शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

मान्यवर सरसावले

By admin | Updated: July 27, 2015 01:42 IST

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमन याला येत्या ३० जुलै रोजी फासावर लटकविण्यासाठी जारी झालेले डेथ वॉरन्ट वैध आहे

नवी दिल्ली : मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमन याला येत्या ३० जुलै रोजी फासावर लटकविण्यासाठी जारी झालेले डेथ वॉरन्ट वैध आहे की अवैध हा विषय सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयापुढे येणार असतानाच देशभरातील विविध पक्षांचे नेते आणि मान्यवरांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे नवी याचिका सादर करीत शिक्षा माफ करण्याची विनंती केली आहे. शत्रुघ्न सिन्हा, राम जेठमलानी यांचीही नव्या याचिकेवर स्वाक्षरी आहे. याकूबच्या याचिकेबाबत गुणवत्तेनुसार विचार केला जावा यासाठी पुरेसे पुरावे व नवे आधार आहेत, असेही याचिकेत म्हटले आहे. टाडा न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटनुसार याकूबला ३० जुलै रोजी फाशी दिली जाईल. राजकीय वाद उफाळला असताना भाजपाने याकूबच्या बचावासाठी समोर आलेल्या पक्षांना क्षुद्र राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.सुनावणीअभावी आदेश अवैध शबनम वि. भारत सरकार या प्रकरणी मे २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत याकूबला सुनावणीची संधी नाकारणे हा व्यथित करणारा भाग असून तो जाचक ठरतो. याकूबने २० वर्षांहून जास्त काळ कोठडीत काढला आहे. मात्र याकूबबाबत वेगळे निकष लावले. राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील आरोपींना फाशीऐवजी जन्मठेप सुनावली आहे.वीरप्पनच्या साथीदारांना तसेच देवेंदरपालसिंग भुल्लर यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित केली आहे. या सर्वांच्या दयायाचिकेवर राष्ट्रपतींनी लावलेला विलंब हे कारण दिले, मात्र याकूबची दयायाचिका गृहमंत्रालयाने विनाविलंब फेटाळली आहे.

दिग्गज एकत्र : जेठमलानी, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह मणिशंकर अय्यर , सीताराम येचुरी, प्रकाश करात, डी. राजा, नसरुद्दीन शाह, महेश भट्ट, एम.के. रैना आणि तुषार गांधी, न्या. पनाचंद जैन, न्या. एच.एस. बेदी, न्या. सावंत यांच्यासह अन्य दिग्गजांचा समावेश आहे. बचावासाठी १५ पानी याचिका सदर १५ पानी याचिकेवर स्वाक्षरी करणाऱ्यांनी विविध कायदेशीर मुद्दे आणि आंतरराष्ट्रीय समझोत्याबाबत युक्तिवाद केला आहे. बॉम्बस्फोट मालिकेचा कट अन्य कुणी रचला असल्याने त्याला फाशीच्या पाशातून सोडविले जावे. याकूबला फाशी दिल्यास देश जातीयवादाच्या आधारावर विभागला जाईल. देश दहशतवादी कृत्ये खपवून घेणार नाही, त्याचवेळी दयेचा अधिकार, माफी आणि न्यायाबाबत समान विचार अवलंबण्यास कटिबद्ध आहे, हा संदेश याकूबची शिक्षा माफ करीत दिला जावा, अशी विनंती आम्ही नम्रपणे करीत आहोत. रक्तपात आणि मृत्यूमुळे हा देश सुरक्षित बनणार नाही. त्यामुळे आपले सर्वांचेच अध:पतन होईल, असेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)