शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

घरमालकाचा खून करणारा गजाआड

By admin | Updated: April 29, 2016 01:33 IST

घरमालकाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार करून खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले आहे

पुणे : घरफोडी करून घराबाहेर झोपलेल्या घरमालकाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार करून खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विरार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संंघटित गुन्हे अधिनियम (मोक्का) गुन्ह्यामध्ये तो मागील आठ वर्षांपासून फरारी आहे.संदीप ऊर्फ संदीपा ऊर्फ जयकुल नमाशा भोसले (वय २८, रा. वडकीनाला, ता. हवेली, मूळ रा. गुनवरे, ता. फलटण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या गुन्ह्यात त्याच्यासोबत असलेले साथीदार अद्याप फरारी आहेत. कात्रज येथे राहणारे तानाजी नाना टकले (वय २७, रा. दुर्गा हिल्स, अंजलीनगर) यांचा खून करण्यात आला होता. ही घटना दि. ३ एप्रिल रोजी पहाटे ३ ते ७ या वेळेत घडली होती. घटने वेळी टकले हे रात्री घराबाहेर झोपले होते. त्या वेळी संदीप व त्याच्या एका साथीदाराने घराचा कडी-कोयंडा उचकटून त्यांच्या घरात चोरी केली. या वेळी टकले यांना जाग आली असता संदीपने त्यांच्या डोक्यात वार करून खून केला, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शेखर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, पोलीस कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, प्रवीण काळभोर, समीर बागसीराज, बाबा नरळे तसेच पोलीस मित्र चंद्रकांत मोरे, सचिन लिम्हण यांच्या पथकाने ही कामगिरी केली. >या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरू केला. बारामती, मोरगाव, सुपा, जेजुरी, सासवड, फलटण, पणदरे, निंबळक, वाजेगाव, गुनवरे, दहीवडी, खटाव, दौंड, यवत, लोणी-काळभोर, या भागात फिरून पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला. या दरम्यान संदीप हा कानिफनाथ गड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चौकशी केली असताना खुनाची कबुली दिली. संदीप हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर दहीवडी, विरार, नालासोपारा या ठिकाणी दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच विरार पोलीस ठाण्यातील मोक्या गुन्ह्यांतर्गत तो ८ वर्षांपासून फरार आहे. नालासोपारा येथील गंभीर गुन्ह्यातही तो आठ वर्षांपासून फरार आहे.