून पवनऊर्जा कंपनीच्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या तारा गेल्या आहेत. २० डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्यादरम्यान वीज वाहक तारांमधून ठिणग्या बागेत पडल्याने संपूर्ण आंब्याची, चिकूची बाग व सभोवताली असलेली पेरू, अंजीर, नारळाची झाडे आणि द्राक्षबागेतील दोनशे झाडे जळून भस्मसात झाली. आग लागल्यानंतर ठिबक सिंचनची पाईप वितळून गेली आहे. याप्रकरणी गावकामगार तलाठी निखिल पाटील, कोतवाल विनोद कोळी, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा प्रस्ताव त्यांनी शासनाला सादर केला आहे.शासनाने पंचनामा करून आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे दाखविले आहे. मागील आठ-दहा वर्षांपासून फळबागेची जोपासना केली आहे. ठिबक सिंचनची संपूर्ण यंत्रणा भस्मसात झाली आहे. आता नव्याने फळबागेची उभारणी करावी लागणार आहे. त्यामुळे सुमारे पंचवीस लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जाधव बंधूूंनी केली आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनीही महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)