शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

लोणीकर यांच्यावर हायकोर्टाचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 05:29 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दैनंदिन प्रशासकीय कामात अनाठायी हस्तक्षेप करून, या वैधानिक संस्थेस

मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दैनंदिन प्रशासकीय कामात अनाठायी हस्तक्षेप करून, या वैधानिक संस्थेस त्यांच्या सेवेतील एका अभियंत्याची निष्कारण बदली करायला भाग पाडल्याबद्दल, मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.लोणीकर यांनी मंत्री म्हणून असलेल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने म्हटले की, राज्यघटनेनुसार शासनव्यवस्थेची जी चौकट अपेक्षित आहे, त्यात जीवन प्राधिकरणासारख्या वैधानिक महामंडळाच्या दैनंदिन प्रशासकीय कामात मंत्र्याने हस्तक्षेप करण्यास कुठेही जागा नाही, तरीही लोणीकर यांनी तसे केले. मंत्री असा अनाठायी हस्तक्षेप करू लागले, तर अशा वैधानिक संस्थांना सुरळीतपणे काम करणे कठीण होईल. भविष्यात लोणीकर अशा प्रकारे अधिकारबाह्य काम करणार नाहीत व सरकारही मंत्र्यांच्या मनमानी इच्छा पूर्ण करण्यासाठी वैधानिक संस्थांना असे बेकायदा आदेश देणार नाही, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली.जीवन प्राधिकरणातील एक उपअभियंता पांडुरंग बापू पाटील यांची सांगली जिल्ह्यातील तासगाव येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे गेल्या वर्षी २९ आॅक्टोबर रोजी केली गेलेली बदली रद्द करताना, न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने भाजपाच्या मंत्र्यावर हे ताशेरे ओढले. पाटील यांना येत्या १० दिवसांत देवगड येथून पदमुक्त करून तासगाव येथे पुन्हा रूजू करून घ्यावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले. पाटील यांनी बदलीच्या विरोधात रिट याचिका दाखल केल्यावर, जीवन प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्र सादर करून ही बदली पाणीपुरवठा खात्याच्या सचिवांकडून पाठविण्यात आलेल्या आदेशवजा पत्रामुळे केल्याचे प्रांजळपणे कबूल केले. प्राधिकरणाने न्यायालयास सांगितले की, पाटील यांच्या बदलीस खरं तर कोणतेही समर्थनीय कारण नव्हते किंवा प्रशासकीय गरज म्हणूनही ही बदली गेली गेली नव्हती. केवळ सरकारकडून सांगण्यात आले, म्हणूनच ही बदली केली गेली. (विशेष प्रतिनिधी)