शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

लोणीकर यांच्यावर हायकोर्टाचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 05:29 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दैनंदिन प्रशासकीय कामात अनाठायी हस्तक्षेप करून, या वैधानिक संस्थेस

मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दैनंदिन प्रशासकीय कामात अनाठायी हस्तक्षेप करून, या वैधानिक संस्थेस त्यांच्या सेवेतील एका अभियंत्याची निष्कारण बदली करायला भाग पाडल्याबद्दल, मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.लोणीकर यांनी मंत्री म्हणून असलेल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने म्हटले की, राज्यघटनेनुसार शासनव्यवस्थेची जी चौकट अपेक्षित आहे, त्यात जीवन प्राधिकरणासारख्या वैधानिक महामंडळाच्या दैनंदिन प्रशासकीय कामात मंत्र्याने हस्तक्षेप करण्यास कुठेही जागा नाही, तरीही लोणीकर यांनी तसे केले. मंत्री असा अनाठायी हस्तक्षेप करू लागले, तर अशा वैधानिक संस्थांना सुरळीतपणे काम करणे कठीण होईल. भविष्यात लोणीकर अशा प्रकारे अधिकारबाह्य काम करणार नाहीत व सरकारही मंत्र्यांच्या मनमानी इच्छा पूर्ण करण्यासाठी वैधानिक संस्थांना असे बेकायदा आदेश देणार नाही, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली.जीवन प्राधिकरणातील एक उपअभियंता पांडुरंग बापू पाटील यांची सांगली जिल्ह्यातील तासगाव येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे गेल्या वर्षी २९ आॅक्टोबर रोजी केली गेलेली बदली रद्द करताना, न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने भाजपाच्या मंत्र्यावर हे ताशेरे ओढले. पाटील यांना येत्या १० दिवसांत देवगड येथून पदमुक्त करून तासगाव येथे पुन्हा रूजू करून घ्यावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले. पाटील यांनी बदलीच्या विरोधात रिट याचिका दाखल केल्यावर, जीवन प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्र सादर करून ही बदली पाणीपुरवठा खात्याच्या सचिवांकडून पाठविण्यात आलेल्या आदेशवजा पत्रामुळे केल्याचे प्रांजळपणे कबूल केले. प्राधिकरणाने न्यायालयास सांगितले की, पाटील यांच्या बदलीस खरं तर कोणतेही समर्थनीय कारण नव्हते किंवा प्रशासकीय गरज म्हणूनही ही बदली गेली गेली नव्हती. केवळ सरकारकडून सांगण्यात आले, म्हणूनच ही बदली केली गेली. (विशेष प्रतिनिधी)