शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

भाजपच्या जाहीरनाम्याची करणार होळी

By admin | Updated: April 21, 2016 02:33 IST

स्वंतत्र विदर्भाच्या मुद्दावर ठोस भुमिका न घेतल्यामुळे सरकारचा निषेध करण्याचा ठराव विदर्भ राज्य परिषदेत पारित.

अकोला: केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपने विदर्भ राज्य निर्मितीबाबत दिलेले आश्‍वासन पाळले नसल्याने, १ मे रोजी, महाराष्ट्र दिनी, २0१४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या जाहीरनाम्याची विदर्भातील सर्व जिल्हय़ांमध्ये होळी करून, सरकारचा निषेध करण्याचा ठराव, बुधवारी अकोल्यात पार पडलेल्या विदर्भ राज्य परिषदेत पारित करण्यात आला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात माजी आमदार वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विदर्भ राज्य परिषदेत सात ठराव घेण्यात आले. ह्यअभी नही तो कभी नहीह्ण अशा शेवटच्या टप्प्यात स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलन छेडावे लागणार असून, आपण वेगवेगळ्या संघटनांमध्ये असलो तरी, सर्वांचे अंतिम ध्येय स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचे आहे. विदर्भ राज्यासाठी सुरू करण्यात आलेला लढा हे सतीचे वाण म्हणून ह्यजिकू किंवा मरूह्ण या भावनेने स्वीकारले आहे, असे विचार माजी आमदार वामनराव चटप यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. विदर्भ राज्यासाठी आंदोलनाचा वणवा जेव्हा पेटेल, तेव्हा त्याचा भडका कोणत्याही नेत्याला थांबवता येणार नाही. विदर्भ राज्याचा लढा अंतिम लढा आहे. एवढय़ा पोषक वातावरणात विदर्भ राज्य निर्मिती झाली नाही, तर आणखी ३0 वर्षे थांबावे लागेल. त्यामुळे हा लढा यशस्वी करा, असे आवाहन माजी महाधिवक्ता अँड. श्रीहरी अणे यांनी केले. सन १९0५ पासून विदर्भातील जनता शांतपणे विदर्भ राज्य मागत आहे; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही; परंतु आता विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही, हा आमचा मंत्र झाला पाहिजे, असे नमुद करून, त्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी लढा देण्याची गरज अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी अधोरेखित केली. महाराष्ट्राची दिवाळखोर परिस्थिती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहून विदर्भातील शेतकर्‍यांना काहीच मिळणार नाही. त्यासाठी विदर्भ राज्य निर्मितीची गरज असून, याच वर्षी हा लढा जिंकायचा आहे, असे विचार राम नेवले यांनी मांडले.