शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राज्य अर्थसंकल्पाची करणार होळी

By admin | Updated: March 28, 2016 02:11 IST

राज्यात दुष्काळ असतानाही राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने सामाजिक सेवांना कात्री लावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केला आहे. परिणामी सरकारविरोधातील

मुंबई : राज्यात दुष्काळ असतानाही राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने सामाजिक सेवांना कात्री लावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केला आहे. परिणामी सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी ३१ मार्चला जगण्याचा हक्क आंदोलनांतर्गत राज्यभर अर्थसंकल्पाची होळी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाजन म्हणाल्या की, २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पोषण, आरोग्यसेवा, रेशन, शिक्षण, पेन्शन यांसारख्या सामाजिक सेवांच्या निधीत कपात करण्यात आली आहे. राज्यातील अंगणवाड्या तर सरकार बंद करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलांच्या पोषणासाठीची तरतूद तब्बल ६२%ने कमी केली. यावरून कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार गंभीर दिसत नाही. अंगणवाड्या बंद झाल्यास लाखो लहान मुले कुपोषणाच्या विळख्यात जातील. शिवाय निधी कपातीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही कपातीची टांगती तलवार लटकत असल्याचे त्यांनी सांगितले.परिणामी प्रत्येक तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अर्थसंकल्पाची होळी करून सामाजिक संघटना सरकारचा निषेध व्यक्त करणार आहेत. शिवाय राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील आमदाराला भेटून संघटनेचे प्रतिनिधी याबाबत विधिमंडळात आवाज उठवण्याचे आवाहन करणार आहेत.आरोग्य अभियानच आजारी!२०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण आरोग्य अभियानाच्या निधीत तब्बल ३५% ने कपात केलेली आहे. त्यामुळे अनेक कंत्राटी कामगारांवर, नर्सेसवर संक्रांत येण्याची शक्यता आहे.५६% ने सर्व शिक्षा अभियानाच्या निधीतही कपात करण्यात आली आहे. त्याचा सर्वाधिक फटका दलित, आदिवासी आणि ग्रामीण-शहरी गरीब विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली.उद्योगपतींवर मेहेरबानी कशाला ?सरकारने उद्योगपतींकडून कर पूर्णपणे वसूल केला तर राज्यात सगळ्यांसाठी सामाजिक सेवा व सुरक्षेच्या योजनांसाठी पुरेसा निधी सरकारकडे उपलब्ध झाला असता. मात्र उद्योगपतींवर सरकारने एवढी मेहेरबानी का दाखवली, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.अन्न सुरक्षा कायद्याचा बोजवारा ?केशरी कार्डधारकांना स्वस्त रेशन देण्यासाठी सरकारकडे कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त निधी नाही. १४ दुष्काळी जिल्ह्यांत सर्वांना रेशनवर अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणाही त्यामुळे केवळ धूळफेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.