शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

होळीआधीच वैशाख वणवा

By admin | Updated: March 13, 2016 05:10 IST

दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या महाराष्ट्रात होळीआधीच वैशाख वणवा पेटला आहे. सूर्याने आतापासूनच आग ओकायला सुरुवात केली असून, राज्याच्या अनेक भागांतील तापमानाने चाळिशी पार केली आहे

मुंबई : दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या महाराष्ट्रात होळीआधीच वैशाख वणवा पेटला आहे. सूर्याने आतापासूनच आग ओकायला सुरुवात केली असून, राज्याच्या अनेक भागांतील तापमानाने चाळिशी पार केली आहे. दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी वणवण चालूच आहे. सर्वांत गंभीर स्थिती मराठवाड्यात आहे. जायकवाडी धरणातील पाण्याने तळ गाठला असून, तिथे केवळ १ टक्का पाणी शिल्लक आहे. लातूर, जालनासह मराठवाड्यातील बहुतांश भागांत पंधरवड्यातून एकदा कसेबसे पाणी मिळते; तर सोलापूर शहरात पाच दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. कधी नव्हे ते ठाणे-मुंबईसह कोकणालाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तापमानाचा पारा असाच चढता राहिला तर पाण्याचे संकट भीषण होणार आहे.नाशिक जिल्ह्यात मनमाड, नांदगाव व येवला येथे सात दिवसांनी पाणी येत आहे. दिंडोरी, सुरगाणा, पेठ, नांदगाव, देवळा, सटाणा येथेही पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने विहिरींचे पाणी आटत आहे. पूरक नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने अनेक गावांमध्ये नळ केवळ देखाव्यापुरते उरले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)सोलापूर, लातूर, उस्मानाबादेत पाणीसंकट गहिरे, हिंगोलीत एक बळीऔज बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने सोलापुरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाणी एप्रिल अखेरपर्यंत पुरविण्यास आयुक्तविजयकुमार काळम यांनी पाणीपुरवठा आणखी एक दिवसाने पुढे ढकलला आहे.लातूर जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंधरा दिवसांपासून लातूरकरांना पाण्याचा एक थेंबही वाटप केलेला नाही़ लातूर शहरातील तब्बल ५ लाख नागरिक विकतच्या पाण्यावर तहान भागवत आहेत.ंहिंगोली जिल्ह्यातील पेंडगाव येथे पाणी टंचाईने ज्ञानेश्वर वाळके या तरूणाचा बळी घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यात शेकडो गावांत टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे़>>प्रमुख शहरातील कमाल तापमानवर्धा ४०़५, चंद्रपूर ४०़२, अकोला ४०़१, सोलापूर ४०़१, पुणे ३६़१, जळगाव ३७़२, कोल्हापूर ३७, महाबळेश्वर ३२़४, मालेगाव ३९़२, नाशिक ३३़७, सांगली ३८, सातारा ३७़१, मुंबई ३४, अलिबाग २९़१, रत्नागिरी ३२़४, पणजी ३३़३, उस्मानाबाद ३७़२, औरंगाबाद ३६़६, परभणी ३९़५, अमरावती ३८़८, बुलढाणा ३७, गोंदिया ३६़६, नागपूर ३९़४, यवतमाळ ३९़