शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या जाहीरनाम्याची करणार होळी

By admin | Updated: April 21, 2016 02:33 IST

स्वंतत्र विदर्भाच्या मुद्दावर ठोस भुमिका न घेतल्यामुळे सरकारचा निषेध करण्याचा ठराव विदर्भ राज्य परिषदेत पारित.

अकोला: केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपने विदर्भ राज्य निर्मितीबाबत दिलेले आश्‍वासन पाळले नसल्याने, १ मे रोजी, महाराष्ट्र दिनी, २0१४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या जाहीरनाम्याची विदर्भातील सर्व जिल्हय़ांमध्ये होळी करून, सरकारचा निषेध करण्याचा ठराव, बुधवारी अकोल्यात पार पडलेल्या विदर्भ राज्य परिषदेत पारित करण्यात आला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात माजी आमदार वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विदर्भ राज्य परिषदेत सात ठराव घेण्यात आले. ह्यअभी नही तो कभी नहीह्ण अशा शेवटच्या टप्प्यात स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलन छेडावे लागणार असून, आपण वेगवेगळ्या संघटनांमध्ये असलो तरी, सर्वांचे अंतिम ध्येय स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचे आहे. विदर्भ राज्यासाठी सुरू करण्यात आलेला लढा हे सतीचे वाण म्हणून ह्यजिकू किंवा मरूह्ण या भावनेने स्वीकारले आहे, असे विचार माजी आमदार वामनराव चटप यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. विदर्भ राज्यासाठी आंदोलनाचा वणवा जेव्हा पेटेल, तेव्हा त्याचा भडका कोणत्याही नेत्याला थांबवता येणार नाही. विदर्भ राज्याचा लढा अंतिम लढा आहे. एवढय़ा पोषक वातावरणात विदर्भ राज्य निर्मिती झाली नाही, तर आणखी ३0 वर्षे थांबावे लागेल. त्यामुळे हा लढा यशस्वी करा, असे आवाहन माजी महाधिवक्ता अँड. श्रीहरी अणे यांनी केले. सन १९0५ पासून विदर्भातील जनता शांतपणे विदर्भ राज्य मागत आहे; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही; परंतु आता विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही, हा आमचा मंत्र झाला पाहिजे, असे नमुद करून, त्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी लढा देण्याची गरज अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी अधोरेखित केली. महाराष्ट्राची दिवाळखोर परिस्थिती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहून विदर्भातील शेतकर्‍यांना काहीच मिळणार नाही. त्यासाठी विदर्भ राज्य निर्मितीची गरज असून, याच वर्षी हा लढा जिंकायचा आहे, असे विचार राम नेवले यांनी मांडले.