शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दोन जागांवर अडले सहमतीचे घोडे!

By admin | Updated: December 1, 2015 04:22 IST

विधान परिषदेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी सोलापूर आणि अहमदनगर या दोन जागांवर एकमत होऊ शकले नाही. काँगे्रसने पाच जागांचा

- अतुल कुलकर्णी,  मुंबईविधान परिषदेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी सोलापूर आणि अहमदनगर या दोन जागांवर एकमत होऊ शकले नाही. काँगे्रसने पाच जागांचा आग्रह धरल्यामुळे सोमवारची बैठक निष्फळ ठरली. आता २ डिसेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे.विधान परिषद निवडणुकीचे जागा वाटप करण्यासाठी आज दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पक्षीय बलाबल बदलले आहे. काँग्रेसची ताकद वाढली आहे, असा सूर लावत काँग्रेसने सोलापूर, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, नगर आणि मुंबई या पाच जागांवर दावा केला. अहमदनगरची जागा अपक्ष म्हणून गेल्या वेळी लढवली गेल्याने व आता नगरमध्ये आपली ताकद जास्त असल्याचे सांगत काँग्रेसने नगरवर ताबा सांगितला. नागपूर आणि अकोला-बुलढाणा राष्ट्रवादीने घ्यावे, असा प्रस्ताव काँग्रेसने त्यांच्यापुढे ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. नागपूरमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे ती जागा काँग्रेस जिंकू शकत नाही म्हणून ती राष्ट्रवादीला देण्याचे घाटत आहे. तर बुलडाणा-वाशिम अवघ्या चार मतांनी आम्ही हरलो तेव्हा ती जागा आम्हाला द्या, असा आग्रह राष्ट्रवादीचा आहे. अशा आहेत जागा१ जानेवारी रोजी विधान परिषदेच्या ८ जागा रिक्त होणार आहेत. त्यात मुंबईतून भाई जगताप, धुळे-नंदुरबारहून अमरिश पटेल, कोल्हापूरहून महादेव महाडिक आणि नागपूरहून राजेंद्र मुळक असे चौघे काँग्रेसतर्फे निवडून आले होते; तर दीपक साळुंके सोलापूरहून राष्ट्रवादीतर्फे विजयी झाले होते. अहमदनगरहून अरुणकाका जगताप अपक्ष म्हणून निवडून आले; पण नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. रामदास कदम शिवसेनेतर्फे मुंबईतून निवडून आले होते; तर अकोला- बुलडाणा-वाशिममधून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया निवडून आले होते.मुंबईत काँग्रेसचे संख्याबळ ७४ आहे. पहिल्या पसंतीची मते मिळवून जिंकून येण्यासाठी ७६ मतांची गरज आहे. त्यामुळे मुंबईतही काँग्रेसने नारायण राणे यांचे नाव पुढे करावे, असा काँग्रेसमधील एका गटाचा आग्रह आहे.