शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

अभूतपूर्व उत्साहात इंदापुरातील अश्व रिंगण

By admin | Updated: July 8, 2016 19:11 IST

विठुमाऊलीच्या सावळ्या रंगाने ओथंबलेले आभाळ... आसावलेल्या धरतीवर भगव्या पताका खांद्यावर घेऊन, पावलात लय धरलेला ह्यग्यानबा तुकारामह्णचा घोष करणारा वारकऱ्यांचा मेळा.

तुकोबारायांचा सोहळा मालोजीनगरीत : टाळ, चिपळ्या, मृदंगाची देहभान हरपवणारी धूनइंदापूर : विठुमाऊलीच्या सावळ्या रंगाने ओथंबलेले आभाळ... आसावलेल्या धरतीवर भगव्या पताका खांद्यावर घेऊन, पावलात लय धरलेला ह्यग्यानबा तुकारामह्णचा घोष करणारा वारकऱ्यांचा मेळा... टाळ, चिपळ्या, मृदंगाची देहभान हरपवणारी धून... त्यानंतर वाऱ्याला लाजवेल अशा वेगाने मानाच्या शुभ्र-कृष्ण रंगाच्या अश्वांनी पूर्ण केलेल्या परिक्रमा... जणू काही याच वेगाने दुष्काळ हटव, अशी पांडुरंगचरणी केलेली आर्जवेच ती... इंदापूरमध्ये पार पडलेला हा रिंगणसोहळा लाखो भाविकांनी आज आपल्या अंत:करणात साठवून ठेवला. सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांच्या पालखीचे इंदापूर शहरात आगमन झाले. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा उज्ज्वला राऊत, उपनगराध्यक्षा धनश्री वाशिंबेकर यांनी पालखीचे स्वागत केले. अकलूज नाक्यालगत असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती कस्तुराबाई कदम विद्यालयाच्या प्रांगणावर रिंगण सोहळ्यासाठी पालखी दाखल झाली. रिंगणस्थळी प्रथम नगारखाना गाडीचे आगमन झाले.पालखीप्रमुख शांताराम मोरे, अशोक मोरे, सुनील मोरे, अभिजित मोरे, जालिंदर मोरे आदी प्रमुख मान्यवर सूचना देत होते. नगारखाना गाडीने प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर झेंडेकरी धावले. त्यापाठोपाठ तुळशीवाल्या, हंडेवाल्या महिलांनी प्रदक्षिणा पूर्ण करताच विणेकरी, टाळकऱ्यांची दौड झाली. हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा उज्ज्वला राऊत, राजकुमार राऊत यांच्या हस्ते मानाच्या अश्वांचे पूजन झाले. त्यानंतर ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते त्या अश्वांच्या दौडीस सुरुवात झाली. पालखीच्या मानाच्या अश्वाने विजेच्या वेगाने एक प्रदक्षिणा पूर्ण करताच, त्याच्यापाठोपाठ मोहिते-पाटील यांचा अश्वही धावला. तीन प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर अश्वांनी तुकाराममहाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार वर्षा लांडगे, पोलीस अधिकारी बापू बांगर, गटविकास अधिकारी लहू वडापुरे, पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, मंगेश पाटील, माऊली चवरे, शेखर पाटील, रघुनाथ राऊत, विशाल बोंद्रे, गिरीश शहा, कृष्णा ताटे, कैलास कदम, अविनाश मखरे, राजेंद्र राऊत, अबुल पठाण, अलका ताटे, सारिका गोळे, कमल पवार, सायरा पठाण, इब्राहिम शेख या वेळी उपस्थित होते. रिंगण सोहळ्यानंतर पालखी श्री नारायणदास रामदास हायस्कूलकडे मुक्कामाकरिता मार्गस्थ झाली. शहरात शिवाजी नागरी पतसंस्थेच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दोन हजार चष्मेवाटप करण्यात आले. चष्मेवाटपाचा शुभारंभ पद्माताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. आईसाहेब रिक्षाचालक-मालक संघटना व उमेश मोरे मित्रपरिवार, पतंजली परिवार, लायन्स क्लब, लायनेस क्लब, युवक काँग्रेस, भगवानराव भरणे नागरी पतसंस्थेच्या वतीने अल्पोपाहार, चहा, पाणी बाटलीचे वाटप करण्यात आले.रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी प्रवेशद्वारापासूनच आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रिंगणाच्या मध्यभागी इंदापूर नगर परिषदेने षटकोनी शामियाना उभारला होता. त्यामध्ये संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पादुका ठेवण्यासाठी चबुतरा उभारला होता. पहाटे निमगाव केतकीकरांचा पाहुणचार घेऊन सकाळी सहा वाजता पालखी इंदापूरकडे निघाली. सोनमाथ्यावर सोनाई उद्योगसमूहाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी वारकऱ्यांना मोफत दूध दिले. प्रवीणभैया माने यांनी या वेळी ह्यलोकमतह्णच्या अंकांचे वाटप केले. तरंगवाडीतील गोखळीच्या ओढ्याजवळ वारकऱ्यांनी न्याहारी घेतली.