शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

होळीआधीच वैशाख वणवा

By admin | Updated: March 13, 2016 05:10 IST

दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या महाराष्ट्रात होळीआधीच वैशाख वणवा पेटला आहे. सूर्याने आतापासूनच आग ओकायला सुरुवात केली असून, राज्याच्या अनेक भागांतील तापमानाने चाळिशी पार केली आहे

मुंबई : दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या महाराष्ट्रात होळीआधीच वैशाख वणवा पेटला आहे. सूर्याने आतापासूनच आग ओकायला सुरुवात केली असून, राज्याच्या अनेक भागांतील तापमानाने चाळिशी पार केली आहे. दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी वणवण चालूच आहे. सर्वांत गंभीर स्थिती मराठवाड्यात आहे. जायकवाडी धरणातील पाण्याने तळ गाठला असून, तिथे केवळ १ टक्का पाणी शिल्लक आहे. लातूर, जालनासह मराठवाड्यातील बहुतांश भागांत पंधरवड्यातून एकदा कसेबसे पाणी मिळते; तर सोलापूर शहरात पाच दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. कधी नव्हे ते ठाणे-मुंबईसह कोकणालाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तापमानाचा पारा असाच चढता राहिला तर पाण्याचे संकट भीषण होणार आहे.नाशिक जिल्ह्यात मनमाड, नांदगाव व येवला येथे सात दिवसांनी पाणी येत आहे. दिंडोरी, सुरगाणा, पेठ, नांदगाव, देवळा, सटाणा येथेही पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने विहिरींचे पाणी आटत आहे. पूरक नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने अनेक गावांमध्ये नळ केवळ देखाव्यापुरते उरले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)सोलापूर, लातूर, उस्मानाबादेत पाणीसंकट गहिरे, हिंगोलीत एक बळीऔज बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने सोलापुरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाणी एप्रिल अखेरपर्यंत पुरविण्यास आयुक्तविजयकुमार काळम यांनी पाणीपुरवठा आणखी एक दिवसाने पुढे ढकलला आहे.लातूर जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंधरा दिवसांपासून लातूरकरांना पाण्याचा एक थेंबही वाटप केलेला नाही़ लातूर शहरातील तब्बल ५ लाख नागरिक विकतच्या पाण्यावर तहान भागवत आहेत.ंहिंगोली जिल्ह्यातील पेंडगाव येथे पाणी टंचाईने ज्ञानेश्वर वाळके या तरूणाचा बळी घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यात शेकडो गावांत टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे़>>प्रमुख शहरातील कमाल तापमानवर्धा ४०़५, चंद्रपूर ४०़२, अकोला ४०़१, सोलापूर ४०़१, पुणे ३६़१, जळगाव ३७़२, कोल्हापूर ३७, महाबळेश्वर ३२़४, मालेगाव ३९़२, नाशिक ३३़७, सांगली ३८, सातारा ३७़१, मुंबई ३४, अलिबाग २९़१, रत्नागिरी ३२़४, पणजी ३३़३, उस्मानाबाद ३७़२, औरंगाबाद ३६़६, परभणी ३९़५, अमरावती ३८़८, बुलढाणा ३७, गोंदिया ३६़६, नागपूर ३९़४, यवतमाळ ३९़