शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र रमझानचे रोजे करुन बैजल कुटूंबीय निघाले पंढरपूर सायकल वारीला

By admin | Updated: July 8, 2016 13:18 IST

पवित्र रमझानमधील रोजांचे उपास पूर्ण करुन ईद सण अत्यंत आनंदाने साजरी केल्यावर बईचे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयूक्त हरिष बैजल व कुटुंबिय सायकलवरून पंढरपूरला निघाले आहेत.

जयंत धुळप 
अलिबाग, दि. ८ - हिंदू- मुस्लिम एकात्मतेने भारावून गेलेले राज्यातील बहूदा एकमेव कुटुंब म्हणजे मुंबईचे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयूक्त हरिष बैजल यांचे कुटुंबिय... गुरुवारी हरिष बैजल यांच्या पत्नी छाया बैजल यांनी पवित्र रमझान मधील रोजांचे उपास पूर्ण करुन ईद सण अत्यंत आनंदाने साजरी केल्यावर आज सकाळी सहा वाजता हरिष बैजल, त्यांच्या पत्नी छाया आणि दोन चिरंजीव अभिषेक व करण यांनी नाशिक मधील आपल्या अन्य तब्बल 350 सायकल वारकऱ्यांसह पंढरपूर वारीला प्रारंभ केला आहे.
हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मात उपासाचे महत्व एकच
मुस्लिम धर्मातील ‘रोजे’ आणि हिंदू धर्मातील श्रावण महिन्यातील ‘उपास’ हे दोन्ही मानवी शरिरस्वास्थ सुयोग्य राहाण्याकरीता धर्माच्या आधारावर सांगीतलेला शास्त्रीय उपायच असल्याचे हरिष बैजल यांचे म्हणणे आहे. आपल्या हिंदूंच्या आषाढ-श्रावण महिन्यात तर त्याच काळात येणारा:या मुस्लिम पंचागातील रमझान महिन्यात उन्हाळा संपून पावसाळा सुरु होतो, वातावरणात मोठा बदल होतो आणि हा वातावरणातील बदलाचा मानवी शरिरावर विपरित परिणाम होवून आजारी पडण्याची शक्यता असते. अशी परिस्थिती येवू नये या करिता या काळात ‘लंघन’ म्हणजेच उपास हा उपाय दोन्ही धर्मामध्ये एकाच उद्देशाने सुचविला आहे, हे लक्षात घेवून आम्ही हे रोजे पाळतो. गतवर्षी छाया बैजल यांनी पूर्ण रमझान महिना तर यंदा रमझान मधील अखेरचे 15 दिवस असे रोजे केल्याचे बैजल यांनी सांगीतले.
 
पंढरपूरच्या वारीचा संबंध देखील मानवी स्वास्थाशीच 
पंढरपूरच्या वारीचा संबंध देखील मानवी स्वास्थाशीच आहे. पांडूरंगाच्या दर्शनाच्या श्रद्धेपोटी वारकरी शेकडो किमी अंतर उन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता, पांडूरंग नामाचा मुखाने गजर करित चालत येवून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरात पोहोचतात आणि त्यांच्या जीवनाचे सार्थक होते. चालण्या सारखा प्रकृती स्वास्थाकरीता दूसरा कोणताही प्रभावी व्यायाम नाही अशी भूमिका बैजल यांची आहे. 
 
व्यायामातून नाशिककरांशी जुळले आगळे नाते
व्यायामाची प्रचंड आवड असणारे हे बैजल कूटूंब गेल्या चार वर्षापासून नाशिक मध्ये होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक आणि त्यानंतर पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अशा नोकरीच्या निमीत्ताने त्यांच्या कुंटूंबाची पक्की नाळ नाशिककराबरोबर जूळली. दररोज सकाळी धावणो, सायकल चालवणो, योगा आदि व्यायामाच्या निमीत्ताने बैजल यांच्या प्रेमात नाशिककर आणि त्यातच तरुणाई अधिक प्रेमात पडली. 
 
सन 2012 मध्ये झाला नाशिक-पंढरपूर सायकल वारीस प्रारंभ
नाशिक-त्रंबकेश्वर आणि जवळपासचे रविवारचे एक दिवसांचे सायकल ट्रेक करता करता, सायकलींग प्रेमी 300 ते 400 तरुणांची फौजच बैजल यांनी आपल्या प्रत्यक्ष सायकलींगच्या कृतीतून उभी केली. त्यांतूनच सन 2012 मध्ये प्रथम त्यांनी नाशिक ते पंढरपूर सायकल वारीचे नियोजन केले आणि पहिली पंढरपूर सायकल वारी झाली. उत्साह वाढला आणि दरवर्षी ही पंढरपूर वारी वाढत्या सायकल वारकऱ्यांच्या सहभागातून सूरु झाली. 
 
यंदाच्या पाचव्या नाशिक-पंढरपूर सायकल वारीस झाला प्रारंभ
यंदा बैजल यांची मुंबईत बदली होवून, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयूक्त म्हणून नियूक्ती झाली आणि नाशिकच्या तरुण सायकल वारक:यांमध्ये एक नाराजीची लकेर आली. पण हरिष बैजल यांनी या तरुणाईला नाराज केले नाही. गुरुवारी मुंबईत रमझानचे रोजे पूर्ण करुन रात्रीच नाशिकला दाखल होवून, आज सकाली सहा वाजता तब्बल 350 सायकल वारक:यांसह बैजल कुटूंबीय पंढरपूरला सायकलवर रवाना झाले आणि नाशिकचीही तरुणाई सुखावून गेली.
 
रविवारी दुपारी पांडूरंगा चरणी पोहोचणार सायकल वारी
आज (शुक्रवार) या सायकल वारीचा पहिला मुक्काम 160 किमीचे अंतर पार करुन अहमदनगर येथे होईल. दुसरा मुक्काम त्यापूढील 180 किमीचे अंतर पार करुन शनिवारी टेंभूर्णी येथे तर रविवारी दुपार र्पयत सायकल वारी पंढरपूराच पांडूरंगाच्या चरणी पोहोचून दर्शन घेईल अशी माहिती बैजल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.