शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

रणरागिणींच्या वेदनेचा हुंकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:35 IST

आझाद मैदानावर बुधवारी भगवा जनसागर लोटला होता. मराठा समाजावरील अन्यायाला वाचा फोडणारी रणरागिणींची भाषणे झाली, त्यांचा हुंकार पाहायला मिळाला.

सचिन लुंगसे मुंबई : आझाद मैदानावर बुधवारी भगवा जनसागर लोटला होता. मराठा समाजावरील अन्यायाला वाचा फोडणारी रणरागिणींची भाषणे झाली, त्यांचा हुंकार पाहायला मिळाला. आम्ही आज येथे न्याय मागण्यास आलेलो नाही तर न्याय घेण्यास आलो आहोत, असे सांगत त्यांनी मैदान दणाणून सोडले. आर्या माने, प्रचिती सावंत, वैष्णवी डाफ, पूजा मोरे, स्नेहल सपताळ, भावना देशमुख, काजल गुंजाळ, अर्चना भोर, रसिका शिंदे, दिव्या महाले, दिव्या साळुंखे, आकांक्षा पवार आणि सुरेखा गावकर यांनी समाजाची भावना बोलून दाखविली.प्रारंभी मराठा मोर्चाच्या प्रस्तावनेचे वाचन झाले. कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि तातडीने न्याय दिला जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. त्याचे काय झाले, असा सवाल एक तरुणीने केला. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. मात्र सरकार काहीच कार्यवाही करत नाही. अत्याचारासारख्या प्रकरणांत जात, धर्म आणि पंथ पाहता कामा नये. केवळ कोपर्डीच नाही, तर अत्याचाराच्या घटनेत आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आजघडीला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जात आहे. चुकीच्या प्रकरणांत लोकांना गोवले जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. अशा घटनांचे राजकारण करता कामा नये. मात्र याप्रश्नी सरकार गंभीर नाही.सरकार म्हणते कायद्याचे राज्य आहे. जर कायद्याचे राज्य असेल तर मग आम्हाला न्याय का मिळत नाही? कायदा नक्की कुठे आहे? दिलेले वचन सरकार का पाळत नाही? मराठा समाज उदारमतवादी आहे. मात्र आमचा गैरफायदा घेऊ नका. आज आम्ही मुंबईत धडकलो आहोत. आणि आता जर आमची दखल घेतली नाही, तर मग आम्ही दिल्ली हादरवून टाकू, असा इशारा त्यांनी दिला.आता अभ्यास बंद करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतेही प्रकरण दाखल केले की आम्ही अभ्यास करून हा प्रश्न सोडवू, असे ते म्हणतात. मात्र आणखी किती दिवस तुम्ही अभ्यास करणार. तुमचे गुरुजी नक्की आहेत तरी कोण? असा सवाल एका मुलीने केला.आम्ही जिजाऊच्या लेकीआम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. आम्ही शांत आहोत. मात्र जर आम्ही मनात आणले आणि आक्रमक झालो तर मात्र सरकारला महाग पडेल, असाही इशारा एका संतप्त मुलीने दिला.‘एक मराठा, लाख मराठा’प्रत्येकाच्या भाषणाचा शेवट ‘एक मराठा, लाख मराठा...’ने होत होता. ‘मराठा समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका...’ या वाक्यावर उपस्थित समुदायाकडून टाळ्यांचा गजर झाला.शिवस्मारकाचे काय झालेशिवस्मारकाच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र त्यानंतर कामाबाबत सरकारने एक शब्द काढलेला नाही. नक्की काम सुरू झाले आहे का? आणि सुरू झाले असेल तर किती झाले आहे? याबाबत सरकार काहीच बोलत नाही. शिवस्मारकाचे काम लवकर करण्यात यावे, असाही मुद्दा एका मुलीने उपस्थित केला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा