शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांच्या नोटिसांची मोदींच्या गावात होळी

By admin | Updated: April 16, 2017 02:55 IST

शासनाच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे़ दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांना

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : शासनाच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे़ दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांना वीजबिल, बँकेच्या नोटीसा दिल्या जात आहेत़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर गावातच या नोटीसांची होळी करणार आहे, असे आ़ बच्चू कडू यांनी सांगितले.शेतकरी संघटना, प्रहार संघटनेच्या वतीने काढण्यात आलेली ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा शुक्रवारी तुळजापूर शहरात आली़ या यात्रेचे तुळजापूरकरांनी जोरात स्वागत केले़ यानिमित्त आयोजित जनता दरबारात आ़ कडू बोलत होते़ यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील, प्रहार संघटना, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. नरेंद्र आणि देवेंद्र सरकार जाहिरनाम्यातील आश्वासनांकडे दुर्लक्ष करून काम करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाईट दिवस आलेले आहेत. मोठ्या उत्साहाने आपण काँग्रेसला घालवले. आम्ही सत्तेवर आलो तर उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के नफा देवू, अशाप्रकारची मोठी आश्वासने त्यांनी दिली. परंतु यापैकी काही झाले नाही. उलट शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, असे रघुनाथ पाटील यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनो, आरपारच्या लढाईत सहभागी व्हा!सत्ता आली की व्यापारी आणि सत्ता गेली की सरकारला शेतकरी दिसतो. सातवा वेतन आयोग जाहीर करून १६ लाख कर्मचाऱ्यांना पावणेदोन लाख कोटी रुपये देण्याचे नियोजन होते. परंतु, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्यास किंवा कर्जमाफी करण्यास सरकारकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांसाठी आम्ही आता ही आरपारची लढाई लढत असून, यात सहभागी व्हावे, असे आवाहन बच्चू कडू यांनी विटा (सांगली) येथे केले.