शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अश्व धावले रिंगणी, झाला टाळ-मृदंगाचा ध्वनी

By admin | Updated: July 11, 2016 00:30 IST

‘अश्व धावले रिंगणी, झाला टाळ- मृदंगाचा ध्वनी’ या अभंगाची साक्ष देत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य प्रांगणात

राजीव लोहकरे,  अकलूज‘अश्व धावले रिंगणी, झाला टाळ- मृदंगाचा ध्वनी’ या अभंगाची साक्ष देत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य प्रांगणात देवाच्या व स्वाराच्या अश्वाने नेत्रदीपक दौड करीत लाखो वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.प्रारंभी सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुका नीरा स्नानासाठी नेण्यात आल्या, परंतु नीरा नदीमध्ये पाणी नसल्याने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना टँकरद्वारे स्नान घालण्यात आले. त्यानंतर पालखी अकलूजकडे मार्गस्थ झाली.संततधार पावसामुळे रिंगण होणार की नाही? याबाबत शंका होती परंतु सदाशिवराव माने विद्यालयाने रिंगणासाठी आखीव रेखीव मैदान तयार केले होते. त्यानंतर मैदानावर मधोमध पालखी ठेवून वारकऱ्यांनी गोल रिंगण केले. टाळ, मृदंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषात सकाळी रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. पताकाधारी, पखवाज व टाळकरी, तुळशीवृंदावनधारी व हांडेवाल्या महिला, वीणेकरी यांना एकापाठोपाठ एक रिंगणासाठी सोडण्यात आले. त्यांनी तुकाराम-तुकाराम असा नामघोष करीत एक रिंगण पूर्ण केले. टाळ, मृदंगाच्या गजरात चैतन्य निर्माण झाले. त्यानंतर देवाच्या अश्वास रिंगणासाठी सोडण्यात आले. या अश्वाने एक रिंगण पूर्ण करून स्वाराच्या अश्वासह दौडीस सुरुवात केली. पाहता पाहता दोन्ही अश्वांनी नेत्रदीपक दौड करून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्वांच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पूर्ण झाला. यावेळी भाविकांनी पारंपरिक पद्धतीचे खेळ खेळले. झिम्मा, फुगडी, हुतूतू हे मैदानी खेळ रंगले. रिंगणानंतर सोहळा अकलूज येथील विठ्ठल मंदिरात विसावला. सोमवारी माळीनगर येथे सोहळ्यातील उभे रिंगण होईल.(वार्ताहर)