शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दोन जागांवर अडले सहमतीचे घोडे!

By admin | Updated: December 1, 2015 04:22 IST

विधान परिषदेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी सोलापूर आणि अहमदनगर या दोन जागांवर एकमत होऊ शकले नाही. काँगे्रसने पाच जागांचा

- अतुल कुलकर्णी,  मुंबईविधान परिषदेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी सोलापूर आणि अहमदनगर या दोन जागांवर एकमत होऊ शकले नाही. काँगे्रसने पाच जागांचा आग्रह धरल्यामुळे सोमवारची बैठक निष्फळ ठरली. आता २ डिसेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे.विधान परिषद निवडणुकीचे जागा वाटप करण्यासाठी आज दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पक्षीय बलाबल बदलले आहे. काँग्रेसची ताकद वाढली आहे, असा सूर लावत काँग्रेसने सोलापूर, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, नगर आणि मुंबई या पाच जागांवर दावा केला. अहमदनगरची जागा अपक्ष म्हणून गेल्या वेळी लढवली गेल्याने व आता नगरमध्ये आपली ताकद जास्त असल्याचे सांगत काँग्रेसने नगरवर ताबा सांगितला. नागपूर आणि अकोला-बुलढाणा राष्ट्रवादीने घ्यावे, असा प्रस्ताव काँग्रेसने त्यांच्यापुढे ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. नागपूरमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे ती जागा काँग्रेस जिंकू शकत नाही म्हणून ती राष्ट्रवादीला देण्याचे घाटत आहे. तर बुलडाणा-वाशिम अवघ्या चार मतांनी आम्ही हरलो तेव्हा ती जागा आम्हाला द्या, असा आग्रह राष्ट्रवादीचा आहे. अशा आहेत जागा१ जानेवारी रोजी विधान परिषदेच्या ८ जागा रिक्त होणार आहेत. त्यात मुंबईतून भाई जगताप, धुळे-नंदुरबारहून अमरिश पटेल, कोल्हापूरहून महादेव महाडिक आणि नागपूरहून राजेंद्र मुळक असे चौघे काँग्रेसतर्फे निवडून आले होते; तर दीपक साळुंके सोलापूरहून राष्ट्रवादीतर्फे विजयी झाले होते. अहमदनगरहून अरुणकाका जगताप अपक्ष म्हणून निवडून आले; पण नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. रामदास कदम शिवसेनेतर्फे मुंबईतून निवडून आले होते; तर अकोला- बुलडाणा-वाशिममधून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया निवडून आले होते.मुंबईत काँग्रेसचे संख्याबळ ७४ आहे. पहिल्या पसंतीची मते मिळवून जिंकून येण्यासाठी ७६ मतांची गरज आहे. त्यामुळे मुंबईतही काँग्रेसने नारायण राणे यांचे नाव पुढे करावे, असा काँग्रेसमधील एका गटाचा आग्रह आहे.