शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शेतकऱ्यांच्या नोटिसांची मोदींच्या गावात होळी

By admin | Updated: April 16, 2017 02:55 IST

शासनाच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे़ दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांना

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : शासनाच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे़ दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांना वीजबिल, बँकेच्या नोटीसा दिल्या जात आहेत़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर गावातच या नोटीसांची होळी करणार आहे, असे आ़ बच्चू कडू यांनी सांगितले.शेतकरी संघटना, प्रहार संघटनेच्या वतीने काढण्यात आलेली ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा शुक्रवारी तुळजापूर शहरात आली़ या यात्रेचे तुळजापूरकरांनी जोरात स्वागत केले़ यानिमित्त आयोजित जनता दरबारात आ़ कडू बोलत होते़ यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील, प्रहार संघटना, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. नरेंद्र आणि देवेंद्र सरकार जाहिरनाम्यातील आश्वासनांकडे दुर्लक्ष करून काम करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाईट दिवस आलेले आहेत. मोठ्या उत्साहाने आपण काँग्रेसला घालवले. आम्ही सत्तेवर आलो तर उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के नफा देवू, अशाप्रकारची मोठी आश्वासने त्यांनी दिली. परंतु यापैकी काही झाले नाही. उलट शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, असे रघुनाथ पाटील यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनो, आरपारच्या लढाईत सहभागी व्हा!सत्ता आली की व्यापारी आणि सत्ता गेली की सरकारला शेतकरी दिसतो. सातवा वेतन आयोग जाहीर करून १६ लाख कर्मचाऱ्यांना पावणेदोन लाख कोटी रुपये देण्याचे नियोजन होते. परंतु, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्यास किंवा कर्जमाफी करण्यास सरकारकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांसाठी आम्ही आता ही आरपारची लढाई लढत असून, यात सहभागी व्हावे, असे आवाहन बच्चू कडू यांनी विटा (सांगली) येथे केले.